शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव पाणी पुरवठा योजनेची ‘पीएमसी’म्हणून मजीप्राचा नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 15:12 IST

वाढीव पाणी पुरवठा योजनेतील अडथळ्यांच्या शर्यतीत आणखी एक भर पडल्याचे दिसून येते.

- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: युआयडीएसएसएमटी योजनेतंर्गत खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून यापुढे काम करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडून नकार देण्यात आला आहे. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजनेतील अडथळ्यांच्या शर्यतीत आणखी एक भर पडल्याचे दिसून येते. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या या पत्रामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.खामगाव शहरातील पाणी समस्येवर मात करण्यासाठी अतिशय महत्वांकाक्षी योजना खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेला राज्य शासनसाच्या ‘यूआयडीएसएसएमटी’ योजनेतंर्गत सन २००८-०९ मध्ये मंजुरी देण्यात आली. मात्र, सुरूवातीपासूनच वाढीव पाणी पुरवठा योजनेला अडथळ्यांचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे मंजुरी मिळून दहा वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही ही योजना पुर्णत्वास येवू शकली नाही. दरम्यान, आता खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून काम काढून घेण्यासंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधीकरण उपविभाग खामगावच्या सहाय्यक अभियंता विद्या कानडे यांनी पालिकेस पत्र दिले आहे. यापत्रामध्ये खामगाव नगर पालिकेने पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे नियोजन आपल्या स्तरावर करून महाराष्ट्र जीवन प्राधीकरणास अवगत करण्यासही सुचविले आहे. त्यामुळे आधीच लांबणीवर पडलेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गी लावावे तरी कसे? असा नवापेच पालिका प्रशासनासमोर उभा राहीला आहे.तांत्रिक अडचणीमुळे गती मंदावली!वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राची जागा उशीराने ताब्यात मिळणे, वन विभाग, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे विभागाच्या आवश्यक परवानगी उशिराने प्राप्त झाल्याने वाढीव पाणी पुरवठा योजना विहित कालावधीत पूर्ण होवू शकली नाही. त्यामुळे कंत्राटदार कंपनीने झालेल्या विलंबामुळे निर्माण झालेल्या दर फरकाची मागणी केली. निविदेतील अटिशर्ती नुसार दरवाढ देय नसल्याने तसेच नगर पालिका आणि कंत्राटदार यांच्या नियंत्रणाबाहेरील कारणाने पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले आहे.

५० कोटींचा खर्च ‘पाण्यात’!खामगाव शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाल्यापासून आतापर्यंत या योजनेवर तब्बल ५० कोटी पेक्षा जास्त रुपयांचा खर्च झाला आहे.. वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा विनियोग योग्यप्रकारे होत नसल्याचे चित्र या निमित्ताने दिसून येते.

 

 

टॅग्स :khamgaonखामगाव