शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

टोळधाडीचे संकट; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:09 IST

कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : सध्या एकीकडे कोरोना आजाराचा सामना सर्वजण करीत असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर आता टोळधाड या कीटकांचे आव्हान उभे राहीले आहे. पिकांचे नुकसान करणाºया या कीटकांच्या हल्ल्याची भीती ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच निर्माण झाली आहे.गुजरात, मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या किटकांचा प्रादुर्भाव संग्रामपूर तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात होण्याची दाट शक्यता कृषी विभागाने वर्तविली. संग्रामपूर तालुका कृषी विभाग या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. तालुका कृषी विभागाने पेरणीपूर्वीच जनजागृती सुरू केली आहे. मध्यप्रदेशातून येणाºया टोळधाड या कीटकांचा प्रादुर्भाव राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव या खान्देशातील तीन जिल्ह्यांसह राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातपुडा परिसरातील सायखेडा, हडीयामाळ, चिचारी, शिवणी, दयालनगर, वसाळी, पिगळी, सोनाळा परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी १२ ट्रॅक्टरवर कॉमप्रेशर यंत्र बसविण्यात आले असून फवारणी करण्यात येणार आहे.  

नेमकी कशी आहे टोळधाडआपल्याकडे आढळणारा नाकतोडा या कीटकासारखाच हा कीटक आहे. यांचा थवा पिकांचा फडशा पाडतो. एका तासात सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतराच्या क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येतो. सर्वच पिकांना हे हानीकारक आले. हिरवी पाने, फुले, फळे, बिया, फांदी, पालवी हे कीटक खातात. टोळ तांबुस रंगाची असते. सायंकाळ झाल्यावर झाडा-झुडपांमध्ये वास्तव्य करतात. एक किलोमीटर चौरस क्षेत्रात टोळ असेल तर ३ हजार क्विंटल टोळीचे वास्तव्य राहते, अशी माहीती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.कसे आणणार नियंत्रण!टोळने अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास नियंत्रण मिळविता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी, झाडा-झुडपांवर टोळ जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यानेही नियंत्रण मिळविता येते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जात असल्यास नीम तेल प्रतिहेक्टरी अडीच लिटर फवारणी करावी. मिथेल पॅराथीआॅन २ टक्के भूकटी २५ ते ३० किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. त्याचबरोबर प्रत्येक गावातील शेतकºयानी स्वत: गट तयार करावेत. रात्री शेतात पाहणी व देखरेख करावी. रात्री लाखोंच्या संख्येने टोळ शेतात उतरतात. त्यामुळे डब्बे, पत्रे, ढोल सायरन व ट्रॅक्टरचा आवाज करणे याशिवाय थवे येतांना दिसल्यास मशाली किंवा टेंभे लावून त्यांना हाकलून लावता येते.

गुजरात, मध्य प्रदेशात टोळधाडीचा जास्त प्रादुर्भाव आहे. सातपुडा पर्वत परिसरात टोळधाडीचा त्रास जास्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे.- अमोल बनसोड,तालुका कृषी अधिकारीसंग्रामपूर

 

 

 

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेतीFarmerशेतकरी