शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:09 IST

कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : सध्या एकीकडे कोरोना आजाराचा सामना सर्वजण करीत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर आता टोळधाड या कीटकांचे आव्हान उभे राहीले आहे. पिकांचे नुकसान करणाºया या कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.गुजरात, मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली. संग्रामपूर तालुका कृषी विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुका कृषी विभागाने पेरणीपूर्वीच जनजागृती सुरू केली आहे. मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातपुडा परिसरातील सायखेडा, हडीयामाळ, चिचारी, शिवणी, दयालनगर, वसाळी, पिगळी, सोनाळा परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी १२ ट्रॅक्टरवर कॉमप्रेशर यंत्र बसविण्यात आले असून फवारणी करण्यात येणार आहे.  

नेमकी कशी आहे टोळधाडआपल्याकडे आढळणारा नाकतोडा या कीटकासारखाच हा कीटक आहे. यांचा थवा पिकांचा फडशा पाडतो. एका तासात सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतराच्या क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येतो. सर्वच पिकांना हे हानीकारक आले. हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी हे कीटक खातात. टोळ तांबुस रंगाची असते. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वास्तव्य करतात. एक किलोमीटर चौरस क्षेत्रात टोळ असेल तर ३ हजार क्विंटल टोळीचे वास्तव्य राहते, अशी माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.कसे आणणार नियंत्रण!टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास नियंत्रण मिळविता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यानेही नियंत्रण मिळविता येते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथेल पॅराथीआॅन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयानी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावता येते.

गुजरात, मध्य प्रदेशात टोळधाडीचा जास्त प्रादुर्भाव आहे. सातपुडा पर्वत परिसरात टोळधाडीचा त्रास जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.- अमोल बनसोड,तालुका कृषी अधिकारीसंग्रामपूर

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी