शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:09 IST

कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : सध्या एकीकडे कोरोना आजाराचा सामना सर्वजण करीत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर आता टोळधाड या कीटकांचे आव्हान उभे राहीले आहे. पिकांचे नुकसान करणाºया या कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.गुजरात, मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली. संग्रामपूर तालुका कृषी विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुका कृषी विभागाने पेरणीपूर्वीच जनजागृती सुरू केली आहे. मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातपुडा परिसरातील सायखेडा, हडीयामाळ, चिचारी, शिवणी, दयालनगर, वसाळी, पिगळी, सोनाळा परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी १२ ट्रॅक्टरवर कॉमप्रेशर यंत्र बसविण्यात आले असून फवारणी करण्यात येणार आहे.  

नेमकी कशी आहे टोळधाडआपल्याकडे आढळणारा नाकतोडा या कीटकासारखाच हा कीटक आहे. यांचा थवा पिकांचा फडशा पाडतो. एका तासात सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतराच्या क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येतो. सर्वच पिकांना हे हानीकारक आले. हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी हे कीटक खातात. टोळ तांबुस रंगाची असते. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वास्तव्य करतात. एक किलोमीटर चौरस क्षेत्रात टोळ असेल तर ३ हजार क्विंटल टोळीचे वास्तव्य राहते, अशी माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.कसे आणणार नियंत्रण!टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास नियंत्रण मिळविता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यानेही नियंत्रण मिळविता येते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथेल पॅराथीआॅन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयानी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावता येते.

गुजरात, मध्य प्रदेशात टोळधाडीचा जास्त प्रादुर्भाव आहे. सातपुडा पर्वत परिसरात टोळधाडीचा त्रास जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.- अमोल बनसोड,तालुका कृषी अधिकारीसंग्रामपूर

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी