शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नऊ हजार वजन काट्यांचे ‘पासिंग’ नाही!

By admin | Updated: March 15, 2016 02:16 IST

वजनमापे विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते.

नीलेश शहाकार / बुलडाणा जागो ग्राहक जागो, अशी जाहिरात करून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शासनस्तरावर होत असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ग्राहकांची फसगत होत असल्याचे चित्र आहे. अ प्रमाणित वजन-मापे आणि काट्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. जिल्ह्यातील १३ हजार ४३५ इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहेत; मात्र वैधमापन विभागाच्या दुर्लक्षामुळे यापैकी ९ हजार ९0 वजनमापे पासिंगच झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात अनेक दुकानांमध्ये व रस्त्यावरील विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. बर्‍याच दुकानामध्ये काटा पासिंग केलेला नसतो, वजन प्रमाणित नसतात; मात्र ग्राहकांना वस्तू त्याच काट्यावर मोजून दिल्या जातात. नियमाप्रमाणे प्रतिवर्षी वजन काट्यांचे पासिंग करणे आवश्यक असते. त्यासाठीचे प्रमाणपत्र मिळविणे गरजेचे असते; मात्र काही अ पवादास्पद दुकानदार वगळता जिल्ह्यातील बर्‍याच दुकानदारांनी अद्यापही आपल्या काट्याचे पासिंग केले नाही. जिल्ह्यात सध्या विविध दुकानदार, मुख्य व्यावसायिक, लहान कारखाने, किराणा दुकानदार, स्वस्त धान्य दुकानदार, बियाणे व्यावसायिक, भाजी व फळ विक्रेते व इतर लहान-मोठय़ा व्यावसायिकांकडे १३ हजार ४३५ इलेक्ट्रॉनिक व पारंपरिक वजनमापे कार्यरत आहे. त्यापैकी बुलडाणा सहायक नियंत्रक वैधमापन विभागाकडून केवळ ४ हजार ३३५ वजनमापाची तपासणी करून पासिंग करून घेतली. त्यामुळे इतर ९ हजार ९0 वजनमापे दोषपूर्ण असून, त्यातून ग्राहकांची फसगत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.कारवाईची उद्दिष्टपूर्ती नाहीयेथील सहायक नियंत्रक वैधमापन विभाग, बुलडाणा सध्या कोमात आहे. त्यामुळे येथील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महसुली वर्षात विभागाला ३४ लाख ३0 हजाराचे उद्दिष्ट देण्यात आले होते; मात्र बुलडाणा कार्यालयाने केवळ १७ लाख ४२ हजारांचा महसूल मिळवून दिला. २0१५-१६ या वर्षात वजनमापे तपासणी व दंड वसुलीसाठी जिल्ह्याभरात ६७१ कार्यवाही केल्या. तपासणी प्रक्रिया रखडली!जुने तराजू व वजन मापे प्रमाणित आहेत किंवा नाही, इलेक्ट्रॉनिक काट्यामागे सील तसेच पासिंगची तारीख तपासणी करणे आवश्यक आहे. ग्राहक जागृती कार्यक्रमातून ही प्रक्रिया राबविली जाते; मात्र या कार्यक्रमासाठी शासनाकडून पुरेसे अनुदान मिळत नाही. माग दुकानदारांवर कारवाई करुन आपले वैयक्तिक हितसंबंध खराब का करावे, ही भूमिका अधिकारी घेताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात तपासणी प्रक्रिया रखडली आहे.