शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

Lok Sabha Election 2019 : मतविभाजनावर युती आघाडीचे भवितव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:17 IST

बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत.

- नीलेश जोशी  बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत. १२ व्या लोकसभेपासून मतविभाजन हा बुलडाणा लोकसभा निवडणुकीमधील कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे यंदा मतविभाजनाचा फॅक्टर नेमकी कोणती राजकीय समिकरणे बिघडवतो या मुद्द्यावर राजकीय जाणकारांसह उमेदवारांचेही चिंतन सुरू आहे. त्यातच घटत्या सरासरी मतदानाच्या टक्केवारीमुळेही मतविभाजनाचा फॅक्टर प्रबळ बनत चालला आहे.गेल्या पाच निवडणुकांचा विचार करता १९९८ चा अपवाद वगळता बुलडाणा लोकसभा मतदार संघात सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे बुलडाणा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला अलिकडील काळात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली नकारात्मकतेची लाट ही त्यांना कितपत मायनस करते यावरही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून व्युव्हरचना आखण्यात येत असतानाच मतविभाजनाचा आपल्यास कसा फायदा पोहोचतो यादृष्टीने युतीचे उमेदवार व्युव्हरचना आखत आहेत. त्यांच्या भाषणातील आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून ही बाब प्रतिबिंबीत होते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यंदाच्या निवडणुकीमधील तिसरा उमेदवार असून या उमेदवारास कितपत जनाधार मिळतो या मुद्द्यावरही सध्या राजकीय वर्तुळात काथ्याकुट सुरू आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे. २००९ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघ खुला झाल्यानंतर हे दोघे पहिल्यांना एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी ३.२९ टक्के मताच्या फरकाने विद्यामान खासदारांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर मात केली होती. मात्र त्याच तिसर्या आणि चौथ्या नंबरच्या उमेदवारांनी १४.५२ टक्के मते घेतल्याने आघाडीला मतविभाजनाचा मोठा फटका बसला होता. यात बीएसपीचा ९.५८ टक्के अर्थात ८१ हजार ७६३ मतांचा मोठा वाटा होता.२००४ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि माजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मुकूल वासनिक यांच्यातील तुल्यबळ लढतीमध्येही काँग्रेला ६.७७ टक्के मतविभाजानाचा फटका बसत आनंदराव अडसूळ असूळ विजयी झाले होते. भारीप-बमस, बसपा आणि एका अपक्षाने त्यावेळी एकूण मतदानाच्या ६.७७ टक्के मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला ७.८७ टक्के कमी मते मिळाली होती. १९९९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचा फटका पुन्हा एकदा काँग्रेसला बसून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना त्यांच्या तुलतने ६.३८ टक्के मते जादा मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी एक लाख ३३ हजार १६५ मते घेत काँग्रेसच्या पराभवात मोठा वाटा उचलला होता. त्यावेळी तब्बल १८.८८ टक्के मतांचे विभाजन झाले होते. दरम्यान, १९९८ मध्ये मात्र मतविभाजनाचा फटका शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना बसला होता. ७.९७ टक्के मताच्या फरकाने मुकूल वासनिक त्यावेळी निवडून आले होते. जनता पाटी, जनता दलाच्या उमेदवारांनी त्यावेळी चांगली मते घेतली होती. त्यामुळे ४.१५ टक्के मतांचा फटका त्यावेळी शिवसेनेला बसला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक