शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

दिल्लीत संमेलन म्हणजे ‘इव्हेंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:16 IST

 बुुलडाणा : अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली किंवा हिवरा आश्रम येथे होण्याची शक्यता आहे. सदर संमेलन हे दिल्लीला झाले तर तो केवळ एक इव्हेंट असेल मात्र हिवरा आश्रम येथे झाले तर त्याला खरा रसिकाश्रय मिळेल, त्यामुळे सदर संमेलन हे महाराष्ट्रातच व्हावे, अशी अनेक साहित्यिकांची इच्छा आहे.

ठळक मुद्देअखील भारतीय साहित्य संमेलनराज्यातच घेण्याची साहित्यिकांची इच्छा

विवेक चांदूरकरलोकमत न्यूज नेटवर्क बुुलडाणा : अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे दिल्ली किंवा हिवरा आश्रम येथे होण्याची शक्यता आहे. सदर संमेलन हे दिल्लीला झाले तर तो केवळ एक इव्हेंट असेल मात्र हिवरा आश्रम येथे झाले तर त्याला खरा रसिकाश्रय मिळेल, त्यामुळे सदर संमेलन हे महाराष्ट्रातच व्हावे, अशी अनेक साहित्यिकांची इच्छा आहे.अखील भारतीय साहित्य संमेलनाची स्थळ निश्चिती दहा सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. संमेलनाकरिता दिल्ली, बडोदा आणि हिवरा आश्रम येथील प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी दिल्ली व बडोदा येथील स्थळ पाहणी झाली असून, हिवरा आश्रम येथील स्थळपाहणी ९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलन कोठे घ्यायचे, याची घोषणा करण्यात येणार आहे. अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हावे, अशी इच्छा अनेक साहित्यिकांनी व्यक्त केली आहे. विश्व साहित्य संमेलन हे विदेशात किंवा परराज्यात घ्यायला हवे. मात्र, मराठी जनांच्या अस्मिता जुळल्या असलेले हे संमेलन अन्य राज्यात घेवू नये असा सूर आता उमटत आहे. दिल्ली येथे संमेलन झाले तर तेथे सामान्य किंवा ग्रामीण भागातील साहित्यिक जाणार नाही. तेथे मराठी श्रोते मिळणार नाही. किंवा अधिकारी किंवा कार्यकर्त्यांचा बडेजाव असेल. मोठे नेते संमेलनाला आले तर संमेलनाचा मुळ उद्देश साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया साहित्यिकांनी दिल्या आहेत. घुमान येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात असा अनुभव आला आहे. याबाबत मत व्यक्त करताना साहित्यिक प्रतीमा इंगोले म्हणाल्या, की संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. दिल्लीत झाले तर त्याचा फायदा मराठी माणसांना होणार नाही. हिवरा आश्रम येथे झाले तर ग्रामीण साहित्यिकांना त्याचा फायदा होणार आहे. पुस्तकांचे   प्रदर्शन लागले तर ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. दिल्लीत नेहमीच पुस्तकांचे प्रदर्शन असते. ग्रामीण भागातील नागरिकांना त्याचा जास्त फायदा होईल. तसेच प्रसिद्ध संचालनकर्ते, कवि अजिम नवाज राही म्हणाले, की संमेलन हे बुलडाणा जिल्ह्याला ना. घ. देशपांडे पासून तर सदानंद देशमुखांपर्यंत मोठी साहित्य परंपरा लाभली आहे. त्यामुळे सदर संमेलन हे हिवरा आश्रम येथे व्हायला हवे. संमेलन हिवरा आश्रमला झाले तर हा जिल्हयाचा सन्मान असेल.

सध्याची परिस्थिती पाहता अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. बुलडाणा जिल्ह्याला मोठी साहित्य परंपरा लाभली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यावर अन्यायच झाला आहे. अखील भारतीय संमेलन झाले तर जिल्ह्याला मोठा मान मिळेल. -प्रदीप निफाडकर, साहित्यिक,पुणे

अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. त्यापैकी विश्व मराठी साहित्य संमेलन हे महाराष्ट्राबाहेर झाले तर ठिक आहे. मात्र, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन तर महाराष्ट्रातच व्हायला हवे. अन्य राज्यात संमेलन झाले तर खूप कमी साहित्यिक जातात. सरकारनेही कुणा कुणाचा भार उचलायचा. त्यापेक्षा हिवरा आश्रम येथेच संमेलन व्हायला हवे.- बाबाराव मुसळे, साहित्यिक, वाशिम

साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. संमेलन ज्या ठिकाणी असते, त्या परिसरातील कवी, लेकख, नवोदित साहित्यिक संमेलनात हिरीरीने सहभाग घेतात. नवीन लोक जुळतात. संमेलनाला भरगोस रसिक मिळतात. दिल्लीत झाले तर तेथील पिकनिकसाठी आलेले मराणी माणसे व पैसे देवून नेण्यात आलेल्या साहित्यिकांव्यतिरिक्त कुणीही येणार नाही.- सुरेशकुमार वैराळकर, प्रसिद्ध शाहीर

अखील भारतीय साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातच व्हायला हवे. दिल्लीत केवळ एक ईव्हेंट होईल. त्याला रसिकाश्रय मिळणार नाही. हिवरा आश्रम येथे साहित्य संमेलन आयोजित करण्याकरिता संपूर्ण व्यवस्था आहे. येथे दरवर्षी मोठे संमेलनही आयोजित करण्यात येतात. तसेच महाराष्ट्रात संमेलन झाले तर मराठी श्रोत्यांची गर्दी ओसंडून वाहेल. दिल्लीतील चित्र वेगळे असेल- नरेंद्र लांजेवार, साहित्यिक, बुलडाणा