शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्‍यांना मुख्यालयाची अँलर्जी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:24 IST

मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी  १९ डिसेंबर रोजी दिला आहे.

ठळक मुद्देकारवाई न झाल्यास पं.स. समोर उपोषण राष्ट्रवादी किसान सेलच्या जिल्हा उपाध्यक्षांचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्‍यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा  उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी  १९ डिसेंबर रोजी दिला आहे.तालुक्यातील लोणीगवळी येथे विविध शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, लाइनमन, तलाठी जि.प शाळेचे शिक्षक, कृषी सहायक यासह इतरही कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. सततच्या बाहेर गावावरून येण्या-जाण्यामुळे गावातील विविध विकासकामांवर याचा परिणाम होत आहे. तसेच गावातील अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत. काही नागरिकांना या अधिकार्‍यांच्या मागे फिरावे लागते. सदर कर्मचार्‍यांनी मुख्यालयी राहावे, असे निर्देश असतानाही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेक कर्मचार्‍यांनी गावातून स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टे करून घेतले आहेत. सदर भाडेपट्टय़ाची चौकशी करावी व संबंधित कर्मचार्‍यांना लोणी गवळी येथे मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अन्यथा ३0 डिसेंबर रोजी पंचायत समिती मेहकरच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेना जिल्हा उपाध्यक्ष माधव सखाराम वानखेडे, आरपीआय तालुका कार्याध्यक्ष देवीदास गोविंदराव खंडारे, भास्कर बाजीराव खंडारे, रमेश वानखेडे, भास्कर गवळी, राजेश नवले, सोपान कंकाळ, किसन इंगळे, दत्तात्रय जाधव, डॉ. श्रीराम मेहेत्रे, रामभाऊ कदम, वसंत खंडारे, दीपक गवळी आदींनी दिला आहे. 

रोहयोची कामे मजुरांना द्या!लोणी गवळीसह वरुड, आंधृड, भोसा, उमरा देशमुख या परिसरात रोजगार हमीची कामे ही मजुरांमार्फत होत नाहीत. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांवर उपासमारीची पाळी येते. रोजगार हमींची कामे मजुरामार्फतच करावी, असे शासनाचे निर्देश असतानाही या परिसरातील कामे जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात येतात. अनेक गरीब मजुरांकडून कागदपत्रे घेऊन कामाचे मस्टर भरून घेण्यात येते. यामुळे खर्‍या मजुरांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे रोजगार हमीची कामे मजुरांमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय मेहकरचे तालुका कार्याध्यक्ष, देवीदास गोविंद खंडारे, माधव वानखेडे, जगदीश अवचार आदींनी केली आहे.