शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहाराची गरज - डॉ. साधना पाचरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 14:49 IST

अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’  संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद...

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : चुकीच्या आहारामुळेच प्रकृतीत विकृती निर्माण होते. शरीरात विविध आजाराची वाढ होते. निरोगी रहायचे असेल तर प्रत्येकाने नैसर्गिक आणि संतुलित आहार सेवन करणे गरजेचे आहे . अमरावती येथील ‘विना तेलाची भाजीची भीसी’  संकल्पनेच्या प्रणेत्या तथा आहारतज्ज्ञ डॉ. साधनाताई पाचरणे यांच्याशी साधलेला संवाद...

विना तेलाच्या भाज्यांच्या प्रशिक्षणाची संकल्पना कशी सुचली?विना आणि कमी तेल्याच्या भाज्या तयार करण्याचे अमरावती येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर कमी तेलाच्या भाज्या खाण्यास स्वत:पासून सुरूवात केली. पुढे घरातील मंडळी, नातेवाईक आणि मैत्रिणींना ही संकल्पना सांगितली. अनेकांना लाभ मिळाल्याचा अनुभव आल्याने विनातेलाच्या प्रशिक्षण कार्यशाळा सुरू केल्यात.

‘विना तेलाच्या भाजीची भीसी’ म्हणजे काय?प्रशिक्षण आणि कार्यशाळांना वेगळे आणि नाविण्यपूर्ण स्वरूप देण्यासाठी परिसरातील महिला आणि मैत्रिणींच्या सहभागातून ‘विना तेलाची भाजी तयार करण्याची भीसी’ सुरू केली. आठवड्यातून एकदा समुहात सहभागी सदस्यांकडून विना तेलाची भाजी करून घेण्यात आली. या संकल्पनेला आता व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे.

विना तेलाच्या भाज्यांच्या सेवनाचे काही फायदे?निश्चितच, आपल्यासाठी समतोल, पोषक, सात्विक आहार हेच उत्तम औषध आहे. कमी आणि विना  तेलाच्या भाज्यांमुळे वजन कमी होण्यासोबतच, अपचन आणि अ‍ॅसिडीटी यासारख्या विकारात हमखास लाभ मिळतो.

 भाज्या तयार करण्याच्या कार्यशाळा कुठे आयोजित केल्यात.?अमरावती येथून नि:शुल्क कार्यशाळांना सुरूवात केली. अमरावती नंतर बुलडाणा, अकोला, पुणे, औरंगाबाद, वाशिम, अहमद नगर, जळगाव खांदेश आणि मुंबई सारख्या शहरात नि:शुल्क कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तिन्ही धातंूचे समप्रमाण माणसाला निरोगी जीवन देतात. आजारी पडून औषध घेण्यापेक्षा आजार होऊच नये, याची प्रत्येकाने काळजी घेणे अधिक शहाणपणाच ठरते. नैसर्गिक आहार हेच मनुष्यासाठी जीवनदायी अन्न आहे.

 विना तेलाच्या भाज्या तयार करण्याचे प्रशिक्षण कुठे घेतले?योग्य आहाराचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. याउलट आहार बिघडल्यास त्याचे परिणाम आरोग्यावर आणि प्रकृतीवर दिसू लागतात. म्हणजेच आरोग्य आणि आहाराचा जवळचा संबध आहे. आहाराविषयक काहीतरी वेगळं करण्याची जिज्ञासा गत अनेक दिवसांपासून मनात होती. त्यामुळे याविषयी कुठे कार्यशाळा होतात का? याची माहिती घेतली. त्यानंतर अमरावती येथील प्रयास-सेंवाकूर संस्थेचे निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ. जीवनलाल गांधी आणि डॉ. अविनाश सावजी यांच्या विविध कार्यशाळांमध्ये विनातेलाच्या भाज्यांचे प्रशिक्षण घेतले.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत