शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

रेशन दुकानदारांना विमा संरक्षण देण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 17:57 IST

प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.

ठळक मुद्देअनुषंगीक प्रस्ताव वित्तविभागाकडे पाठविण्यात आला आहे.व्हीसीमध्ये अन्न व पुरवठा मंत्र्यांकडून संकेत.

बुलडाणा: लॉकडाऊन काळात पुरवठा विभागानेही स्वस्त धान्य दुकानावरून धान्य वितरण वाढविलेले असतानाच या दुकानदारांचा थेट धान्य घेणाºया कुटुंबांशी संपर्क येत असल्याने दुकानदारांनाही विमा संरक्षण देण्यात यावे, या मागणीच्या अनुषंगाने राज्य शासनाने सकारात्मक पावले टाकली असून त्या संदर्भातील प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.नेमका किती रकमेचा हा विमा काढल्या जाऊ शकतो याबाबत स्पष्टता नसली तरी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या व्हीसीमध्ये त्याबाबत सुतोवाच केले आहे. या व्हीसीमध्ये प्रामुख्याने अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने सहभागी झाले होते. बुलडाणा जिल्ह्यात एक हजार ५३६ रेशन दुकानदार असून धान्य वितरणावेळी जिल्ह्यातील साडेपाच लाख कुटुंबांशी संपर्क येतो. हे धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात असले तरी धान्य वितरणावेळी येणारा थेट संपर्क पाहता या रेशन दुकानदारांनाही विमा कवच दिले जावे अशी मागणी जोर धरत होती. कोरोना साथीच्या काळात अन्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना विमा संरक्षण दिल्या जात असताना रेशन दुकानदारांनाही त्याचा लाभ व्हावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. दि. दा. पाटील यांनी जिल्हाधिकाºयांमार्फत पंतप्रधानांकडे केली होती. त्या पृष्ठभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेले हे संकेत महत्त्वपूर्ण म्हणावे लागले. यासंदर्भात १७ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने अनुषंगीक वृत्त प्रकाशीत केले होते.

पुरवठा विभागाच्या व्हीसीमध्ये चर्चाअन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाºयांची बुधवारी व्हीसी घेण्यात आली. या व्हीसीमध्ये अनुषंगीक विषयान्वेय चर्चा झाली असता छगन भुजबळ यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. प्रसंगी पुढील महिन्यात यासंदभा त निर्णय होण्याची शक्यता असून वित्त विभाग याबाबत नेमकी कोणती भूमिका घेते हे स्पष्ट होईल. मात्र यासंदर्भाने रेशन दुकानदारांपर्यंत माहिती पोहोचविण्याबाबतही सांकेतीकस्वरुपात सुचना दिल्या गेल्या असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.