शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची बाजारातील आवक घटली; कांद्याचे भाव वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:30 IST

बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव ...

बुलडाणा : गत काही दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढलेले आहेत. तसेच कांद्याचे भाव दहा रुपयांनी वाढले आहेत.

पाण्याची पातळी कमी हाेत असल्याने भाजीपाल्याची आवक कमी हाेत आहे. त्यामुळे दर रविवारच्या आठवडा बाजारात भाजीपाल्याचे भाव काही प्रमाणात वाढलेले हाेते. गत आठवड्यात ४० रुपये किलाेने विकल्या गेलेल्या कांद्याचे भाव ५० रुपयांवर पाेहोचले आहेत. फळांचा हंगाम संपत आल्याने दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलही गेल्या आठवड्यात तुलनेत वाढल्याने सर्वसामान्यंना महागाईचा फटका बसणार आहे.

या आठवड्यात कांदा ४० रुपयांवर आला हाेता. तसेच हिरवी मिरची ४० रुपये किलाे, वांगी ३० रुपये किलो हाेती. या आठवड्यातही हाच भाव कायम आहे. आवक घटल्याने मेथी, पालकचे दर वाढले आहेत. फळ बाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रे आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने दर जवळपास दुप्पट झाले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे भाव वाढले आहेत. साेयाबीन तेल पाच रुपयांनी कमी झाले आहे. तसेच शेंगदाना तेल आणि सूर्यफूल तेलाचे भाव गत आठवड्याएवढेच आहेत.

गत आठवड्यात साेयाबीन तेल १२० प्रतिकिलाे हाेते. या आठवड्यात भाव कमी हाेऊन ११५ रुपयांवर आले आहेत. तुरीचा हंगाम सुरू असला तरी डाळीचे भाव मात्र दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. तुरीची डाळ १०० रुपये किलाेप्रमाणे विकली जात आहे. येत्या काही दिवसात तूरडाळीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

द्राक्षांचे भाव घसरले

द्राक्षांची आवक सुरू झाल्यानंतर भाव २०० रुपयांवर गेले हाेते. या आठवड्यात द्राक्षांची आवक वाढल्याने भाव ४० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत. द्राक्ष सध्या १६० ते १५० रुपये प्रतिकिलाेने विकली जात आहेत. डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहेत. गत आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपये किलोवर हाेते. ते कायम आहेत. पपई व संत्र्याच्या दरातही वाढ झाली आहे. गत आठवड्यापासून बाजारात टरबुजाची आवकही वाढली आहे. शेतकरी आपला माल ग्राहकांना विकत आहेत.

द्राक्ष बाजारात दाखल झाल्यानंतर भाव वाढलेले हाेते. या आठवड्यात द्राक्षांची आवक माेठ्या प्रमाणात वाढल्याने ४० ते ५० रुपयांनी कमी झाले आहेत. सफरचंद, माेसंबी व इतर फळेही महागली आहेत. टरबुजाची आवक वाढल्याने भाव कमी झाले आहेत.

- अजीम बागवान, फळ विक्रेता

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. मिरचीचे भाव वाढलेलेच आहेत. कांदा ४० ते ५० रुपये प्रतिकिलाेने विकला जात आहे. - संताेष इंगळे, भाजी विक्रेता