शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

काेराेनाकाळात अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता, यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ म्हणजेच २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण हे प्रकार कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधांसह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काेराेनाच्या काळात यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१८ मध्ये जिल्ह्यातून एकूण ३५ मुली बेपत्ता झाल्या हाेत्या़ तसेच ९७ मुलींचे अपहरण करण्यात आले हाेते़. यांपैकी बेपत्ता झालेल्या ३३ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या ९० मुलींना पाेलिसांनी शाेधून काढले़ या वर्षात १३२ पैकी १२३ मुलींना पाेलिसांनी शाेधून पालकांच्या स्वाधीन केले़ सन २०१९ आणि २०२० मध्ये प्रत्येकी १०१ मुलींचा शाेध पाेलिसांनी घेतला आहे़ २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत ३२ मुलींचा शाेध लागला आहे़

बेपत्ता किंवा अपहरणाचा गुन्हा याविषयीची तक्रारी गंभीरतेने घेण्यात येतात़ सन २०१८ पासून २०२१ मेपर्यंत ३५७ मुलींचा शाेध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ अनेक मुली प्रेमप्रकरणातून घरून निघून जातात़ पालकांनी सजग राहण्याची गरज आहे़

- अरविंद चावरिया

पोलीस अधीक्षक, बुलडाणा

९२ टक्के मुलींचा शोध लागला

सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण ४४२ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या जवळपास आहे. केवळ आठ टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही़

सन २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या ४४२ मुलींपैकी ३५७ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये १२३, २०१९ मध्ये १०१, २०२० मध्ये १०१, तर २०२१ मध्ये ३२ मुलींचा शाेध घेण्यात यश आले आहे़

शोधकार्यात अडचणी काय?

बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते; परंतु ज्यांना त्या सांगून जातात, ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपासकार्यात अडचणी येतात. तसेच अनेक मुली परत आल्यानंतर पाेलीस ठाण्याला माहिती देत नाहीत़