शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

जळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले.

ठळक मुद्देपर्यावरण ग्रुपचा स्तुत्य उपक्रमगोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या गणरायांचे  निर्माल्य गोळा केले 

जयदेव वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले. तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी जामोद वगळता  गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये मोठ- मोठे गणपती विसर्जनाकरीता पूर्णा नदीवर तथा  गोराडा धरणावर आणले होते. यावर्षी मोठय़ा प्रमाणात  पाणीटंचाई असल्याने आधीच धरणामध्ये केवळ २0  टक्के एवढाच जलसाठा आहे. त्यात विसर्जनाचे वेळी  हार-फुले, दहा दिवसांच्या दुर्वा व इतर पुजेचे साहित्य  या निर्माल्यासह धरणात विसर्जन करण्याची सर्वांची  दरवर्षीची परंपरा. परंतु गेल्या ४/५ वर्षापासून  पर्यावरण मित्र याठिकाणी हजर राहून सर्व निर्माल्य  गोळा करतात व त्याची योग्य विल्हेवाट लावतात.  त्यानुसार मंगळवारी दुपारपासून धरणावर एकत्र येवून  विसर्जनासाठी येणार्‍या गणरायांचे निर्माल्य पर्यावरण  मित्रांनी गोळा केले.यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण टाळल्या गेले. तर  केवळ गणपतीच्या मूर्त्यांनाच पाण्यात नेवून विसर्जीत  करण्यात आले. आदिवासींच्या घराघरात आणि प्र त्येक गावात गणरायांची स्थापना झालेली असल्याने  जळगाव शहर, सुनगाव, गोराडा, निमखेडी, चारबन,  डुक्करदरी इत्यादी गावांमधून वाजत गाजत धरणावर  आणून जवळपास एक हजार गणेश मूर्तींचे या धरणात  विसर्जन करण्यात आले.  या धरणामधून जळगाव  शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि हार-फुले,  दुर्वा इत्यादी पुजेचे साहित्य धरणात प्रवाहीत केल्याने  ते कुजते व सडते. परिणामी लाखो लिटर पाणी प्रदूषित  होते. त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर हो तो. एवढेच नव्हे तर या परिसरातील आदिवासींच्या  आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पर्यावरण  मित्रांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वांनी  भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांनी धरणाकाठी पूजा  करून निर्माल्य पर्यावरण प्रेमींच्या स्वाधीन केले.  या तील प्लॅस्टीक पिशव्यांची होळी करून उर्वरीत  निर्माल्य पर्यावरण मित्रांनी एक शेतात विसर्जीत केले.  यासाठी सर्पमित्र शरद जाधव, इंजिनिअर सुनिल भग त, विकी मिश्रा, बाळु मानकर, चतुभरुज केला यांचेसह  अनेक पर्यावरण मित्रांनी परिश्रम घेतले.