शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दुष्काळ निर्मूलनासाठी दिव्यदृष्टीतून 'नरेंद्र' देतोय जलसंधारणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 18:02 IST

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे.

- योगेश फरपटखामगाव : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे. याच चळवळीचा एक घटक असलेले अकोला-बुलडाणा जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड हे डोळ्यांच्या माध्यमातून संवाद साधून युवकासह नागरिकांना जलसंधारणाचे धडे देण्याचे काम प्रभावीपणे करताना दिसत आहेत. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचा खेळ बहुतांश लोकांनी पाहिला असेलच पण बोलक्या डोळ्यांचा संवाद ऐकण्यासाठी ग्रामीणच नव्हे शहरी भागात सुद्धा उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र काकड हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना खामगाव येथे लोकमतशी संवाद साधला.मानवी अवयवांपैकी डोळे हा सर्वात प्रभावशाली अवयव आहे. डोळे हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करणारा अवयव आहे. जी गोष्ट आपण बोलू शकत नाही. ती डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. राग, प्रेम, आपुलकी, भावना ह्या डोळ्यांतून व्यक्त होत असतात. खळखळणा-या हास्यासोबत औजस्वी डोळे असले की निश्चितच मैफील जिंकता येते. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न चालले आहेत. विविधपणे प्रशिक्षण देताना ग्रामीण व्यक्ती हीच या चळवळीचा खरा पाया आहे. ही चळवळ लोकांनी आता आपली मानली आहे.या चळवळीच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. तशा प्रकारची उदाहरणे महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहेत. जलसंधारणासोबत मनसंधारण व्हावं यासाठी ग्रामीण तथा शहरी भागातही कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शाळा व शहरी भागातील महाविद्यालयात वेगळ्या आशेने डोळ्यांच्या माध्यमातून जनसंवाद साधला जात आहे. आणि तो साधतो आहे नरेंद्र. सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाऊंडेशनचे अकोला व बुलडाणा जिल्हा समन्वयक म्हणून नरेंद्र काकड काम पाहतोय. हसता हसता डोळ्यांच्या कला ओलावून टाकणारे नयनकटाक्ष व जलसंधारण चळवळीत पाणलोटबद्दलचे विविध उपचार नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी सांगतोय.शेततळे, दगडी बांध, जाळीचा बांंध, माती नाला बांध, विहीर पुनर्भरण, कंटूर बांध, शोषखड्डे, वृक्षलागवड इत्यादीची माहिती नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी देतोय. पाणलोट उपचाराबाबत साध्या आणि सोप्या भाषेत डोळ्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहे. महाविद्यालयीन तरुण असो की, गावातील ग्रामस्थ यालाही डोळ्याची भाषा आपली वाटते व सहजपणे ते उपचार स्वीकारतात. आतापर्यंत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावामध्ये जलसंधारणाची चळवळ राबविली आहे.