शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
2
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
3
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
4
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
5
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
6
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
7
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
8
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
9
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
10
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
11
'असा पती कुणालाच भेटू नाही', परागचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध, व्हाट्सॲप स्टेट्‍स ठेवून सरिताने...   
12
‘चल धरणावर जाऊया’, तरुणाने तरुणीला व्हॉट्सॲपवर पाठवला मेसेज, त्यानंतर घडलं भयंकर
13
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
14
मोबाईल रिचार्जपेक्षा कमी किमतीत गुगलने लॉन्च केला सर्वात स्वस्त 'AI Plus Plan'! ChatGPT चे मार्केट खाणार?
15
सोशल मीडियाचा नाद लय बेक्कार! मुलांवर घातक परिणाम, अतिरेकी वापर म्हणजे धोक्याची घंटा
16
मज्जा! 'या' गावातल्या बायकांना स्वयंपाकाचं टेंशनच नाही, वाचून म्हणाल 'मलाही तिथे राहायचंय!'
17
तुम्ही हे होऊच का दिले? इंडिगो संकटावर हायकोर्टाने सरकारला फटकारले; प्रवाशांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश
18
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
19
Nagpur Crime: अधिवेशन सुरू असताना नागपुरात रक्ताचा सडा, तरुणाची सपासप वार करत हत्या
20
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी ‘आधुनिक मेघ मल्हार’

By admin | Updated: July 22, 2015 23:44 IST

अनुराधा अभियांत्रिकीचा उपक्रम; पाणी व इंधन बचतीचा दिला संदेश.

चिखली (जि. बुलडाणा): जून महिना कोरडा गेल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली होती. या पार्श्‍वभूमीवर आपल्या भागात पुन्हा अशी वेळ उद्भवू नये तसेच पावसाच्या अनियमततेला मानवी हस्तक्षेप जबाबदार असल्याने किमान आपल्या परिसरात पावसाचा समतोल राखला जावा, यासाठी स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने 'आधुनिक मेघ मल्हार' ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. याअंतर्गत पावसाच्या अनियमिततेस जे घटक कारणीभूत आहेत, त्यासंबंधी आवश्यक उपाय राबविण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्याची सुरुवात १७ जुलै रोजी करण्यात आली. सद्यस्थितीत काही प्रमाणात पाऊस कोसळत असला तरी अद्याप राज्यातील अनेक भाग कोरड्या दुष्काळाच्या छायेत आहेत. पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने पाण्याचे भीषण संकट उभे राहीले असून, शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे. हे संकट एका दिवसात उभे राहिले नसून, याकरिता कारणीभूत अनेक घटकांना निसर्गामध्ये होत असलेला मानवी हस्तक्षेप जबाबदार आहे. पूर्वीच्या काळी पावसाने उघडीप दिल्यास पाऊस पडावा यासाठी राग मेघमल्हार गायिला जायचा. या पार्श्‍वभूमीवर आजच्या या आधुनिक युगात पावसाचा समतोल राखायचा असल्यास ह्यआधुनिक मेघमल्हारह्ण ही अभिनव संकल्पना अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाने राबविण्यास सुरुवात केली आहे. आपल्या भागामध्ये पावसाचा समतोल राखण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाविद्यालयाच्यावतीने पावसाच्या अनियमिततेस जे घटक कारणीभूत आहेत व त्यांच्यावर जे उपाय केले पाहिजेत, असे उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाच्या सर्व विभागामध्ये, मुला-मुलींचे वसतिगृह, कार्यालयांमध्ये इंधन बचत मोहीम हाती घेण्यात आली आहे तसेच ह्यरेन वॉटर हॉर्वेस्टींगह्ण, महाविद्यालय परिसरामध्ये वृक्षरोपण, महाविद्यालय परिसरातील काडी कचरा, कागद आदी जाळून न टाकता त्यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करून झाडांसाठी वापरणे, महाविद्यालयाच्या प्रत्येक घटकाने घरगुती कामासाठी सायकलचा वापर करणे, परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करणे आदी उपक्रमांच्या माध्यमातून इंधन व पाणी बचतीचा संदेश देण्यात येणार आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.