शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

कोरोना फायटर्सना साधने उपलब्ध करून द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:04 IST

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  कोरोना फायटर्स म्हणून अत्यावश्यक सेवा देणाºया महानगर पालिका, नगर पालिका आणि ...

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव:  कोरोना फायटर्स म्हणून अत्यावश्यक सेवा देणाºया महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना तात्काळ कोरोना ‘सेफ्टी’ साहित्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी दिलेत. त्यामुळे राज्यातील  पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेने औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील २७ महानगर पालिकेतील कर्मचाºयांसोबतच ३५७ नगर पालिका आणि नगर पंचायतील सफाई कर्मचारी आणि कर्मचारी ‘कोरोना’ फायटर्स म्हणून सेवादेत आहेत. अशा आपात कालीन परिस्थितीत राज्य शासनाकडून या कोरोना फायटर्संना जीवन विमा सुरक्षा आणि कोरोना विरोधात लढा देण्यासाठी विविध सेप्टी उपकरणांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरूवातीला शासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी काळीफित आंदोलन करण्यात आले. दरम्यान, राज्य शासनाने महापालिका आणि नगर पालिकाक्षेत्रातील कर्मचाºयांना विमा सुरक्षेपासून दुर्लक्षीत केले. त्यामुळे महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात अ‍ॅड. अमित देशपांडे यांच्यामाध्यमातून याचिका दाखल केली. यामध्ये गुरुवार ३० रोजी सुनावणी झाली. यात कोरोना फायटर्स म्हणून लढणाºया पालिका कामगारांना तात्काळ सेफ्टी उपकरण (हातमोजे, सॅनिटायझर्स आणि इत्यादी) साहित्य पुरविण्याचे निर्देश दिले. महानगर पालिका, नगर पालिका , नगर पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा उपकरणे तात्काळ उपलब्ध करून देण्याचे कर्तव्य असल्याचे बजावले.

  १८ मे रोजी पुढील सुनावणी! पालिका कर्मचाºयांचा जीवन विमा आणि सुरक्षा संसाधनासंबधीत उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर १८ मे २०२० रोजी सुनावणी ठेवली आहे. न्यायालयाने पहिली मागणी मान्य केल्याने महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संघटनेत आनंद व्यक्त होत आहे. राज्य शासनाने आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि ग्रामविकास विभागातील कर्मचाºयांचा यापूर्वीच विमा उरविला आहे. मात्र, पालिका कर्मचाºयांना डावलण्यात आल्याने, संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील पालिका कर्मचाºयांना मोठा दिलासा दिला आहे. यामाध्यमातून पहिली लढाई आम्ही जिंकली आहे. संघटनेची मागणी कर्मचारी हिताची आहे. शासनाने पालिका कर्मचाºयांवर अन्याय केला आहे. त्यामुळे  १८ मे रोजी दुसरी लढाई देखील जिंकणार असल्याचा विश्वास आहे.

- विश्वनाथ घुगे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संघटना, महाराष्ट्र ---

टॅग्स :khamgaonखामगावHigh Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या