शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

वाहनचालकास लुटण्याच्या नादात स्वत:चाच प्राण गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2022 10:59 IST

Crime News : मृतकाचे नाव संजीव भीमराव जाधव (३७, रा. नांद्राकोळी, ता.जि. बुलडाणा) असे आहे.

ठळक मुद्दे अंबाशी फाट्यावर ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न चिखली पोलिसांकडून दोघांना अटक

चिखली : तालुक्यातील अंबाशी फाट्यानजीक शेतात मृतावस्थेत आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीचा खूनच झाल्याचे अखेर निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्यासह आरोपींना अटक तसेच मृतकाची ओळख पटविण्यात चिखली पोलिसांना यश आले आहे. मृतकाचे नाव संजीव भीमराव जाधव (३७, रा. नांद्राकोळी, ता.जि. बुलडाणा) असे आहे.

अंबाशी फाटा परिसरातील एका शेतात मृतक संजीव जाधव याचा मृतदेह ३ डिसेंबर रोजी आढळला होता. धारदार शस्त्राने वार करून हत्या झाल्याचा संशय होता. मात्र, मृतकाची ओळख पटली नसल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी आव्हान ठरले होते. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मृतकाची ओळख पटविण्यासह या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित म्हणून बुलडाणा तालुक्यातीलच सव येथील गोपाल लव्हाळे (२५) यास ३ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. चिखली पोलिसांनी नांद्राकोळी येथीलच भारत गजानन विरसिद (२८) यास देखील अटक केली आहे. भाड्याने बोलविलेल्या वाहनचालकाचे दागिने लुटण्याच्या नादात मृतकाने स्वत:चाच जीव गमावल्याची बाब या प्रकरणात समोर आली आहे.

असे घडले हत्याकांड

मुख्य आरोपी गोपाल लव्हाळे याच्याकडे कार आहे. व तो ती कार भाड्याने चालवितो. याची माहिती मृतक संजीव जाधव व या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी भारत वीरसिद या दोघांना होती. ते दोघे २ डिसेंबर रोजी चिखली येथे आले होते. त्यांनी आरोपी लोखंडेची कार भाड्याने केली होती. आरोपी गाडीसमवेत अंबाशी फाटा येथे पोहोचल्यानंतर मृतक संजय व भारत हे दोघे गोपालच्या कारमध्ये बसले. मात्र दोघांची नजर गोपाल याच्याकडील अंगठी व चेनवर पडली. तेथून जवळच असलेल्या काटोडा या गावाकडे गाडी नेण्यास सांगून रस्त्यावर दोघांनी शौचास जायचे आहे, असे सांगून गाडी थांबवायला सांगितली. यावेळी गोपालच्या अंगावरील दागिने चाकूचा धाक दाखवित हिसकावण्याचा प्रयत्न संजय आणि भारतने केला. यावेळी झालेल्या झटापटीत गोपालने भारतच्या हातातील चाकू हिसकावला आणि मृतक संजीव याच्यावर वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हे पाहून भारत घटनास्थळावरून पळून गेला. तसेच मुख्य आरोपीनेदेखील तेथून पळ काढल्याची माहिती आहे.

असा झाला उलगडा

सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना अंबाशी येथील प्रकाश देशमुख यांच्या शेतात मृतदेह दिसल्याने घटना ही उघडकीस आली. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांनी धाव घेत पंचनामा करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सव येथून गोपालला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याशी झटापट करणाऱ्या दोघांना तो ओळखत नसल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. दरम्यान मोबाइल नंबरच्या आधारे रात्री ११ वाजता चिखली पोलीस नांद्रकोळी येथे पोहोचले. त्यानंतर मृतकाची ओळख पटली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbuldhanaबुलडाणा