शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीची गाळ मोहीम राज्यासाठी दिशादर्शक!

By admin | Updated: February 25, 2016 01:46 IST

बुलडाणा जिल्हय़ातील पहिली कार्यशाळा; राहुल बोंद्रे यांनी केला निर्धार.

चिखली : गेल्या चार वर्षांंपासून होणार्‍या अत्यल्प पावसामुळे तालुक्यातील सर्वच लहान-मोठे तलाव कोरडे पडले आहेत. पर्यायाने दुष्काळाची झळ सोसावी लागत आहे, ही स्थिती पाहून हवालदिल होण्यापेक्षा दुष्काळाला इष्टापत्ती समजून गतवर्षांप्रमाणे यावर्षीही गाळ काढण्याची मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात येणार असून, सबंध राज्याचे लक्ष वेधल्या जाईल, असा गाळ यावर्षी काढण्यात येणार असल्याचा विश्‍वास आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला. जलयुक्त शिवार अभियानाचा आढावा, तसेच तालुक्यात कोरड्या पडलेल्या जलाशयातील गाळ काढण्यासाठी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात २४ फेब्रुवारी रोजी आ.राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी चंदनसिंग राजपूत, मंडळ कृषी अधिकारी हाके, जि.प.सदस्यद्वय अशोक पडघान, सुमित सरदार, अरविंद देशमुख, पं.स.सभापती सत्यभामा डहाके, उपसभापती कोकीळा परिहार, पं.स.सदस्य विमल लहाने, भानुदास घुबे, लक्ष्मण अंभोरे, राजू पाटील, राम डहाके, किशोर सोळंकी, ज्ञानेश्‍वर सुरूशे यांची प्रमुख उपस्थिती होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने जिल्हय़ातील पहिली कार्यशाळा चिखलीत होत आहे. या कार्यशाळेला गावपतळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवकांची उपस्थिती तसेच अधिकारी व पदाधिकार्‍यांचा सहभाग पाहता जलाशयातील गाळ काढण्यासाठी अधिक सूक्ष्म नियोजन करून तालुक्यातील प्रत्येक जलाशयातील गाळ लोकसहभागातून काढणार असल्याचे आ.बोंद्रे यांनी स्पष्ट केले. प्रसंगी उपस्थित अधिकारी व पदाधिकार्‍यांनीही मार्गदर्शन केले. संचालन वाघ यांनी केले.