शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम पावसामुळे मुगाच्या शेंगांना उभ्या झाडावर फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील ...

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या मुगाच्या शेंगा भरल्या आहेत. तर काही तोडणीला आल्या आहेत. या आठवड्यात रविवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने सुकन्याच्या अवस्थेत असलेल्या शेंगांना उभ्या झाडावरच वाळलेल्यासह हिरव्या शेंगांना कोंब फुटत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन पिकाची दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. अखेर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने मूग-उडदासह सोयाबीनच्या झाडावर शेंगांना कोंब फुटल्यामुळे पिकाची नासाडी झाली होती. शेतकऱ्यांनासुद्धा डाळीपुरतेही मूग झाले नव्हते. त्या पिकांना लावलेला खर्च पूर्ण वाया गेला होता. दरम्यान मूग, उडीद या पिकाचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण केले होते; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. कोरोना संसर्ग आजाराचे पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे इतर आलेल्या पिकालासुद्धा भाव मिळाला नसल्याने डोक्यावरचे कर्जाचे ओझे सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन चांगल्या उत्पादनाची कास धरत यावर्षी खरीप हंगामातील पेरणी केली.

परिसरात जुलै महिन्यात मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने काही शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली आल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फुले-शेंगा लागल्या असताना २२ दिवसांची पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी पिकाला वाचवण्याकरिता तुषार सिंचनाद्वारे पाणीसुद्धा दिले होते.

मुगाचे उत्पादन घटणार

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील मुगाच्या शेंगा भरल्या असून, काही शेतकऱ्यांच्या मुगाच्या शेंगा वाळत आहेत. या आठवड्यात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्याला पूर आले होते. तेव्हापासून रिमझिम कमी-अधिक जास्त पाऊस पडत असल्याने मुगाच्या झाडाच्या शेंगांना कोंब फुटत असल्याने एक-दोन दिवसांत पाऊस न थांबल्यास गतवर्षीसारखा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.