शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

ज्ञानगंगा अभयारण्यावरून उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:57 IST

बुलडाणा : बंदिस्त स्वरुपाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव (राष्ट्रीय महामार्ग) या मार्गावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्यासंदर्भातील संकल्पीत मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला अजिंठा ते खामगाव हा रस्ता ज्ञानगंगा अभयारण्यातून जातो. जड वाहने तथा अज्ञात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे जवळपास सहा ते आठ बिबट ठार झाले होते. परिणामी या मार्गावरील वरवंड फाटा ते बोथा दरम्यान जड तथा प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती.

- नीलेश जोशीबुलडाणा : बंदिस्त स्वरुपाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव (राष्ट्रीय महामार्ग) या मार्गावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्यासंदर्भातील संकल्पीत मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावीत उड्डाणपुलासाठी ५५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम. एस. रेड्डी यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये १७ जुलै रोजी ही बैठक बुलडाण्यात झाली.अलिकडील काळात राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला अजिंठा ते खामगाव हा रस्ता ज्ञानगंगा अभयारण्यातून जातो. मात्र २२ हजार हेक्टरवर पसरलेल्या या अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यावर २०१३ ते २०१५ दरम्यान या मार्गावर जड वाहने तथा अज्ञात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे जवळपास सहा ते आठ बिबट ठार झाले होते. यामध्ये एका गर्भवती बिबटाचाही समावेश होता. परिणामी या मार्गावरील वरवंड फाटा ते बोथा दरम्यान जड तथा प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. सोबतच रात्री दम्यान, ही वाहतूक वरवंड बंगला येथून उंद्री मार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाचा जवळच्या मार्गाने खामगावशी असलेला संपर्क तुटला होता. सोबतच जड वाहतूकीसह आपतकालीन स्थितीत ये-जा करण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या पृष्ठभूमीवर २२ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील समस्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रविण परदेशी यांनी मुंबई मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी आणि बुलडाणा येथे स्थानिक अधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीत सहभागी असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी हा ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अधिकारी व अपर सचिव प्रविण परदेशी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, या रस्त्याच्या संदर्भात एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातंर्गत १७ जुलै रोजी बुलडाण्यात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस सीसीएफ एम. एस. रेड्डी, वन्यजीवचे अकोला येथील उपवनसंरक्षक मनोजुकमार खैरनार, धिरज पाटील, बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे,राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर येथील अधीकारी तथा अन्य काही अधिकारी आणि माजी आमदार विजयराज शिंदेंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.१५ किमीचा उड्डाणपुलज्ञानगंगा अभयारण्यातून जाणार्या मार्गापैकी १५ किलोमीटरचा रस्ता हा अतिसंवेदनशील तथा संवेदनशील क्षेत्रात मोडतो. त्यामुळे अभयारण्यातून जाणार्या या रस्त्यावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सोबच बैठकीचे इतिवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राष्ट्रीय वन्यजीव मंडळास याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. वर्तमान स्थितीत उड्डाणपुलासाठी सुमारे ५५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र उड्डाणपूल उभारण्याच्या दृष्टीने अद्याप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. हा उड्डाणपूल झाल्यास वन्यजीवांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप होणार नाही तथा जिल्हा मुख्यालयाशी घाटाखालील खामगाव परिसरातील भागाचा जवळच्या मार्गाने संपर्क कायम राहील. वाहनांचा वाढलेला अतिरिक्त इंधन खर्च ही वाचेल, असे सुत्रांचे म्हणणे आहे.राष्ट्रीय वन्यजीव मंडळास यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनासही तो पाठविला जाईल. राष्ट्रीय वन्यजीव मंडळ त्यावर योग्य तो निर्णय घेईल.- मनोजकुमार खैरनार, जिल्हा उप वनसंरक्षक (वन्यजीव), अकोला

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य