शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जलक्रांतीसाठी लोकचळवळ उभी राहणे गरजेचे - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:54 IST

खामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.

ठळक मुद्देसातपुड्यातील सालवन येथे भेट 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : जलसंधारण आणि पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या गावांची अपेक्षित दखल पाणी फाउंडेशनच्यावतीने घेण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षात या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र असे असले तरी, जलसंधारण आणि पाणलोट ही एक लोकचळवळ होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सुप्रसिद्ध सिने अभिनेते तथा पाणी फाउंडेशनचे प्रणेते आमिर खान यांनी येथे व्यक्त केली.संग्रामपूर तालुक्यातील सालवन येथील जलसंधारणाच्या कामाची पाहणी आणि श्रमदान करून परतत असताना त्यांनी उपस्थित काही मोजक्या पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने गेल्या तीन-चार वर्षांपासून जलसंधारण, पाणलोट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. शासनाच्या आणि पाणी फाउंडेशनच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, महाराष्ट्र राज्यातील अनेक खेडे आणि त्या खेडे गावातील नागरिक समोर येत आहेत; मात्र राज्याची लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या  विचार केल्यास ही संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात मोठय़ा संख्येने नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे. खरं तर हे एक दैवी कार्य म्हणून  महाराष्ट्र राज्यातील प्रत्येकाने पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, एखाद्या गावात जाऊन श्रमदान करावे, एवढीच आपली प्रामाणिक इच्छा आहे. तथापि, दिवसेंदिवस नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद वाढत असून, सन २0१८ च्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत चार हजारापेक्षा जास्त गावे सहभागी झाली आहेत. पुढील वर्षी या संख्येत निश्‍चित भर पडेल, ही एक शुभ संकेतांची नांदी आहे, असेही आमिर खान म्हणाले. पाण्याच्या कामासाठी आपण सालवन येथे आलो असून, राज्यातील ६0-७0 गावांमध्ये आपण दौरा केल्याचे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.