शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

मेहकर तालुक्यात भाजप, राष्ट्रवादीत नेत्यांचा भरणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:30 IST

सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार्‍यावर आहेत.

ठळक मुद्देकार्यकर्ते वार्‍यावर वरिष्ठांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप!मागोवा राजकारणाचा 

उद्धव फंगाळ । लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: सध्या भाजपाचे सरकार महाराष्ट्रात व केंद्रात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद सर्वत्र आहे; मात्र भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता या दोन्ही पक्षात मेहकर तालुक्यात नेत्यांचाच भरणा जास्त प्रमाणात दिसत असून, कार्यकर्ते मात्र वार्‍यावर आहेत. हा सर्व प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून, केवळ पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकर तालुक्याकडे सतत जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने पक्ष वाढण्याऐवजी अधोगतीला जात असल्याचा आरोप दोन्ही पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांनी केला आहे. वरिष्ठांच्या अशा वागण्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रत्येक निवडणुकीत पराभावाचा सामना करावा लागत आहे.गेल्या कित्येक वर्षानंतर मतदारांनी परिवर्तन घडवून महाराष्ट्र व देशात भाजपाच्या हाती सत्ता दिली आहे. त्यामुळे भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी मतदारांच्या परिवर्तनाला आशीर्वाद समजून, मतदारांनी दिलेल्या कौलचा सन्मान करत, शेतकरी व जनहितासाठी भविष्याच्या दृष्टीने चांगले निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी भाजपची ताकद वाढत आहे; परंतु मेहकर तालुका याला अपवाद ठरत आहे. मेहकर तालुक्यात भाजपची स्थिती दयनीय होत चालली आहे. भाजपने शेतकरी व सर्वसामान्यांसाठी शहरात व तालुक्यात कोणतेही जनहिताचे कार्यक्रम राबविले नाहीत  किंवा जनतेच्या मागण्यांसाठी आंदोलने (शिवसेना सत्तेत असूनही जनतेसाठी आंदोलने करते) केली नाहीत. भाजप सरकारच्या विकासाचा अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात भाजपचे पदाधिकारी असर्मथ ठरत आहेत. फक्त विश्रामगृह अथवा एका खोलीत केवळ काही तुरळक पदाधिकारी (कार्यकर्ते नव्हे) थातूर-मातूर बैठक घेतात व स्वत:च्या पदासाठी झगडत असतात, असे अनेक प्रकार मेहकरवासीयांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात अनुभवले आहेत. एखाद्या वरिष्ठ मंत्र्याचा व पदाधिकार्‍याचा वाढदिवस आला की रुग्णांना फळवाटप किंवा झाडे लावण्याचा कार्यक्रम घेऊन मोकळे व्हायचे. मेहकर तालुक्यात भाजपमध्ये अनुभवी, राजकीय जाण असलेला, खंबीर, रोखठोक नेत्याचा अभाव आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या महत्त्वाच्या ठिकाणी भाजपाचा एक सदस्य निवडून आलेला नाही; मात्र भाजप महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ यांनी मात्र लहान-मोठे कार्यक्रम घेऊन भाजप जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु मेहकरच्या भाजपमध्ये असलेले गट पाहता मंदाकिनी कंकाळ हय़ सुद्धा अनेक वेळा अडचणीत येतात. कारण अनेक पदाधिकारी हे केवळ मान-सन्मानासाठी काम करीत आहेत. त्या पदाधिकार्‍यांना जनतेचे व भाजप पक्षाचे काही देणे-घेणे नाही. केवळ माझे नाव झाले पाहिजे यासाठी धडपडत आहेत. हा सर्व प्रकार फक्त वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकरकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच घडत आहे. शहरात व ग्रामीण भागात भाजपाचा मतदार वर्ग आहे; परंतु खंबीर नेतृत्व नसल्याने हा मतदार वर्ग संभ्रमात दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात कित्येक वर्ष सत्ता भोगली आहे. १0 ते १२ वर्षांच्या अगोदर मेहकर तालुक्यात राष्ट्रवादीची परिस्थिती समाधानकारक होती. शहरात व ग्रामीण भागात शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे; परंतु भाजप प्रमाणेच राष्ट्रवादीचीसुद्धा परिस्थिती तशीच आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे मेहकरकडे अपेक्षेप्रमाणे दुर्लक्ष होत असल्याने या पक्षातसुद्धा नेत्यांचाच भरणा अधिक आहे. राष्ट्रवादीकडून शेतकरी व जनहिताचे प्रश्न घेऊन थोड्याफार प्रमाणात आंदोलने होतात; मात्र काही दिवसाने त्या आंदोलनाचा कोणताच परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे ही आंदोलने जनतेसाठी होतात, का नेत्यांसाठी होतात हेच मेहकरवासीयांना कळेनासे झाले आहे. तालुकाअध्यक्ष गिरीधर पाटील ठाकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी मेहकर तालुक्यात जिवंत आहे. नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी यांचा एकही सदस्य नाही. राष्ट्रवादीच्या बैठकासुद्धा ठरावीक ठिकाणीच होतात. बैठकीत जनतेसाठी काय विषय झाले, विकासाच्या मुद्यावर सत्ताधार्‍यांना कसे धारेवर धरायचे, विरोध कोणत्या मार्गाने करायचा, हे सगळे फक्त बैठकीत बसलेल्या नेत्यांनाच माहिती असते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांना काहीच समजत नाही. दरम्यान, भाजप व राष्ट्रवादीची मेहकर तालुक्यातील परिस्थिती पाहता केवळ वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही पक्षाला वरिष्ठ पातळीवर आत्मचिंतनाची गरज असून, फेरबदल करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. तूर्त एवढेच!