शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

सोयाबीन पिकावर नवे संकट; शेंगांची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 17:38 IST

सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: राज्यात ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक आहे. परंतू सध्या हवामानातील आद्रता वाढल्यामुळे सोयाबीन पिकावर रोगाचे नवे संकट निर्माण झाले आहे. आद्र हवामानामुळे सोयाबीनच्या पानासह शेंगावर जिवाणूचे ठिपके पडले आहेत; त्याचबरोबर शेंगानाही गळती लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे. सोयाबीन पिकापासून उत्पन्नात भरघोस वाढ होत असल्यामुळे शेतकरी हे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. पूर्वी विदर्भातच सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक होते. मात्र आता राज्यातील बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळले आहेत. त्यामुळे यावर्षी राज्यात नियोजीत क्षेत्रापेक्षा सोयाबीनचा पेरा अधिक आहे. राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर आहे. त्यापैकी ३९ लाख ५४ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. परंतू सध्या सर्वत पावसाचे वातावरण असल्याने या पिकाला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक झाल्याने सोयाबीन पिक रोगीष्ट बनले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडांच्या पानावर व शेंगावर त्रिकोणी, चौकोणी आकाराचे तपकिरी, करड्या रंगाचे ठिपके पडले आहेत. काही ठिकाणी रोगाची तिव्रता वाढल्याने सोयाबीनच्या झाडाची पाने व शेंगा गळून पडत आहे. हवामानातील आद्रता जस-जशी वाढत जात आहे, त्याच वेगात हा रोगही झपाट्याने वाढत आहे. सध्या सोयाबीन पिक हे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू बदलत्या वातावरणाचा परिणाम या पिकावर झाल्याने शेंगा भरण्यापूर्वीच गळून पडत आहेत. पानावर छिद्रेही पडत आहेत. त्यामुळे शेतकºयांसमोर सोयाबीन पिक वाचविण्याचे संकट आता निर्माण झाले आहे. 

 सध्या सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. शेतकºयाने वेळेवर फवारणी केली नसेल, तर काही ठिकाणी असा प्रकार असू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता कृषी सल्ला घेऊन वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्या.- नरेंद्र नाईक,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरी