शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

मानसिक ताण वाढला मानसिक ताण वाढला, जगायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:36 IST

नोकरी गेली, आता काय करू? कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने गेल्या १४ महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता ...

नोकरी गेली, आता काय करू?

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने गेल्या १४ महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासन, प्रशासनास नाइलाजास्तव जमावबंदी, लॉकडाऊन लावावा लागत आहे़ यामुळे कारखाने, कंपन्या, बाजारपेठेतील दुकाने बंद राहून व्यवसाय ठप्प झालेला आहे. परिणामी, अनेकांच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील अनेक कुटुंबांतील कर्ते पुरुष आहेत. नोकरी गेल्याने आता काय करावे, ही चिंता त्यांता सतावत आहे.

पुरुष सर्वाधिक तणावात

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे महिलांच्या तुलनेत पुरुषच सर्वाधिक तणावात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर नोकऱ्या जाण्याचे गंडांतर आहे. यासह कोरोनाच्या काळातही नोकरीनिमित्त पुरुषांना बाहेर राहावे लागते. घरी परत गेल्यानंतर आपल्यापासून दुसऱ्याला तर हाेणार नाही ना, या भीतीने पुरुषांना ग्रासले आहे़

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?

कुटुंबातील प्रत्येकाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळताना कर्त्या पुरुषांवर कोणतेही संकट आले, तरी ते सहजासहजी व्यक्त होत नाहीत? किंवा चेहऱ्यावरची चिंता घरच्यांना दाखवत नाही, असे मानले जाते. मात्र, कोरोनाच्या संकटाने सर्व मर्यादा उघड केल्या आहेत. रोजगार ठप्प होण्यासह अनेकांना नोकऱ्या हातून निसटल्याने सातत्याने घरातच बसून राहावे लागत आहे. कुटुंबही याबाबत अवगत व्हावे, म्हणून पुरुषही आता मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला लागले आहेत.

तरुणांचे प्रश्‍न वेगळेच

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १४ महिन्यांपासून शिक्षणक्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. ऑनलाइन शिक्षणाची मात्रा प्रभावी ठरली नाही. अशातच २०२१ मधील शैक्षणिक वर्षही संपुष्टात आले,

विशेषत: दहावी, बारावीचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचे दुष्परिणाम हाेत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात असताना आयुष्यातील (एकेक वर्षदेखील कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात अधिक शिक्षणासाठी धडपडणारे तरुण चिंतातुर झाले आहेत. यापुढेही शिक्षणाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात नोकरीचा प्रश्न गंभीर होणार, या विवंचनेत काही तरुण सापडले आहेत.

काेट

काेराेनामुळे मानसिक तणाव वाढला आहे. अनेकांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे़ राेजगार गेल्याने अनेक जण नैराश्येत गेले आहेत़ हे टाळण्यासाठी नकारात्मक गाेष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे़ दूरचित्रवाणीवरील मनाेरंजक कार्यक्रम पाहणे, नियमित व्यायाम करणे, एकमेकांना आधार देणे तसेच सकारात्मक विचार करण्याची गरज आहे़

डाॅ़ महेश बाहेकर, मानसाेपचारतज्ज्ञ