शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

स्वच्छतेची चळवळ व्हावी; इव्हेन्ट नको

By admin | Updated: November 5, 2014 23:58 IST

लोकमत जागर; फोटोपुरते अभियान उद्देशहीन

बुलडाणा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बुलडाण्याने प्रत्येक वर्षी चमकदार कामगिरी करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. गावागावांत स्वच्छतेची चळवळ उभी राहिली व आजही ही चळवळ बर्‍यापैकी सातत्य टिकून आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान हे अधिक गतिमान होण्याची गरज होती. मात्र, या अभियानाला प्रारंभापासूनच सरकारी चौकट चिटकली. केवळ फोटो काढून हे अभियान सुरू करीत असल्याचे वातावरण सर्वत्र असल्याने स्वच्छ भारत अभियान हा इव्हेंट ठरला असून, ती चळवळ होण्यासाठी मानसिकताच बदलविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे सुरुवात सन २000-२00१ मध्ये करण्यात आली. पहिल्याच वर्षी या अभियानात खामगाव तालुक्यातील पळशी या गावाने बाजी मारली. दुसर्‍या वर्षी वकाणा चमकले, पाळा, बोराळा, धोत्रा नंदई, दत्तपूर, अंत्रज, उबाळखेड, अजिसपूर, मांडवा फॉरेस्ट, राहुड, निरोड, दगडवाडी, खोर अशा अनेक गावांनी या अभियाना त सातत्य ठेवत दरवर्षी आपले नाव अमरावती विभागापर्यंत नेले. तीच शृखंला यावर्षी मडा खेड बु. या गावाने वृद्धिंगत केली आहे. गावागावांत सुरू झालेले हे स्वच्छतेचे वारे संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित होते. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप असल्याने हे अभियान आजही पूर्वीच्या तीव्रतेने नसले तरी आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ भार त अभियान राबविण्याची गरज आहे. स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ औपचारिकता म्हणून या अभियानाकडे न पाहता सर्वांनी आपले योगदान दिले, तर आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ होईल, आरोग्यदायी होईल. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केले तर स्वच्छ भारत अभियान हे लोकांचे आहे व लोकांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सोबतीने ते राबवायचे आहे. त्यामुळे कुणीही या अभियानापासून दूर राहू नये, सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले आहे.