शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची चळवळ व्हावी; इव्हेन्ट नको

By admin | Updated: November 5, 2014 23:58 IST

लोकमत जागर; फोटोपुरते अभियान उद्देशहीन

बुलडाणा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात बुलडाण्याने प्रत्येक वर्षी चमकदार कामगिरी करून राज्याचे लक्ष वेधून घेतले. गावागावांत स्वच्छतेची चळवळ उभी राहिली व आजही ही चळवळ बर्‍यापैकी सातत्य टिकून आहे. या पृष्ठभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले स्वच्छ भारत अभियान हे अधिक गतिमान होण्याची गरज होती. मात्र, या अभियानाला प्रारंभापासूनच सरकारी चौकट चिटकली. केवळ फोटो काढून हे अभियान सुरू करीत असल्याचे वातावरण सर्वत्र असल्याने स्वच्छ भारत अभियान हा इव्हेंट ठरला असून, ती चळवळ होण्यासाठी मानसिकताच बदलविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे सुरुवात सन २000-२00१ मध्ये करण्यात आली. पहिल्याच वर्षी या अभियानात खामगाव तालुक्यातील पळशी या गावाने बाजी मारली. दुसर्‍या वर्षी वकाणा चमकले, पाळा, बोराळा, धोत्रा नंदई, दत्तपूर, अंत्रज, उबाळखेड, अजिसपूर, मांडवा फॉरेस्ट, राहुड, निरोड, दगडवाडी, खोर अशा अनेक गावांनी या अभियाना त सातत्य ठेवत दरवर्षी आपले नाव अमरावती विभागापर्यंत नेले. तीच शृखंला यावर्षी मडा खेड बु. या गावाने वृद्धिंगत केली आहे. गावागावांत सुरू झालेले हे स्वच्छतेचे वारे संत गाडगेबाबा व संत तुकडोजी महाराज यांच्या वैचारिक अधिष्ठानावर आधारित होते. लोकांचा सहभाग, त्याला सरकारचा हातभार असे या अभियानाचे स्वरूप असल्याने हे अभियान आजही पूर्वीच्या तीव्रतेने नसले तरी आपले अस्तित्व टिकवून आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ भार त अभियान राबविण्याची गरज आहे. स्वच्छता हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. केवळ औपचारिकता म्हणून या अभियानाकडे न पाहता सर्वांनी आपले योगदान दिले, तर आपला परिसर, गाव, शहर स्वच्छ होईल, आरोग्यदायी होईल. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग घेणे गरजेचे असल्याचे मत आचार्य हरिभाऊ वेरूळकर यांनी व्यक्त केले तर स्वच्छ भारत अभियान हे लोकांचे आहे व लोकांच्या सहकार्याने प्रशासनाच्या सोबतीने ते राबवायचे आहे. त्यामुळे कुणीही या अभियानापासून दूर राहू नये, सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी यांनी केले आहे.