शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

मस, उतावळी प्रकल्प १00 टक्के भरले!

By admin | Updated: August 28, 2016 23:16 IST

बुलडाणा जिल्ह्यातील मोठय़ा प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा.

बुलडाणा,दि. २८: पावसाळा सुरू होवून अर्धा कालावधी लोटल्यानंतर जिल्ह्याचा काही भागात अद्या पही दमदार पाऊस न पडल्यामुळे भविष्यातील पाणी टंचाईचे संकट कायम आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील मस व उतावळी प्रकल्प १00 टक्के भरले असून इतर प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.जिल्ह्यात दरवर्षी सिंचन व पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. सिंचनामुळे अनेक शेतकर्‍यांना जमिनी चांगल्या असल्यातरी पाणी देता येत नाही. तर पाणीटंचाईमुळे अनेक गावे उन्हाळ्यात होरपळतात. त्यामुळे दरवर्षी पिण्याचा पाण्यासाठी करोडो रूपये खर्च करावे लागतात. शेवटी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. यावर्षी मागिल वर्षापेक्षा दुप्पट पाऊस असला तरी भविष्यात पाणीटंचाईचे संकट पाहता दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जिल्ह्यातील घाटाखालील भागात दमदार पाऊस झाल्यामुळे काही धरणे, प्रकल्प भरली आहेत. त्यात मस, उतावळी धरणाचा समावेश आहे. मात्र घाटावरील परिसरातील प्रकल्पांना अजूनही दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात १९.१0, पेनटाकळी २६.१६ व खडकपूर्णा प्रकल्पात ३४.६७ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकल्पातील पलढग प्रकल्पात ४८.0७, ज्ञानगंगा ४३, मस १00, कोराडी ८१.३५, मन ६४.३८, तोरणा ३७.९0, व उतावळी प्रकल्पात १00 टक्के जलसाठा आहे. तसेच जिल्ह्यात ७४ लघुप्रकल्पात कमी-जास्त प्रमाणात जलसाठा असून दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.मूग बाजारात आल्यानंतर भाव घसरलेसध्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. एका बाजूला शेतकरी निसर्गाशी दोन हात करीत असून दुसर्‍या बाजूला व्यापार्‍यांशी मुकाबला करीत आहे. यापूर्वी मुगाला ८ हजारापर्यंंंंत भाव होता. त्यावेळी शासनाने मुगाचा हमी भाग ५ हजार २00 जाहीर केला होता. मात्र शेतकर्‍यांजवळ मुग नव्हता. त्यामुळे शासनाने मुग आयात केला. त्यामुळे मुगाचे भाव गडगडले. आता शेतकर्‍यांचा मुग घरी येत आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍याच्या मुगाला ४ ते ४ हजार ५00 भाव देण्यात येत आहे. त्यामुळे शे तकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने हमी भावात वाढ करून शेतकर्‍यांसाठी खरेदी केंद्र सुरू करण्याची गरज आहे.