शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

दुष्काळजन्य परिस्थितीत ‘निंबोळी’चा आधार

By admin | Updated: July 15, 2015 23:26 IST

निंबोळी वेचणी जोमात; खामगाव बाजार समितीत आवक वाढली.

नाना हिवराळे / खामगाव : पावसाने दडी मारल्याने ग्रामीण भागातील वातावरण मरणासन्न झाले आहे. पेरणी करून उगवलेली पिके तापत्या उन्हाने करपली आहेत. शेतकरी संकटात असताना मजुरांनाही रोजगार नाही. अशा बिकट स्थितीत ग्रामीण भागात निंबोळी वेचून मजूरवर्ग उदरनिर्वाह चालवत असल्याचे चित्र आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत मजुरांना निंबोळी आधार ठरली आहे. अपुर्‍या पावसामुळे शेती करणे शेतकर्‍यांसाठी धोकादायक ठरत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास मशागतीच्या कामांना वेग येतो. यावर्षीच्या खरीप हंगामात पेरण्या उत्स्फूर्त झाल्या; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. २0 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटूनही पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतीच्या पेरणीपश्‍चात मशागतीची कामे ठप्प आहेत. परिणामी मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. एरवी पेरणीनंतर गावात एकही नागरिक रिकामा फिरताना दिसत नाही; मात्र निसर्गाच्या दुष्टचक्राने परिस्थिती विपरीत झाली आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ते गावातच आढळून येतात. डवरे वा निंदणाची कामे ठप्प असल्याने मजुरांनी निंबोळी वेचण्यावर भर दिला आहे. महिला मजूर मुलाबाळांना सोबत घेऊन दिवसभर निंबोळ्या वेचण्याचे काम करीत असल्याचे चित्र दिसून येते. दिवसभरात एक महिला १५ ते २0 किलो निंबोळी वेचते. गावातीलच किरकोळ व्यापारी पाच ते सहा रुपये प्रतिकिलो दराने त्या निंबोळ्या विकत घेत आहेत. निंबोळी विकून ८0 ते १00 रुपये मजुरी मिळत असल्याचे चित्र आहे. निंबोळी वेचणीचा हंगाम जोमात सुरू असल्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात निंबोळीची आवक मागील आठ ते दहा दिवसांपासून वाढली आहे. बाजारात ८00 रुपयांपासून तर ११00 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्याने किरकोळ व्यापार्‍यांना परवडत आहे. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने ग्रामीण भागात निंबोळी वेचणे हाच मुख्य व्यवसाय बनल्याने पाऊस येईपर्यंंत त्यावरच मजूरवर्गाला गुजराण करावी लागणार आहे. खामगाव बाजार समितीत निंबोळीची खरेदी केल्यानंतर एमआयडीसी भागात असलेल्या प्रक्रिया उद्योगात त्या आणल्या जातात. तेथे निंबोळीपासून पावडर व जैवित खत बनविले जात असल्याने निंबोळीचे भाव वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.