शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बुलडाणा जिल्ह्यात ८ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 12:24 IST

Buldhana Lockdown हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता, जिल्ह्यात गेल्या १७ फेब्रुवारी रोजी लावण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाला आठ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र लॉकडाऊनसंदर्भातील अनेक नियम शिथिल केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन न केल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी एस. रामास्वामी यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी जिल्हाधिकारी यांनी हा आदेश काढला आहे. त्या आदेशानुसार सायंकाळी सहा ते सकाळी  या कालावधीत जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत अकारण रस्त्यांवर फिरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या आस्थापना या सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू राहतील. मात्र शहरी तथा ग्रामीण भागात महसूल, पालिका व पोलिसांच्या पथकाकडून नियमित स्वरुपात तपासणी करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार हे बंदच राहणार असून हॉटेल्स, उपाहारगृहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. सायंकाळी पाच ते रात्री नऊ या कालावधीत त्यांना केवळ पार्सल सुविधा देण्याची मुभा राहील. राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स, रेस्टॉरन्ट, धाबे व गॅरेज सुरू राहतील.  सर्व वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सालये त्यांच्या नियमित वेळेनुसार सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा ही २४ तास सुरू राहणार आहे. यासोबतच कोणतेही रुग्णालय बंदचा आधार घेऊन रुग्णांना सेवा नाकारणार नाही. तसेच दूध विक्रेते, दूध वितरण केंद्रे ही पूर्वीप्रमाणेच सकाळी सहा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत सुरू राहणार आहेत. 

लग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगीलग्न समारंभासाठी २५ जणांनाच परवानगी राहणार आहे. वधू व वराचाही यात समावेश असून, तहसीलदारांकडून त्यासाठी परवानगी मिळेल. सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना चारचाकी गाड्यांमध्ये चालकाव्यतिरिक्त तीन प्रवाशांनाच मुभा राहील. आंतरजिल्हास्तरावरील बससेवा सुरू राहील; मात्र क्षमतेच्या ५० टक्केच प्रवाशांना त्यात प्रवेश दिला जाईल. ठोक भाजीमंडई सकाळी ३ ते ६ सुरू राहील. परंतु मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी केवळ २० व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या