शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Lok Sabha Election 2019 : तीर्थक्षेत्र विकासाच्या आश्वासनांचा दुष्काळात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 13:23 IST

लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.

- ब्रम्हानंद जाधव  बुलडाणा: जिल्ह्याला तीर्थक्षेत्रांचे वैभव लाभलेले आहे. अनेक हेमाडपंती शिव मंदिराचा मौल्यवान वारसाही जिल्ह्यात पाहावयास मिळतो. परंतू तीर्थक्षेत्रांच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असून लोकसभा निवडणुकीच्या पृष्टभूमीवर दुष्काळातही विकासाच्या आश्वासनांचा पाऊस तीर्थक्षेत्रावर होत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होणार तरी केव्हा, असा संतप्त सवाल भाविकांमधून व्यक्त होत आहे.जिल्ह्यातील भक्तांच्या भावनेशी जोडलेल्या गेलेली तीर्थक्षेत्रे सोयीसुविधांनी युक्त असावी, यासाठी अनेक दिवसांपासून भक्तांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. तर काही ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे पडून आहेत. गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील काही तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. जवळपास प्रत्येकी दोन कोटी रुपयांपर्यंतची कामे याठिकाणी प्रशासकीय स्तरावरुन केली जावू शकतात. तीर्थक्षेत्र परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, भक्तनिवास व अन्य सुविधांच्या संदर्भात विकासकामे मंजूर आहेत. तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्यानंतरही कामांना मुहूर्त का मिळत नाही, असा सवालही भक्तवर्गांमधून होत आहे.तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणाऱ्या यात्रा, उत्सवामध्ये राजकिय लोकांना प्राधान्य दिल्या जाते. त्यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करणे, त्यांचे भाषण ठेवली जातात. त्यामुळे यासारख्या धाार्मिक कार्यक्रमातूनही लोकप्रतिनिधी राजकारणाची पोळी भाजून घेतात. तीर्थक्षेत्राच्या विकास कामांचे आश्वासन दिल्यानंतर परत तो लोकप्रतिनिधी त्या तीर्थक्षेत्राकडे वर्षभर फिरकूनही पाहत नाही. मध्यंतरी ज्या तीर्थक्षेत्रासाठी विकास निधी मंजूर झाला होता, तो कामासाठी वळती करण्यात जीएसटीचा खोडा निर्माण झाला होता. तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याची गरज भक्तांमधून व्यक्त होत आहे.

बुलडाणा जिल्ह्यामधून पंढरपूर, पैठण, आळंदीला जाणाऱ्या वारकऱ्यांची भरपूर संख्या आहे. मात्र या वारकरी भाविकांना मिळणाºया सोयीसुविधा खूपच अल्प प्रमाणात आहेत. वाटचालीच्या मार्गातल्या रस्त्यांची अनेक ठिकाणी दुरवस्था झालेली आहे. या सर्व समस्या सोडविणे आवश्यक आहे.- गोपाल महाराज पितळे, सदस्यराज्य कार्यकारीणी, वारकरी महामंडळ

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र हे भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहेत. परंतू या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवरून कामे होणे आवश्यक आहे. पंढरपूर, आळंदी येथे जाणाºया वारकºयांची संख्या लक्षात घेता वारकºयांच्या दृष्टीनेही शासनाकडून प्रयत्न करण्यात यावे.- लक्ष्मण महाराज देशमुख,आळंदीकर (घटनांद्रा, ता. मेहकर).

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणा