शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:24 IST

Buldhana Lockdown हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, जिल्ह्यात गेल्या १७ फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाला आठ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनसंदर्भातील अनेक नियम शिथिल केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार सायंकाळी सहा ते सकाळी  या कालावधीत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत अकारण रस्त्यांवर फिरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या आस्थापना या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू राहतील. मात्र शहरी तथा ग्रामीण भागात महसूल, पालिका व पोलिसांच्या पथकाकडून नियमित स्वरुपात तपासणी करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे बंदच राहणार असून हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल सुविधा देण्याची मुभा राहील. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, धाबे व गॅरेज सुरू राहतील.  सर्व वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सालये त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा ही २४ तास सुरू राहणार आहे. यासोबतच कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेऊन रुग्णांना सेवा नाकारणार नाही. तसेच दूध विक्रेते, दूध वितरण केंद्रे ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहेत. 

लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगीलग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी राहणार आहे. वधू व वराचाही यात समावेश असून, तहसीलदारांकडून त्यासाठी परवानगी मिळेल. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी गाड्यांमध्ये चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशांनाच मुभा राहील. आंतरजिल्हास्तरावरील बससेवा सुरू राहील; मात्र क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना त्यात प्रवेश दिला जाईल. ठोक भाजीमंडई सकाळी ३ ते ६ सुरू राहील. परंतु मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या