शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रस्ता कामाच्या भूमीपूजनाचा बुलडाणा पालिकेचा केवळ देखावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 15:55 IST

पालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची केवळ डागडुजीच केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरातील खड्ड्यांच्या दुखण्यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी केवळ भुमीपूजन करून येथील नगरपालिकेच्या वतीने वेळ मारून नेण्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याच्या भूमीपूजनाला जवळपास महिना उलटूनही अद्याप कामाला सुरूवात करण्यात आली नाही. रस्त्याच्या कडेला केवळ बांधकाम साहित्य टाकून काम सुरू असल्याचा देखावा करण्यात येत असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संपाप व्यक्त होत आहे.बुलडाणा शहरातील काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यांची ही अवस्था आहे. यासंदर्भात नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील तात्पुरत्या मलपट्टीशिवाय ठोस पाऊल पालिकेच्या वतीने उचलण्यात आले नाही. ऐन पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यांची संख्या वाढल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. संगम चौक ते तहसील चौक हा शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता आहे. चिखली व खामगाकडे ये-जा करण्यासाठी जड वाहने वगळता इतर वाहनांसाठी हा जवळचा रस्ता आहे. तहसील कार्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी देखील हाच प्रमुख मार्ग आहे. पालिका प्रशासनाने खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची केवळ डागडुजीच केली. यावर्षी सतत पाऊस सुरू असल्याने दुसऱ्याच दिवशी रस्त्याची जैसे थे अवस्था झाल्याने डागडुजीचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नव्हता. अखेर महिनाभरापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते या रस्ता कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र आतापर्यंत कामास सुरूवात न झाल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. संगम चौक ते तहसील चौक रस्त्याच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल. या रस्त्याचे काम सोपविण्यात आलेल्या ठेकेदाराला यासंदर्भात तत्काळ सूचना देऊन काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतील. नागरिकांची गैरसोय टाळण्याबाबत काळजी घेण्यात येईल.- अभिमन्यू केसकर,अभियंता, नगर परिषद बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणा