शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दर्जाहीन सांडपाणी प्रकल्पामुळे ‘लोणार’चा रामसर दर्जा धोक्यात! दीड कोटीचा खर्च पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 00:47 IST

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे.

लोणार : जिल्ह्याचे नव्हे, तर जागतिक वैभव असलेल्या लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराला नोव्हेंबर २०२० मध्ये प्राप्त झालेला ‘रामसर’ दर्जा धोक्यात आला आहे. हा दर्जा मिळाल्यानंतर फेरमूल्यांकन करण्यासाठी आलेल्या चेन्नई येथील पाच संशोधकांच्या पथकाच्या प्रमुख डॉ. काकोली बॅनर्जी यांनी हा संकेत दिला आहे. या युनिक वेटलॅण्डची दुरवस्था पाहून त्यांनी आश्चर्य आणि खेद व्यक्त केला. नबीच्या नाल्यातून सरोवरात जाणारे सांडपाणी प्रामुख्याने यास जबाबदार असल्याचे मत संशोधकांचे आहे.

विशेष म्हणजे सरोवरात जाणारे शहरातील हे सांडपाणी रोखून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट तब्बल दीड कोटी रुपये खर्च करूनही दर्जाहीन तथा निष्क्रिय आहे. निरीनेच त्याची निर्मिती केली होती. नागपूर खंडपीठामध्येही दाखल एका प्रकरणात वारंवार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. तरीही त्याचे काय आम्हाला, अशी मानसिकता बनली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम करताना निरीने भविष्यातील लोणार शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार न करताच कमी क्षमतेच्या या प्रकल्पाचे बांधकाम केल्याचा सूर आहे. शहराची आज ४० हजार लोकसंख्या झाली आहे. लोणार शहरात होणाऱ्या पाण्याच्या वापरापैकी ६५ टक्के सांडपाणी नबीच्या नाल्याद्वारे पूर्वीही आणि आताही जात आहे.

या नाल्यावरील सांडपाणी विशिष्ट वनस्पतीच्या मुळाच्या साहाय्याने १४ टँकमध्ये जमा करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी इतरत्र पंपाद्वारे उपसा करण्यात येत होते. प्रत्यक्षात तसे काही येथे होत नाही. उभारण्यात आलेला प्रकल्प कुचकामी असून पाऊस पडल्यानंतर येथील पाणी अेाव्हर फ्लो होऊन घाणीसह हे सांडपाणी सरोवरात जातच आहे.

जैवविविधतेवर विपरीत परिणाम -सरोवरात जाणाऱ्या या सांडपाण्यामुळे विवरातील दुर्मीळ जैविक संस्थेवर विपरीत परिणाम होत आहे. सोबतच सरोवराच्या पाण्याचा पीएचमध्येही फरक पडत आहे. दरम्यान, हा प्रकल्प अद्यापही निरीच्या ताब्यात आहे की पालिकेकडे हस्तांतरित झाला आहे, याबाबत संभ्रम आहे. जबरदस्तीने तो पालिकेकडे दिला गेल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. या प्रकल्पावर देखभाल-दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च झाला असून प्रकल्पातील पाणी उपसा करून नेमके कोठे सोडण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

नबीच्या नाल्यावरील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून नियमीत मोठ्या प्रमाणावर घाण सरोवरात जात आहे. त्यामुळे या पाण्यातील दुर्मिळ जैविक संस्थेवर आघात हो असल्याचे प्राथमिक स्तरावरील पहाणीत आढळून आले आहे. या रामसर वेटलॅन्ड साईटचे संवर्धन गरजेचे आहे.डॉ. काकोली बॅनर्जी, संशोधक, नॅशनल सेंटर फॉर कोस्टल मॅनेटमेंट (चेन्नई) 

टॅग्स :buldhanaबुलडाणा