शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

दुष्काळ निर्मूलनासाठी दिव्यदृष्टीतून 'नरेंद्र' देतोय जलसंधारणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 18:02 IST

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे.

- योगेश फरपटखामगाव : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे. याच चळवळीचा एक घटक असलेले अकोला-बुलडाणा जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड हे डोळ्यांच्या माध्यमातून संवाद साधून युवकासह नागरिकांना जलसंधारणाचे धडे देण्याचे काम प्रभावीपणे करताना दिसत आहेत. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचा खेळ बहुतांश लोकांनी पाहिला असेलच पण बोलक्या डोळ्यांचा संवाद ऐकण्यासाठी ग्रामीणच नव्हे शहरी भागात सुद्धा उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र काकड हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना खामगाव येथे लोकमतशी संवाद साधला.मानवी अवयवांपैकी डोळे हा सर्वात प्रभावशाली अवयव आहे. डोळे हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करणारा अवयव आहे. जी गोष्ट आपण बोलू शकत नाही. ती डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. राग, प्रेम, आपुलकी, भावना ह्या डोळ्यांतून व्यक्त होत असतात. खळखळणा-या हास्यासोबत औजस्वी डोळे असले की निश्चितच मैफील जिंकता येते. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न चालले आहेत. विविधपणे प्रशिक्षण देताना ग्रामीण व्यक्ती हीच या चळवळीचा खरा पाया आहे. ही चळवळ लोकांनी आता आपली मानली आहे.या चळवळीच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. तशा प्रकारची उदाहरणे महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहेत. जलसंधारणासोबत मनसंधारण व्हावं यासाठी ग्रामीण तथा शहरी भागातही कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शाळा व शहरी भागातील महाविद्यालयात वेगळ्या आशेने डोळ्यांच्या माध्यमातून जनसंवाद साधला जात आहे. आणि तो साधतो आहे नरेंद्र. सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाऊंडेशनचे अकोला व बुलडाणा जिल्हा समन्वयक म्हणून नरेंद्र काकड काम पाहतोय. हसता हसता डोळ्यांच्या कला ओलावून टाकणारे नयनकटाक्ष व जलसंधारण चळवळीत पाणलोटबद्दलचे विविध उपचार नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी सांगतोय.शेततळे, दगडी बांध, जाळीचा बांंध, माती नाला बांध, विहीर पुनर्भरण, कंटूर बांध, शोषखड्डे, वृक्षलागवड इत्यादीची माहिती नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी देतोय. पाणलोट उपचाराबाबत साध्या आणि सोप्या भाषेत डोळ्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहे. महाविद्यालयीन तरुण असो की, गावातील ग्रामस्थ यालाही डोळ्याची भाषा आपली वाटते व सहजपणे ते उपचार स्वीकारतात. आतापर्यंत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावामध्ये जलसंधारणाची चळवळ राबविली आहे.