शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

रिमझिम पावसामुळे मुगाच्या शेंगांना उभ्या झाडावर फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील ...

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या मुगाच्या शेंगा भरल्या आहेत. तर काही तोडणीला आल्या आहेत. या आठवड्यात रविवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने सुकन्याच्या अवस्थेत असलेल्या शेंगांना उभ्या झाडावरच वाळलेल्यासह हिरव्या शेंगांना कोंब फुटत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन पिकाची दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. अखेर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने मूग-उडदासह सोयाबीनच्या झाडावर शेंगांना कोंब फुटल्यामुळे पिकाची नासाडी झाली होती. शेतकऱ्यांनासुद्धा डाळीपुरतेही मूग झाले नव्हते. त्या पिकांना लावलेला खर्च पूर्ण वाया गेला होता. दरम्यान मूग, उडीद या पिकाचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण केले होते; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. कोरोना संसर्ग आजाराचे पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे इतर आलेल्या पिकालासुद्धा भाव मिळाला नसल्याने डोक्यावरचे कर्जाचे ओझे सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन चांगल्या उत्पादनाची कास धरत यावर्षी खरीप हंगामातील पेरणी केली.

परिसरात जुलै महिन्यात मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने काही शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली आल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फुले-शेंगा लागल्या असताना २२ दिवसांची पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी पिकाला वाचवण्याकरिता तुषार सिंचनाद्वारे पाणीसुद्धा दिले होते.

मुगाचे उत्पादन घटणार

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील मुगाच्या शेंगा भरल्या असून, काही शेतकऱ्यांच्या मुगाच्या शेंगा वाळत आहेत. या आठवड्यात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्याला पूर आले होते. तेव्हापासून रिमझिम कमी-अधिक जास्त पाऊस पडत असल्याने मुगाच्या झाडाच्या शेंगांना कोंब फुटत असल्याने एक-दोन दिवसांत पाऊस न थांबल्यास गतवर्षीसारखा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.