शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'मागेल त्याला शेततळे' योजनेत गौडबंगाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 14:49 IST

संग्रामपुर : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. मात्र संग्रामपुर तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाला असुन नको त्या ठिकाणी शेततळे खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपुर : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली. मात्र संग्रामपुर तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाला असुन नको त्या ठिकाणी शेततळे खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे.कामाचे निकष व मापदंड वेशीला टांगुन तालुका कृषी विभागाने महत्वकांक्षी योजनेला हरताळ फासला. तालुक्यात सन २०१५-१६ ते २०१८-१९ या चार आर्थिक वर्षात ४१९ शेततळे खोदले. यावर १ कोटी ९७ लाख २८ हजार ५६९ रूपये खर्च करण्यात आला. मात्र याचा उपयोग होतांना दिसत नाही. ४ वर्षांपासून कोट्यवधी रूपये खर्च होऊनसुध्दा तालुका पाणिदार झाला नाही. दुष्काळ मुक्तीसाठी शासनाने अस्तित्वात आणलेली योजना प्रशासनाच्या कागदी घोड्यांमुळे कुचकामी ठरली. १३ योजनांच्या एकत्रीकरणातून अभियान ५ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयानुसार सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र- २०१९ या संकल्पनेतून जलयुक्त शिवार अभियान ही योजना पुढे आली. १३ शासकीय योजनांचे एकात्मीकरण असलेल्या या योजनेत कामे आहेत. साखळी बंधाऱ्यासह नाला खोलीकरण व रुंदीकरण, पाणलोट विकास, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर) कामांची दुरुस्ती, नूतनीकरण व पुनर्स्थापना, नव्या-जुन्या सर्व प्रकारच्या छोट्या तलावांमधून गाळ काढणे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांची सिंचन क्षमता प्रत्यक्ष वापरात येण्याकरिता उपाययोजना करणे, छोटे नाले, ओढे, जोड प्रकल्प, विहीर व बोअरवेल यांचे पुनरुज्जीवन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण आणि कालवा दुरुस्ती ही कामे एकात्मिक पद्धतीने होणे अपेक्षित होते. परंतु संग्रामपुर तालुक्यात ही कामे खरंच या पद्धतीने झाली का असा प्रश्न कायम आहे. शेततळे खोदले परंतु बहुतांश ठिकाणी कामे संशयाच्या भोवºयात सापडली आहेत. त्यामुळे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने जलयुक्त शिवार अंतर्गत झालेल्या या कामांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.कागदोपत्री कामे झाली पूर्ण!कृषी विभागाने संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द, कवठळ, बोडखा, कुंभारखेड, कोद्री, काकोडा, तामगाव, नेकनामपुर, वरवट बकाल, काथरगाव, उकळी बु., वानखेड, चांगेफळ, चोंडी, भिलखेड, खेळदळवी, पातुर्डा आदी शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदुन काम केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे, असा आरोप शेतकरी करीत आहेत.

संग्रामपूर तालुक्यातील जलसंधारणाच्या कामाची दखल घेण्यात येईल. याबाबत निश्चित चौकशी करण्यात येईल.- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूरgovernment schemeसरकारी योजना