शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची बाजारातील आवक घटली; कांद्याचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव ...

बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव दहा रुपयांनी वाढले आहेत.

पाण्याची पातळी कमी हाेत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी हाेत आहे. त्यामुळे दर रविवारच्या आठवडा बाजारात भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात वाढलेले हाेते. गत आठवड्यात ४० रुपये किलाेने विकल्या गेलेल्या कांद्याचे भाव ५० रुपयांवर पाेहोचले आहेत. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही गेल्या आठवड्यात तुलनेत वाढल्याने सर्वसामान्यंना महागाईचा फटका बसणार आहे.

या आठवड्यात कांदा ४० रुपयांवर आला हाेता. तसेच हिरवी मिरची ४० रुपये किलाे, वांगी ३० रुपये किलो हाेती. या आठवड्यातही हाच भाव कायम आहे. आवक घटल्याने मेथी, पालकचे दर वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे भाव वाढले आहेत. साेयाबीन तेल पाच रुपयांनी कमी झाले आहे. तसेच शेंगदाना तेल आणि सूर्यफूल तेलाचे भाव गत आठवड्याएवढेच आहेत.

गत आठवड्यात साेयाबीन तेल १२० प्रतिकिलाे हाेते. या आठवड्यात भाव कमी हाेऊन ११५ रुपयांवर आले आहेत. तुरीचा हंगाम सुरू असला तरी डाळीचे भाव मात्र दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. तुरीची डाळ १०० रुपये किलाेप्रमाणे विकली जात आहे. येत्या काही दिवसात तूरडाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

द्राक्षांचे भाव घसरले

द्राक्षांची आवक सुरू झाल्यानंतर भाव २०० रुपयांवर गेले हाेते. या आठवड्यात द्राक्षांची आवक वाढल्याने भाव ४० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत. द्राक्ष सध्या १६० ते १५० रुपये प्रतिकिलाेने विकली जात आहेत. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपये किलोवर हाेते. ते कायम आहेत. पपई व संत्र्याच्या दरातही वाढ झाली आहे. गत आठवड्यापासून बाजारात टरबुजाची आवकही वाढली आहे. शेतकरी आपला माल ग्राहकांना विकत आहेत.

द्राक्ष बाजारात दाखल झाल्यानंतर भाव वाढलेले हाेते. या आठवड्यात द्राक्षांची आवक माेठ्या प्रमाणात वाढल्याने ४० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. टरबुजाची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.

- अजीम बागवान, फळ विक्रेता

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. मिरचीचे भाव वाढलेलेच आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलाेने विकला जात आहे. - संताेष इंगळे, भाजी विक्रेता