शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जलक्रांतीसाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:54 IST

खामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देसातपुड्यातील सालवन येथे भेट 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.संग्रामपूर तालुक्यातील सालवन येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी आणि श्रमदान करून परतत असताना त्यांनी उपस्थित काही मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून जलसंधारण, पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. शासनाच्या आणि पाणी फाउंडेशनच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र राज्यातील अनेक खेडे आणि त्या खेडे गावातील नागरिक समोर येत आहेत; मात्र राज्याची लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या  विचार केल्यास ही संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात मोठय़ा संख्येने नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. खरं तर हे एक दैवी कार्य म्हणून  महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाने पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, एखाद्या गावात जाऊन श्रमदान करावे, एवढीच आपली प्रामाणिक इच्छा आहे. तथापि, दिवसेंदिवस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद वाढत असून, सन २0१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत चार हजारापेक्षा जास्त गावे सहभागी झाली आहेत. पुढील वर्षी या संख्येत निश्‍चित भर पडेल, ही एक शुभ संकेतांची नांदी आहे, असेही आमिर खान म्हणाले. पाण्याच्या कामासाठी आपण सालवन येथे आलो असून, राज्यातील ६0-७0 गावांमध्ये आपण दौरा केल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.