शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मतविभाजनावर युती आघाडीचे भवितव्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 14:17 IST

बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत.

- नीलेश जोशी  बुलडाणा: येत्या १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेसाठी मतदान होत असतानाच मतविभाजनाच्या मुद्द्यावर युती आणि आघाडीचे तुल्यबळ उमेदवार काथ्याकुट करीत आहेत. १२ व्या लोकसभेपासून मतविभाजन हा बुलडाणा लोकसभा निवडणुकीमधील कळीचा मुद्दा बनला आहे. त्यामुळे यंदा मतविभाजनाचा फॅक्टर नेमकी कोणती राजकीय समिकरणे बिघडवतो या मुद्द्यावर राजकीय जाणकारांसह उमेदवारांचेही चिंतन सुरू आहे. त्यातच घटत्या सरासरी मतदानाच्या टक्केवारीमुळेही मतविभाजनाचा फॅक्टर प्रबळ बनत चालला आहे.गेल्या पाच निवडणुकांचा विचार करता १९९८ चा अपवाद वगळता बुलडाणा लोकसभा मतदार संघात सातत्याने शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. त्यामुळे बुलडाणा एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला अलिकडील काळात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या विरोधात असलेली नकारात्मकतेची लाट ही त्यांना कितपत मायनस करते यावरही प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून व्युव्हरचना आखण्यात येत असतानाच मतविभाजनाचा आपल्यास कसा फायदा पोहोचतो यादृष्टीने युतीचे उमेदवार व्युव्हरचना आखत आहेत. त्यांच्या भाषणातील आणि प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांमधून ही बाब प्रतिबिंबीत होते. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यंदाच्या निवडणुकीमधील तिसरा उमेदवार असून या उमेदवारास कितपत जनाधार मिळतो या मुद्द्यावरही सध्या राजकीय वर्तुळात काथ्याकुट सुरू आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे. २००९ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदार संघ खुला झाल्यानंतर हे दोघे पहिल्यांना एकमेकाविरोधात उभे ठाकले होते. त्यावेळी ३.२९ टक्के मताच्या फरकाने विद्यामान खासदारांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर मात केली होती. मात्र त्याच तिसर्या आणि चौथ्या नंबरच्या उमेदवारांनी १४.५२ टक्के मते घेतल्याने आघाडीला मतविभाजनाचा मोठा फटका बसला होता. यात बीएसपीचा ९.५८ टक्के अर्थात ८१ हजार ७६३ मतांचा मोठा वाटा होता.२००४ च्या निवडणुकीमध्ये तत्कालीन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ आणि माजी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री मुकूल वासनिक यांच्यातील तुल्यबळ लढतीमध्येही काँग्रेला ६.७७ टक्के मतविभाजानाचा फटका बसत आनंदराव अडसूळ असूळ विजयी झाले होते. भारीप-बमस, बसपा आणि एका अपक्षाने त्यावेळी एकूण मतदानाच्या ६.७७ टक्के मते घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला ७.८७ टक्के कमी मते मिळाली होती. १९९९ च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्याचा फटका पुन्हा एकदा काँग्रेसला बसून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना त्यांच्या तुलतने ६.३८ टक्के मते जादा मिळाली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार साहेबराव सरदार यांनी एक लाख ३३ हजार १६५ मते घेत काँग्रेसच्या पराभवात मोठा वाटा उचलला होता. त्यावेळी तब्बल १८.८८ टक्के मतांचे विभाजन झाले होते. दरम्यान, १९९८ मध्ये मात्र मतविभाजनाचा फटका शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांना बसला होता. ७.९७ टक्के मताच्या फरकाने मुकूल वासनिक त्यावेळी निवडून आले होते. जनता पाटी, जनता दलाच्या उमेदवारांनी त्यावेळी चांगली मते घेतली होती. त्यामुळे ४.१५ टक्के मतांचा फटका त्यावेळी शिवसेनेला बसला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbuldhana-pcबुलडाणाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक