शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

युवकांनी केले निर्माल्याचे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:11 IST

जळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले.

ठळक मुद्देपर्यावरण ग्रुपचा स्तुत्य उपक्रमगोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या गणरायांचे  निर्माल्य गोळा केले 

जयदेव वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : सातपुड्याच्या  पायथ्याशी  असलेल्या गोराडा धरणावर विसर्जनासाठी आलेल्या  गणरायांचे निर्माल्य गोळा करून पर्यावरण मित्रांनी  धरणाच्या स्वच्छतेबाबत निर्माल्याचे पावित्र्यही जपले. तालुक्यात ५ सप्टेंबर रोजी जामोद वगळता  गणरायांचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये मोठ- मोठे गणपती विसर्जनाकरीता पूर्णा नदीवर तथा  गोराडा धरणावर आणले होते. यावर्षी मोठय़ा प्रमाणात  पाणीटंचाई असल्याने आधीच धरणामध्ये केवळ २0  टक्के एवढाच जलसाठा आहे. त्यात विसर्जनाचे वेळी  हार-फुले, दहा दिवसांच्या दुर्वा व इतर पुजेचे साहित्य  या निर्माल्यासह धरणात विसर्जन करण्याची सर्वांची  दरवर्षीची परंपरा. परंतु गेल्या ४/५ वर्षापासून  पर्यावरण मित्र याठिकाणी हजर राहून सर्व निर्माल्य  गोळा करतात व त्याची योग्य विल्हेवाट लावतात.  त्यानुसार मंगळवारी दुपारपासून धरणावर एकत्र येवून  विसर्जनासाठी येणार्‍या गणरायांचे निर्माल्य पर्यावरण  मित्रांनी गोळा केले.यामुळे धरणातील पाण्याचे प्रदूषण टाळल्या गेले. तर  केवळ गणपतीच्या मूर्त्यांनाच पाण्यात नेवून विसर्जीत  करण्यात आले. आदिवासींच्या घराघरात आणि प्र त्येक गावात गणरायांची स्थापना झालेली असल्याने  जळगाव शहर, सुनगाव, गोराडा, निमखेडी, चारबन,  डुक्करदरी इत्यादी गावांमधून वाजत गाजत धरणावर  आणून जवळपास एक हजार गणेश मूर्तींचे या धरणात  विसर्जन करण्यात आले.  या धरणामधून जळगाव  शहराला पाणी पुरवठा होत असतो आणि हार-फुले,  दुर्वा इत्यादी पुजेचे साहित्य धरणात प्रवाहीत केल्याने  ते कुजते व सडते. परिणामी लाखो लिटर पाणी प्रदूषित  होते. त्याचा परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर हो तो. एवढेच नव्हे तर या परिसरातील आदिवासींच्या  आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून पर्यावरण  मित्रांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाला सर्वांनी  भरभरून प्रतिसाद दिला. सर्वांनी धरणाकाठी पूजा  करून निर्माल्य पर्यावरण प्रेमींच्या स्वाधीन केले.  या तील प्लॅस्टीक पिशव्यांची होळी करून उर्वरीत  निर्माल्य पर्यावरण मित्रांनी एक शेतात विसर्जीत केले.  यासाठी सर्पमित्र शरद जाधव, इंजिनिअर सुनिल भग त, विकी मिश्रा, बाळु मानकर, चतुभरुज केला यांचेसह  अनेक पर्यावरण मित्रांनी परिश्रम घेतले.