शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

जळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले.

ठळक मुद्देपर्यावरण ग्रुपचा स्तुत्य उपक्रमगोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या गणरायांचे  निर्माल्य गोळा केले 

जयदेव वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले. तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी जामोद वगळता  गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये मोठ- मोठे गणपती विसर्जनाकरीता पूर्णा नदीवर तथा  गोराडा धरणावर आणले होते. यावर्षी मोठय़ा प्रमाणात  पाणीटंचाई असल्याने आधीच धरणामध्ये केवळ २0  टक्के एवढाच जलसाठा आहे. त्यात विसर्जनाचे वेळी  हार-फुले, दहा दिवसांच्या दुर्वा व इतर पुजेचे साहित्य  या निर्माल्यासह धरणात विसर्जन करण्याची सर्वांची  दरवर्षीची परंपरा. परंतु गेल्या ४/५ वर्षापासून  पर्यावरण मित्र याठिकाणी हजर राहून सर्व निर्माल्य  गोळा करतात व त्याची योग्य विल्हेवाट लावतात.  त्यानुसार मंगळवारी दुपारपासून धरणावर एकत्र येवून  विसर्जनासाठी येणार्‍या गणरायांचे निर्माल्य पर्यावरण  मित्रांनी गोळा केले.यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण टाळल्या गेले. तर  केवळ गणपतीच्या मूर्त्यांनाच पाण्यात नेवून विसर्जीत  करण्यात आले. आदिवासींच्या घराघरात आणि प्र त्येक गावात गणरायांची स्थापना झालेली असल्याने  जळगाव शहर, सुनगाव, गोराडा, निमखेडी, चारबन,  डुक्करदरी इत्यादी गावांमधून वाजत गाजत धरणावर  आणून जवळपास एक हजार गणेश मूर्तींचे या धरणात  विसर्जन करण्यात आले.  या धरणामधून जळगाव  शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि हार-फुले,  दुर्वा इत्यादी पुजेचे साहित्य धरणात प्रवाहीत केल्याने  ते कुजते व सडते. परिणामी लाखो लिटर पाणी प्रदूषित  होते. त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर हो तो. एवढेच नव्हे तर या परिसरातील आदिवासींच्या  आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पर्यावरण  मित्रांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वांनी  भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांनी धरणाकाठी पूजा  करून निर्माल्य पर्यावरण प्रेमींच्या स्वाधीन केले.  या तील प्लॅस्टीक पिशव्यांची होळी करून उर्वरीत  निर्माल्य पर्यावरण मित्रांनी एक शेतात विसर्जीत केले.  यासाठी सर्पमित्र शरद जाधव, इंजिनिअर सुनिल भग त, विकी मिश्रा, बाळु मानकर, चतुभरुज केला यांचेसह  अनेक पर्यावरण मित्रांनी परिश्रम घेतले.