शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मतविभाजनावर युती आघाडीचे भवितव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:17 IST

बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत.

- नीलेश जोशी  बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत. १२ व्या लोकसभेपासून मतविभाजन हा बुलडाणा लोकसभा निवडणुकीमधील कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे यंदा मतविभाजनाचा फॅक्टर नेमकी कोणती राजकीय समिकरणे बिघडवतो या मुद्द्यावर राजकीय जाणकारांसह उमेदवारांचेही चिंतन सुरू आहे. त्यातच घटत्या सरासरी मतदानाच्या टक्केवारीमुळेही मतविभाजनाचा फॅक्टर प्रबळ बनत चालला आहे.गेल्या पाच निवडणुकांचा विचार करता १९९८ चा अपवाद वगळता बुलडाणा लोकसभा मतदार संघात सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे बुलडाणा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला अलिकडील काळात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली नकारात्मकतेची लाट ही त्यांना कितपत मायनस करते यावरही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून व्युव्हरचना आखण्यात येत असतानाच मतविभाजनाचा आपल्यास कसा फायदा पोहोचतो यादृष्टीने युतीचे उमेदवार व्युव्हरचना आखत आहेत. त्यांच्या भाषणातील आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून ही बाब प्रतिबिंबीत होते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यंदाच्या निवडणुकीमधील तिसरा उमेदवार असून या उमेदवारास कितपत जनाधार मिळतो या मुद्द्यावरही सध्या राजकीय वर्तुळात काथ्याकुट सुरू आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे. २००९ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघ खुला झाल्यानंतर हे दोघे पहिल्यांना एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी ३.२९ टक्के मताच्या फरकाने विद्यामान खासदारांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर मात केली होती. मात्र त्याच तिसर्या आणि चौथ्या नंबरच्या उमेदवारांनी १४.५२ टक्के मते घेतल्याने आघाडीला मतविभाजनाचा मोठा फटका बसला होता. यात बीएसपीचा ९.५८ टक्के अर्थात ८१ हजार ७६३ मतांचा मोठा वाटा होता.२००४ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि माजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मुकूल वासनिक यांच्यातील तुल्यबळ लढतीमध्येही काँग्रेला ६.७७ टक्के मतविभाजानाचा फटका बसत आनंदराव अडसूळ असूळ विजयी झाले होते. भारीप-बमस, बसपा आणि एका अपक्षाने त्यावेळी एकूण मतदानाच्या ६.७७ टक्के मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला ७.८७ टक्के कमी मते मिळाली होती. १९९९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचा फटका पुन्हा एकदा काँग्रेसला बसून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना त्यांच्या तुलतने ६.३८ टक्के मते जादा मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी एक लाख ३३ हजार १६५ मते घेत काँग्रेसच्या पराभवात मोठा वाटा उचलला होता. त्यावेळी तब्बल १८.८८ टक्के मतांचे विभाजन झाले होते. दरम्यान, १९९८ मध्ये मात्र मतविभाजनाचा फटका शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना बसला होता. ७.९७ टक्के मताच्या फरकाने मुकूल वासनिक त्यावेळी निवडून आले होते. जनता पाटी, जनता दलाच्या उमेदवारांनी त्यावेळी चांगली मते घेतली होती. त्यामुळे ४.१५ टक्के मतांचा फटका त्यावेळी शिवसेनेला बसला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक