शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

टँकरच्या शापातून आणखी ८१ गावे मुक्त होणार

By admin | Updated: February 6, 2015 02:10 IST

जलसंधारणाच्या कामांचे नियोजन; राज्य शासनाकडे २४ कोटींची मागणी.

बुलडाणा : पाणीटंचाईग्रस्त अशी ओळख असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील ८१ गावात जलसंधारणाच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे २४ कोटी रुपयांची मागणी केली आहे. जलसंधारण कामासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल ४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील एकूण जलसंधारणाच्या कामासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले. जलसंधारणातून टँकरमुक्तीच्या या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून, आता लवकरच उर्वरित ८१ गावे टँकरच्या शापातून मुक्त होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात राबविलेल्या गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे साठवण क्षमता वाढली. त्याचा लाभ घेण्यासाठी जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला. ज्या १८१ गावांना टँकरचा विळखा बसला होता त्या गावांपैकी पहिल्या टप्प्यात १२१ गावांची निवड करून गावाला पाणीपुरवठा करणार्‍या जलस्त्रोताजवळ सिमेंट नाला बांध, कोल्हापुरी बंधारे व गाव तलावांचे काम पुर्णत्वास नेले, त्यामुळे टँकरग्रस्त गावांची संख्या झपाट्याने घटली आहे. यासंदर्भात ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी सादरीकरण केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आवर्जून दखल घेतली. १८१ गावांपैकी १00 गावे टँकरमुक्त झाली असून, उरलेल्या ८१ गावांसाठी जलयुक्त शिवार योजनेसोबतच जलसंधारणाच्याही कामाचे नियोजन केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यावर उरलेल्या ८0 गावांसाठीही निधी विविध योजनेतून निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तत्काळ ८१ गावांसाठी विविध कामांचा प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी २४ कोटीचा खर्च अपेक्षित आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.प्रवीण कथने आदी उपस्थित होते.