शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

रिमझिम पावसामुळे मुगाच्या शेंगांना उभ्या झाडावर फुटले कोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:37 IST

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील ...

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू परिसरात यावर्षी मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रथम चरणात मुगाची पेरणी केली आहे. त्या शेतकऱ्यांचे शेतातील उभ्या मुगाच्या शेंगा भरल्या आहेत. तर काही तोडणीला आल्या आहेत. या आठवड्यात रविवारपासून रिमझिम पाऊस सुरू असल्याने सुकन्याच्या अवस्थेत असलेल्या शेंगांना उभ्या झाडावरच वाळलेल्यासह हिरव्या शेंगांना कोंब फुटत असल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या मार्गावर आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. गतवर्षी सुरुवातीला सोयाबीन पिकाची दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. अखेर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांच्या दरम्यान अतिवृष्टी झाल्याने मूग-उडदासह सोयाबीनच्या झाडावर शेंगांना कोंब फुटल्यामुळे पिकाची नासाडी झाली होती. शेतकऱ्यांनासुद्धा डाळीपुरतेही मूग झाले नव्हते. त्या पिकांना लावलेला खर्च पूर्ण वाया गेला होता. दरम्यान मूग, उडीद या पिकाचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण केले होते; परंतु अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. कोरोना संसर्ग आजाराचे पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे इतर आलेल्या पिकालासुद्धा भाव मिळाला नसल्याने डोक्यावरचे कर्जाचे ओझे सावकाराकडून व्याजाने कर्ज काढून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन चांगल्या उत्पादनाची कास धरत यावर्षी खरीप हंगामातील पेरणी केली.

परिसरात जुलै महिन्यात मध्यंतरी अतिवृष्टी झाल्याने काही शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली आल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. मूग, उडीद, सोयाबीन या पिकांना फुले-शेंगा लागल्या असताना २२ दिवसांची पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला होता. दरम्यान ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी पिकाला वाचवण्याकरिता तुषार सिंचनाद्वारे पाणीसुद्धा दिले होते.

मुगाचे उत्पादन घटणार

बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील मुगाच्या शेंगा भरल्या असून, काही शेतकऱ्यांच्या मुगाच्या शेंगा वाळत आहेत. या आठवड्यात रविवारी जोरदार पाऊस झाल्याने नदी-नाल्याला पूर आले होते. तेव्हापासून रिमझिम कमी-अधिक जास्त पाऊस पडत असल्याने मुगाच्या झाडाच्या शेंगांना कोंब फुटत असल्याने एक-दोन दिवसांत पाऊस न थांबल्यास गतवर्षीसारखा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.