शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

मेहकर : लाखो रुपये खचरूनही सारंगपूरवासी तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:49 IST

सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देपाणी घ्यावे लागते विकत पाण्याची टाकी झाली जीर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर तालुक्यात उन्हाळय़ामध्ये अनेक गावांमध्ये पाणी समस्या निर्माण होत असते. काही गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ज्या गावात सतत पाणीटंचाई निर्माण होते, अशा गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाजल योजना राबविण्यात आली होती; मात्र सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये मेहकर तालुक्यात जवळपास ७0 टक्के गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती व महसूल विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात. ज्या गावात दरवर्षी पाणीटंचाई असते अशा गावामध्ये मागील दोन, तीन वर्षांच्या काळात महाजल योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र या योजनेचा गावकर्‍यांना  फायदा झालेला दिसत नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने महाजल योजना पूर्णपणे रखडली असून शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. असाच प्रकार पैनगंगा नदीच्या तिरावर असलेल्या सारंगपूर गावी पाहायला मिळत आहे. सारंगपूर हे गाव पैनगंगा नदीच्या अगदी काठावर आहे; मात्र या गावात उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये पाणीटंचाई उद्भवते. सारंगपूर येथील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी या गावात महाजल योजना राबविण्यात आली होती. या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. या योजनेंतर्गत विहीर, पाण्याची टाकी, पाइपलाइन ही सर्व कामे केलेली आहेत. विहिरीला पाणीच नाही, पाण्याची टाकी बांधलेली असून, टाकी कित्येक वर्षांपासून कोरडीच आहे. या पाण्याच्या टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, टाकीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. सदर टाकी अतिशय जीर्ण झाल्याने कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. सदर टाकी गावामध्ये बांधलेली असल्याने गावकर्‍यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. गावातील पाणी समस्या मिटावी यासाठी गावकर्‍यांनी संबंधित अधिकार्‍याकडे निवेदने, तक्रारी व काही वेळेस उपोषणही केलेले आहे; मात्र अधिकार्‍यांवर याचा कोणताच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे गावकर्‍यांना खासगी विहिरीवरून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून  चौकशी होऊन जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीसंदर्भात उपाययोजना करावी व पाणी प्रश्न दूर करावा, अशी मागणी होत आहे.   

पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची रासपची मागणीसारंगपूर येथे कित्येक वर्षांपासून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  या टाकीपासून गावकर्‍यांना धोका निर्माण झाला आहे. सदर टाकीची दुरुस्ती करावी अथवा  पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रासपचे मेहकर तालुकाध्यक्ष गजानन बोरकर यांनी तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायतने ठराव देऊनही अधिकार्‍याकडून टाळाटाळसारंगपूर येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा मेहकर यांच्याकडे दिलेला आहे; मात्र अधिकार्‍याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

सारंगपूर येथे महाजल योजनेतून पाण्याची टाकी बांधलेली आहे. सदर टाकी जीर्ण झाल्याने गावकर्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर टाकी पाडावी यासाठी संबंधित विभागाकडे ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे.- दीपक हुंबाड, ग्रामसेवक, सारंगपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkar Bypassमेहकर बायपास