शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नववर्षात सरकारला शेतकर्‍यांसाठी सद्बुद्धी येवो - तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:34 IST

२0१८ या नववर्षात तरी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारला आई भवानी सद्बद्धी देवो, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जगदंबा देवीच्या चरणी घातले. 

ठळक मुद्देजगदंबा देवीला ‘स्वाभिमानी’ने घातले साकडे सरत्या वर्षात अनोखे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, सातत्याने होत असलेली निसर्गाची अवकृपा, सोयाबीनचे पडलेले भाव, कापसावर पडलेली बोंडअळी यामध्ये राज्यातील शेतकरी भरडला गेला. अशावेळी सरकारने या नडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देणे अपेक्षित होते; मात्र सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत आहेत. २0१८ या नववर्षात तरी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारला आई भवानी सद्बद्धी देवो, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जगदंबा देवीच्या चरणी घातले. २0१७ या सरत्या वर्षात शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा शहरवासीयांचे आराध्य दैवत आई जगदंबा देवी मंदिरात जाऊन शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी या सरकारला सद्बुद्धी देवो यासाठी देवीच्या चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले की, मागील चार वर्षांपासून सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला आहे. कापूस व सोयाबीनचे नगदी पीक बुडाल्याने शेतकरी त्रस्त आहे. सोयाबीन कशीबशी आली; मात्र भाव पडल्याने शेतकर्‍यांच्या हातावर काहीच पडले नाही. कपाशीवर यावर्षी गुलाबी बोंडअळी पडल्यामुळे कपाशीचे पीक पूर्णत: गेले. एकरी दीड ते दोन क्विंटलसुद्धा कापूस झाला नाही. अनेक शेतकर्‍यांनी शेतीतील कपाशी उपटून फेकली. सरकारने कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या कपाशीचे पंचनामे केले. लवकरच नुकसान भरपाई देऊ, असे आश्‍वासन दिले; मात्र सरकारचे हे आश्‍वासन फोल ठरले. केंद्रात व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारकडून शेतकर्‍यांना अपेक्षा होत्या; मात्र मागील चार वर्षात शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. परिणामी शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. मागील चार वर्षात शेतकर्‍यांसा काहीही न करणार्‍या या सरकारला पुढील २0१८ या वर्षात तरी शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आई जगदंबा चांगली बुद्धी देवो यासाठी शेतकर्‍यांसह देवीच्या चरणी साकडे घालावे लागत असल्याचे रविकांत तुपकर यावेळी म्हणाले. यापुढे शेतकर्‍यांसाठी रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करू, असा इशारा यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने मिळावी, सोयाबीन व कापसाला हमीभाव मिळावा, सरकारने आयात निर्यातीच्या धोरणात बदल करावा, पाम तेलावरील आयात शुल्क वाढवावे, सोयाबीन व कापुस उत्पादकांना १00 टक्के नुकसान भरपाई तातडीने द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे पश्‍चिम विदर्भ प्रमुख राणा चंदन, जिल्हाध्यक्ष पवन देशमुख, शेख. रफीक शेख. करीम, पं.स. सदस्य नंदिनी कल्याणकर, प्रदीप शेळके, कडुबा मोरे, सैयद वशीम, अनिल मिरगे पाटील, अमोल मोरे, दत्ता जेऊघाले, गोटू जेऊघाले, शैलेश कल्याणकर, गजानन पवार, चंद्रकांत हिवाळे, स्वप्निल जाधव, अमोल जाधव, सागर दुतोंडे, संदीप नवले यांच्यासह शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.  

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणा