शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

स्वच्छतेची चळवळ व्हावी; इव्हेन्ट नको

By admin | Updated: November 5, 2014 23:58 IST

लोकमत जागर; फोटोपुरते अभियान उद्देशहीन

बुलडाणा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बुलडाण्याने प्रत्येक वर्षी चमकदार कामगिरी करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. गावागावांत स्वच्छतेची चळवळ उभी राहिली व आजही ही चळवळ बर्‍यापैकी सातत्य टिकून आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान हे अधिक गतिमान होण्याची गरज होती. मात्र, या अभियानाला प्रारंभापासूनच सरकारी चौकट चिटकली. केवळ फोटो काढून हे अभियान सुरू करीत असल्याचे वातावरण सर्वत्र असल्याने स्वच्छ भारत अभियान हा इव्हेंट ठरला असून, ती चळवळ होण्यासाठी मानसिकताच बदलविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे सुरुवात सन २000-२00१ मध्ये करण्यात आली. पहिल्याच वर्षी या अभियानात खामगाव तालुक्यातील पळशी या गावाने बाजी मारली. दुसर्‍या वर्षी वकाणा चमकले, पाळा, बोराळा, धोत्रा नंदई, दत्तपूर, अंत्रज, उबाळखेड, अजिसपूर, मांडवा फॉरेस्ट, राहुड, निरोड, दगडवाडी, खोर अशा अनेक गावांनी या अभियाना त सातत्य ठेवत दरवर्षी आपले नाव अमरावती विभागापर्यंत नेले. तीच शृखंला यावर्षी मडा खेड बु. या गावाने वृद्धिंगत केली आहे. गावागावांत सुरू झालेले हे स्वच्छतेचे वारे संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित होते. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप असल्याने हे अभियान आजही पूर्वीच्या तीव्रतेने नसले तरी आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ भार त अभियान राबविण्याची गरज आहे. स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ औपचारिकता म्हणून या अभियानाकडे न पाहता सर्वांनी आपले योगदान दिले, तर आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ होईल, आरोग्यदायी होईल. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केले तर स्वच्छ भारत अभियान हे लोकांचे आहे व लोकांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सोबतीने ते राबवायचे आहे. त्यामुळे कुणीही या अभियानापासून दूर राहू नये, सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले आहे.