शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

मेहकर : लाखो रुपये खचरूनही सारंगपूरवासी तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 23:49 IST

सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

ठळक मुद्देपाणी घ्यावे लागते विकत पाण्याची टाकी झाली जीर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर तालुक्यात उन्हाळय़ामध्ये अनेक गावांमध्ये पाणी समस्या निर्माण होत असते. काही गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ज्या गावात सतत पाणीटंचाई निर्माण होते, अशा गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाजल योजना राबविण्यात आली होती; मात्र सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये मेहकर तालुक्यात जवळपास ७0 टक्के गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती व महसूल विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात. ज्या गावात दरवर्षी पाणीटंचाई असते अशा गावामध्ये मागील दोन, तीन वर्षांच्या काळात महाजल योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र या योजनेचा गावकर्‍यांना  फायदा झालेला दिसत नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने महाजल योजना पूर्णपणे रखडली असून शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. असाच प्रकार पैनगंगा नदीच्या तिरावर असलेल्या सारंगपूर गावी पाहायला मिळत आहे. सारंगपूर हे गाव पैनगंगा नदीच्या अगदी काठावर आहे; मात्र या गावात उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये पाणीटंचाई उद्भवते. सारंगपूर येथील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी या गावात महाजल योजना राबविण्यात आली होती. या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. या योजनेंतर्गत विहीर, पाण्याची टाकी, पाइपलाइन ही सर्व कामे केलेली आहेत. विहिरीला पाणीच नाही, पाण्याची टाकी बांधलेली असून, टाकी कित्येक वर्षांपासून कोरडीच आहे. या पाण्याच्या टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, टाकीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. सदर टाकी अतिशय जीर्ण झाल्याने कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. सदर टाकी गावामध्ये बांधलेली असल्याने गावकर्‍यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. गावातील पाणी समस्या मिटावी यासाठी गावकर्‍यांनी संबंधित अधिकार्‍याकडे निवेदने, तक्रारी व काही वेळेस उपोषणही केलेले आहे; मात्र अधिकार्‍यांवर याचा कोणताच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे गावकर्‍यांना खासगी विहिरीवरून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून  चौकशी होऊन जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीसंदर्भात उपाययोजना करावी व पाणी प्रश्न दूर करावा, अशी मागणी होत आहे.   

पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची रासपची मागणीसारंगपूर येथे कित्येक वर्षांपासून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  या टाकीपासून गावकर्‍यांना धोका निर्माण झाला आहे. सदर टाकीची दुरुस्ती करावी अथवा  पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रासपचे मेहकर तालुकाध्यक्ष गजानन बोरकर यांनी तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायतने ठराव देऊनही अधिकार्‍याकडून टाळाटाळसारंगपूर येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा मेहकर यांच्याकडे दिलेला आहे; मात्र अधिकार्‍याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

सारंगपूर येथे महाजल योजनेतून पाण्याची टाकी बांधलेली आहे. सदर टाकी जीर्ण झाल्याने गावकर्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर टाकी पाडावी यासाठी संबंधित विभागाकडे ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे.- दीपक हुंबाड, ग्रामसेवक, सारंगपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाMehkar Bypassमेहकर बायपास