शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

स्वच्छ भारत अभियानाला ‘मातृशक्ती’चा हातभार; खामगाव पालिकेचा एकमेव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:45 IST

शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देकचरा घंटागाडीवर चक्क महिला बचत गटाच्या महिलांना नियुक्ती देण्यात आली. अमरावती विभागातील हा एकमेव प्रयोग असल्याचा दावा पालिकेकडून केल्या जात आहे.

- अनिल गवई

खामगाव: ‘हात फिरे तिथे; ‘लक्ष्मी’ वसे’ या ओळीतून जुन्या-जाणत्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा घंटागाडीवर चक्क महिला बचत गटाच्या महिलांना नियुक्ती देण्यात आली. अमरावती विभागातील हा एकमेव प्रयोग असल्याचा दावा पालिकेकडून केल्या जात आहे.

 स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. यासाठी शहराच्या विविध प्रभागात घंटागाडीही लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कचरा उचलण्याच्या प्रक्रीयेला गती मिळाली. त्यानंतर त्याही पलिकडे जावून आता पालिकेने जागेवरच कचºयाचे विलगीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. जागेवर विलगीकरण झालेला कचरा झटपट गोळा करण्यासोबतच घनकचºयाबाबत जनजागृती आणि समुपदेशनासाठी कचरा उचल घंटागाडीवर महिला बचत गटातील महिलांनी नियुक्ती केली आहे. या माध्यमातून शहरातील महिला बचत गटातील काही महिलांना रोजगार देखील मिळाला आहे. 

 

प्रत्येक घंटागाडीवर महिलेची नियुक्ती!

खामगाव शहरातील विविध प्रभागात पालिकेच्यावतीने १८ घंटागाडी वेळापत्रकानुसार फिरतात. घरोघरी फिरून या घंटागाड्या कचरा गोळा करतात. आता या घंटागाड्यांवर महिला बचत गटातील महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्त झाला असून, कचरा विलगीकरणाच्या प्रक्रीयेला आपसूकच गती प्राप्त होत आहे.

बचत गटाच्या महिलांना पीकेव्हीकडून मार्गदर्शन!

खामगाव येथे कचरा विलगीकरण प्रक्रीयेत सहभाग नोंदविणाºया महिलांसाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने ‘प्लास्टिक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात निवड झालेल्या महिलांना अकोला येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेकडून सुरूवातीपासूनच विविध प्रयोग केल्या जात आहेत. घरोघरी कचला उचल प्रक्रीयेत गतीमानता आणण्यासाठी बचत गटातील महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. खामगाव पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग करण्यात येत आहे.

- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, न.प.खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान