शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 00:47 IST

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे.

लोणार : जिल्ह्याचे नव्हे, तर जागतिक वैभव असलेल्या लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला नोव्हेंबर २०२० मध्ये प्राप्त झालेला ‘रामसर’ दर्जा धोक्यात आला आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर फेरमूल्यांकन करण्यासाठी आलेल्या चेन्नई येथील पाच संशोधकांच्या पथकाच्या प्रमुख डॉ. काकोली बॅनर्जी यांनी हा संकेत दिला आहे. या युनिक वेटलॅण्डची दुरवस्था पाहून त्यांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला. नबीच्या नाल्यातून सरोवरात जाणारे सांडपाणी प्रामुख्याने यास जबाबदार असल्याचे मत संशोधकांचे आहे.

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. निरीनेच त्याची निर्मिती केली होती. नागपूर खंडपीठामध्येही दाखल एका प्रकरणात वारंवार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरीही त्याचे काय आम्हाला, अशी मानसिकता बनली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम करताना निरीने भविष्यातील लोणार शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार न करताच कमी क्षमतेच्या या प्रकल्पाचे बांधकाम केल्याचा सूर आहे. शहराची आज ४० हजार लोकसंख्या झाली आहे. लोणार शहरात होणाऱ्या पाण्याच्या वापरापैकी ६५ टक्के सांडपाणी नबीच्या नाल्याद्वारे पूर्वीही आणि आताही जात आहे.

या नाल्यावरील सांडपाणी विशिष्ट वनस्पतीच्या मुळाच्या साहाय्याने १४ टँकमध्ये जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतरत्र पंपाद्वारे उपसा करण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे काही येथे होत नाही. उभारण्यात आलेला प्रकल्प कुचकामी असून पाऊस पडल्यानंतर येथील पाणी अेाव्हर फ्लो होऊन घाणीसह हे सांडपाणी सरोवरात जातच आहे.

जैवविविधतेवर विपरीत परिणाम -सरोवरात जाणाऱ्या या सांडपाण्यामुळे विवरातील दुर्मीळ जैविक संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सोबतच सरोवराच्या पाण्याचा पीएचमध्येही फरक पडत आहे. दरम्यान, हा प्रकल्प अद्यापही निरीच्या ताब्यात आहे की पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे, याबाबत संभ्रम आहे. जबरदस्तीने तो पालिकेकडे दिला गेल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. या प्रकल्पावर देखभाल-दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च झाला असून प्रकल्पातील पाणी उपसा करून नेमके कोठे सोडण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

नबीच्या नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नियमीत मोठ्या प्रमाणावर घाण सरोवरात जात आहे. त्यामुळे या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्थेवर आघात हो असल्याचे प्राथमिक स्तरावरील पहाणीत आढळून आले आहे. या रामसर वेटलॅन्ड साईटचे संवर्धन गरजेचे आहे.डॉ. काकोली बॅनर्जी, संशोधक, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल मॅनेटमेंट (चेन्नई) 

टॅग्स :buldhanaबुलडाणा