शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जननी’ला हवी सुरक्षा

By admin | Updated: July 10, 2015 00:06 IST

जननी सुरक्षा दिन विशेष; बुलडाणा जिल्ह्यातील ४३८ महिलांच्या प्रसूति घरीच.

बुलडाणा : जननी सुरक्षा योजना केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २00५-0६ या वर्षी सुरू केली. त्यानुसार प्रथम ग्रामीण आणि नंतर नगरपालिकांच्या नागरी क्षेत्रात अंमलबजावणीस मंजुरी मिळाली. गरोदर माता व होणार्‍या बाळाला सुदृढ आरोग्य व सुरक्षा लाभावी, असा योजनेचा उद्देश आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यातील जननीला आता सुरक्षा हवी आहे. कारण गेल्या सहा महिन्यांत ४३८ महिलांची प्रसूती घरीच झाली असून, आदिवासीबहुल गावांमध्ये हा आकडा ८३ चा आहे. जननी सुरक्षा, जननी-शिशू सुरक्षा, नवसंजीवनी अशा अनेक योजनांवर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. या योजना राबविण्यासाठी जिल्हास्तरापासून तर गावपातळीपर्यंत मोठी यंत्रणासुद्धा काम करते. प्रत्यक्षात मात्र ही यंत्रणा केवळ उपचार म्हणून चालविली जात आहे. आजही आदिवासीबहुल गावांमध्ये आरोग्यासंदर्भात जागृती नाही. संग्रामपूर आणि जळगाव जामोद या आदिवासीबहुल तालुक्यांमध्ये घरीच प्रसूती आणि माता-बालक मृत्यूचे प्रमाण मोठे आहे आहेत. दारिद्रय़रेषेखालील मातांना जननी सुरक्षा योजनेत लाभ देण्यात येतो, तर शहरी भागातील अनुसूचित जाती व जमातीच्या गर्भवती मातांनाही आर्थिक लाभ मिळतो. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांत जानेवारी ते जून २0१५ अखेरपर्यत २१ हजार ४८0 गरोदर महिलांची नोंद करण्यात आली. यात जननी व शिशू संपोपनाच्या उद्देशाने जननी सुरक्षा योजनेसाठी १६ हजार ७४२ मातांची निवड करण्यात आली. तथापि, ७३६६ लाभार्थी उद्दिष्ट असताना ४0९९ महिलांनाच योजनेचा लाभ मिळाला आहे.

*४३८ महिलांची प्रसूति घरीच

   गेल्या ६ महिन्यात प्रसुतीची माहिती घेतली असता ४३८ महिलांच्या प्रसूति या घरी झाल्या असल्याचे आढळून आले. यात जानेवारी महिन्यात ८७, फेब्रुवारी महिन्यात ७१, मार्चमध्ये ६२, एप्रिलमध्ये ६८, मे महिन्यात ७१ आणि जून महिन्यात ७९ महिलांची प्रसूति घरी झाल्याची नोंद आहे.

*१0 महिला, १६ बालकांचा मृत्यू

  घरीच प्रसूति होण्याच्या प्रकारात एप्रिल २0१४ ते मार्च २0१५ काळात १0 महिला आणि १६ बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यातून आरोग्य प्रशासनाला ग्रामीण तसेच आदिवासी भागात आरोग्याच्या सुविधांकडे पोहोचविण्यात अपयश आल्याचे लक्षात येते.

*आशामध्ये निराशा

जननी सुरक्षासाठी राबणार्‍या आशा स्वयंसेविका हा मुख्य घटक ग्रामीण भागात काम करते; मात्र जननी सुरक्षा योजनेतून या सेविकांना प्रति लाभार्थी प्रोत्साहन भत्ता दिला जातो; मात्र २0१४-१५चा भत्ता अद्यापही शासनाकडून आशांना मिळाना नसल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर आहे.