शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

स्वच्छ भारत अभियानाला ‘मातृशक्ती’चा हातभार; खामगाव पालिकेचा एकमेव प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:45 IST

शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे.

ठळक मुद्देकचरा घंटागाडीवर चक्क महिला बचत गटाच्या महिलांना नियुक्ती देण्यात आली. अमरावती विभागातील हा एकमेव प्रयोग असल्याचा दावा पालिकेकडून केल्या जात आहे.

- अनिल गवई

खामगाव: ‘हात फिरे तिथे; ‘लक्ष्मी’ वसे’ या ओळीतून जुन्या-जाणत्यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले. स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठीच शासनाकडून ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविण्यात येत असून या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेने आता ‘मातृशक्ती’ची मदत घेण्यास प्रारंभ केला आहे. कचरा विलगीकरणाला गती देण्यासाठी कचरा घंटागाडीवर चक्क महिला बचत गटाच्या महिलांना नियुक्ती देण्यात आली. अमरावती विभागातील हा एकमेव प्रयोग असल्याचा दावा पालिकेकडून केल्या जात आहे.

 स्वच्छ भारत अभियानातंर्गत राज्यातील सर्वच नगर पालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिका प्रशासनाकडून थेट घरातूनच कचरा उचलण्यात येत आहे. यासाठी शहराच्या विविध प्रभागात घंटागाडीही लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे कचरा उचलण्याच्या प्रक्रीयेला गती मिळाली. त्यानंतर त्याही पलिकडे जावून आता पालिकेने जागेवरच कचºयाचे विलगीकरण करण्यास प्रारंभ केला आहे. जागेवर विलगीकरण झालेला कचरा झटपट गोळा करण्यासोबतच घनकचºयाबाबत जनजागृती आणि समुपदेशनासाठी कचरा उचल घंटागाडीवर महिला बचत गटातील महिलांनी नियुक्ती केली आहे. या माध्यमातून शहरातील महिला बचत गटातील काही महिलांना रोजगार देखील मिळाला आहे. 

 

प्रत्येक घंटागाडीवर महिलेची नियुक्ती!

खामगाव शहरातील विविध प्रभागात पालिकेच्यावतीने १८ घंटागाडी वेळापत्रकानुसार फिरतात. घरोघरी फिरून या घंटागाड्या कचरा गोळा करतात. आता या घंटागाड्यांवर महिला बचत गटातील महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बचत गटातील महिलांना रोजगार प्राप्त झाला असून, कचरा विलगीकरणाच्या प्रक्रीयेला आपसूकच गती प्राप्त होत आहे.

बचत गटाच्या महिलांना पीकेव्हीकडून मार्गदर्शन!

खामगाव येथे कचरा विलगीकरण प्रक्रीयेत सहभाग नोंदविणाºया महिलांसाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने ‘प्लास्टिक प्रशिक्षण केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात निवड झालेल्या महिलांना अकोला येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खामगाव पालिकेकडून सुरूवातीपासूनच विविध प्रयोग केल्या जात आहेत. घरोघरी कचला उचल प्रक्रीयेत गतीमानता आणण्यासाठी बचत गटातील महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. खामगाव पालिकेकडून पहिल्यादांच हा प्रयोग करण्यात येत आहे.

- धनंजय बोरीकर, मुख्याधिकारी, न.प.खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान