शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Lok Sabha Election 2019 : तीर्थक्षेत्र विकासाच्या आश्वासनांचा दुष्काळात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 13:23 IST

लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.

- ब्रम्हानंद जाधव  बुलडाणा: जिल्ह्याला तीर्थक्षेत्रांचे वैभव लाभलेले आहे. अनेक हेमाडपंती शिव मंदिराचा मौल्यवान वारसाही जिल्ह्यात पाहावयास मिळतो. परंतू तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील भक्तांच्या भावनेशी जोडलेल्या गेलेली तीर्थक्षेत्रे सोयीसुविधांनी युक्त असावी, यासाठी अनेक दिवसांपासून भक्तांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. तर काही ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील काही तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जवळपास प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरुन केली जावू शकतात. तीर्थक्षेत्र परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, भक्तनिवास व अन्य सुविधांच्या संदर्भात विकासकामे मंजूर आहेत. तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही कामांना मुहूर्त का मिळत नाही, असा सवालही भक्तवर्गांमधून होत आहे.तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या यात्रा, उत्सवामध्ये राजकिय लोकांना प्राधान्य दिल्या जाते. त्यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करणे, त्यांचे भाषण ठेवली जातात. त्यामुळे यासारख्या धाार्मिक कार्यक्रमातूनही लोकप्रतिनिधी राजकारणाची पोळी भाजून घेतात. तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचे आश्वासन दिल्यानंतर परत तो लोकप्रतिनिधी त्या तीर्थक्षेत्राकडे वर्षभर फिरकूनही पाहत नाही. मध्यंतरी ज्या तीर्थक्षेत्रासाठी विकास निधी मंजूर झाला होता, तो कामासाठी वळती करण्यात जीएसटीचा खोडा निर्माण झाला होता. तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची गरज भक्तांमधून व्यक्त होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यामधून पंढरपूर, पैठण, आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांची भरपूर संख्या आहे. मात्र या वारकरी भाविकांना मिळणाºया सोयीसुविधा खूपच अल्प प्रमाणात आहेत. वाटचालीच्या मार्गातल्या रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झालेली आहे. या सर्व समस्या सोडविणे आवश्यक आहे.- गोपाल महाराज पितळे, सदस्यराज्य कार्यकारीणी, वारकरी महामंडळ

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र हे भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. परंतू या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवरून कामे होणे आवश्यक आहे. पंढरपूर, आळंदी येथे जाणाºया वारकºयांची संख्या लक्षात घेता वारकºयांच्या दृष्टीनेही शासनाकडून प्रयत्न करण्यात यावे.- लक्ष्मण महाराज देशमुख,आळंदीकर (घटनांद्रा, ता. मेहकर).

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणा