शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

मेहकर तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीत नेत्यांचा भरणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:30 IST

सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार्‍यावर आहेत.

ठळक मुद्देकार्यकर्ते वार्‍यावर वरिष्ठांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप!मागोवा राजकारणाचा 

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार्‍यावर आहेत. हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, केवळ पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकर तालुक्याकडे सतत जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने पक्ष वाढण्याऐवजी अधोगतीला जात असल्याचा आरोप दोन्ही पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. वरिष्ठांच्या अशा वागण्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रत्येक निवडणुकीत पराभावाचा सामना करावा लागत आहे.गेल्या कित्येक वर्षानंतर मतदारांनी परिवर्तन घडवून महाराष्ट्र व देशात भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी मतदारांच्या परिवर्तनाला आशीर्वाद समजून, मतदारांनी दिलेल्या कौलचा सन्मान करत, शेतकरी व जनहितासाठी भविष्याच्या दृष्टीने चांगले निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी भाजपची ताकद वाढत आहे; परंतु मेहकर तालुका याला अपवाद ठरत आहे. मेहकर तालुक्यात भाजपची स्थिती दयनीय होत चालली आहे. भाजपने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी शहरात व तालुक्यात कोणतेही जनहिताचे कार्यक्रम राबविले नाहीत  किंवा जनतेच्या मागण्यांसाठी आंदोलने (शिवसेना सत्तेत असूनही जनतेसाठी आंदोलने करते) केली नाहीत. भाजप सरकारच्या विकासाचा अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात भाजपचे पदाधिकारी असर्मथ ठरत आहेत. फक्त विश्रामगृह अथवा एका खोलीत केवळ काही तुरळक पदाधिकारी (कार्यकर्ते नव्हे) थातूर-मातूर बैठक घेतात व स्वत:च्या पदासाठी झगडत असतात, असे अनेक प्रकार मेहकरवासीयांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात अनुभवले आहेत. एखाद्या वरिष्ठ मंत्र्याचा व पदाधिकार्‍याचा वाढदिवस आला की रुग्णांना फळवाटप किंवा झाडे लावण्याचा कार्यक्रम घेऊन मोकळे व्हायचे. मेहकर तालुक्यात भाजपमध्ये अनुभवी, राजकीय जाण असलेला, खंबीर, रोखठोक नेत्याचा अभाव आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या महत्त्वाच्या ठिकाणी भाजपाचा एक सदस्य निवडून आलेला नाही; मात्र भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ यांनी मात्र लहान-मोठे कार्यक्रम घेऊन भाजप जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु मेहकरच्या भाजपमध्ये असलेले गट पाहता मंदाकिनी कंकाळ हय़ सुद्धा अनेक वेळा अडचणीत येतात. कारण अनेक पदाधिकारी हे केवळ मान-सन्मानासाठी काम करीत आहेत. त्या पदाधिकार्‍यांना जनतेचे व भाजप पक्षाचे काही देणे-घेणे नाही. केवळ माझे नाव झाले पाहिजे यासाठी धडपडत आहेत. हा सर्व प्रकार फक्त वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकरकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच घडत आहे. शहरात व ग्रामीण भागात भाजपाचा मतदार वर्ग आहे; परंतु खंबीर नेतृत्व नसल्याने हा मतदार वर्ग संभ्रमात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात कित्येक वर्ष सत्ता भोगली आहे. १0 ते १२ वर्षांच्या अगोदर मेहकर तालुक्यात राष्ट्रवादीची परिस्थिती समाधानकारक होती. शहरात व ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे; परंतु भाजप प्रमाणेच राष्ट्रवादीचीसुद्धा परिस्थिती तशीच आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकरकडे अपेक्षेप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याने या पक्षातसुद्धा नेत्यांचाच भरणा अधिक आहे. राष्ट्रवादीकडून शेतकरी व जनहिताचे प्रश्न घेऊन थोड्याफार प्रमाणात आंदोलने होतात; मात्र काही दिवसाने त्या आंदोलनाचा कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे ही आंदोलने जनतेसाठी होतात, का नेत्यांसाठी होतात हेच मेहकरवासीयांना कळेनासे झाले आहे. तालुकाअध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी मेहकर तालुक्यात जिवंत आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी यांचा एकही सदस्य नाही. राष्ट्रवादीच्या बैठकासुद्धा ठरावीक ठिकाणीच होतात. बैठकीत जनतेसाठी काय विषय झाले, विकासाच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांना कसे धारेवर धरायचे, विरोध कोणत्या मार्गाने करायचा, हे सगळे फक्त बैठकीत बसलेल्या नेत्यांनाच माहिती असते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांना काहीच समजत नाही. दरम्यान, भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता केवळ वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही पक्षाला वरिष्ठ पातळीवर आत्मचिंतनाची गरज असून, फेरबदल करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. तूर्त एवढेच!