शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

बुलडाणा जिल्ह्यात १५ दिवसांसाठी लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:08 IST

जिल्ह्यात सात ते २१ जुलै दरम्यान १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

बुलडाणा: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता बुलडाणा जिल्ह्यात सात ते २१ जुलै दरम्यान १५ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, जुलै अखेर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही ७०० च्या घरात जाण्याची शक्यता पाहता १५ दिवसांच्या या लॉकडाऊनची अधिक गंभीरतेने अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात सहा जुलै रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही बाब स्पष्ट केली. यावेळी आ. राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा आणि जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील जाधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा लॉकडाऊन अत्यंत कडक राहणार असून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा पुर्णतहा बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे सध्या मलकापूर, मोताळा आणि नांदुरा येथे लॉकडाऊन सुरू असून तो १५ जुलै रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर या तिनही ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन या तीनही तालुक्यांना लागू राहणार आहे. नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून दुचाकीवरही एकाच व्यक्तीला सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळ अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याची मुभा राहणार आहे.  दुपारी तीन ते दुसºया दिवशी सकाळी नऊ पर्यंत कडक लॉकडाऊन अर्थात कर्फ्यु जिल्ह्यात राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे पालन न करणाºयांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनीच याबाबत घोषणा केली आहे. चार चाकी वाहनांसाठी प्रवासादरम्यान निम्मेच व्यक्ती वाहनात राहतील याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाºयांना कुठलीही दयामाया दाखवली जाणार नाही. ‘ब्रेक द चेन’ हे टार्गेट समोर ठेवून हे लॉकडाऊन अत्यंत गंभीरतेने राबविण्यात येणार आहे. मलकापूरमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम समोर आले असून त्याच पद्धतीने जिल्ह्यातही हा लॉकडाऊन सुरू राहणार आहे. आंतरजिल्हास्तरावर बस वाहतूक सध्या सुरू आहे. हा राज्यस्तरावरील निर्णय आहे. त्यामुळे या बसेस निर्धारित वेळेत सुरू राहण्याची शक्यता आहे.

शारीरिक अंतर ठेवण्यासाठी छत्र्यांचा वापरसकाळी नऊ ते दुपारी तीन यावेळेत अत्यावश्यक वस्तू सेवांच्या खरेदीसाठी बाहेर पडणाºया नागरिकांनी सोबत छत्री ठेवून दोन व्यक्तींमध्ये योग्य अंतर राखण्याचे आवाहन करत संसर्ग टाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावण्याचे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

जुलै अखेर जिल्ह्यात ७०० रुग्ण कोरोना संसर्गाची जिल्ह्यात वाढती व्याप्ती पाहत जुलै अखेर पर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आकडा हा ७०० च्या घरात जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सज्ज झाली असून कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी पोलिस, जिल्हा परिषद, आरोग्य आणि महसूल विभागात समन्वयाने काम करण्यात येत आहे. संभाव्य आपत्कालीन स्थितीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

काय सुरू राहणारदुध, भाजीपाला, किराणा दुकाने ही सकाळी नऊ ते दुपारी तीन पर्यंत सुरू राहणार आहेत. दुध तथा भाजीपाला विक्रेत्यांना पासेस देण्यात येणार आहेत. सोबतच वृत्तपत्र वाटपाचे कामही सुरू राहणार असून हॉकर्सना पासेसही दिल्या जाणार आहेत. प्रारंभी एकाद दिवस यात अडचण येवू शकते मात्र नंतर त्यात सुरळीतता येईल.

जिल्ह्याच्या सीमा सील करणारअन्य ठिकाणाहून पुन्हा जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण होणार नाही, यासाठी जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच चार चाकी वाहनात क्षमतेच्या निम्मेच लोक बसू शकतील. दुचाकीवर फक्त एकाच व्यक्तीला प्रवासाची मुभा राहील. तीन चाकी वाहनात चालक व एक प्रवासीच बसू शकतील. दुपारी तीन नंतर संपूर्ण जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू राहील. कायदा व सुव्यवस्थेच्या काळात ज्या प्रमाणे संचारबंदी लागू असते त्याच धर्तीवर ही संचारबंदी दुपारी तीन ते दुसºया दिवशी सकाळी नऊ पर्यंत सुरू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणेcorona virusकोरोना वायरस बातम्या