शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

काेराेनाकाळात अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता, यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ म्हणजेच २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण हे प्रकार कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधांसह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काेराेनाच्या काळात यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१८ मध्ये जिल्ह्यातून एकूण ३५ मुली बेपत्ता झाल्या हाेत्या़ तसेच ९७ मुलींचे अपहरण करण्यात आले हाेते़. यांपैकी बेपत्ता झालेल्या ३३ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या ९० मुलींना पाेलिसांनी शाेधून काढले़ या वर्षात १३२ पैकी १२३ मुलींना पाेलिसांनी शाेधून पालकांच्या स्वाधीन केले़ सन २०१९ आणि २०२० मध्ये प्रत्येकी १०१ मुलींचा शाेध पाेलिसांनी घेतला आहे़ २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत ३२ मुलींचा शाेध लागला आहे़

बेपत्ता किंवा अपहरणाचा गुन्हा याविषयीची तक्रारी गंभीरतेने घेण्यात येतात़ सन २०१८ पासून २०२१ मेपर्यंत ३५७ मुलींचा शाेध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ अनेक मुली प्रेमप्रकरणातून घरून निघून जातात़ पालकांनी सजग राहण्याची गरज आहे़

- अरविंद चावरिया

पोलीस अधीक्षक, बुलडाणा

९२ टक्के मुलींचा शोध लागला

सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण ४४२ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या जवळपास आहे. केवळ आठ टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही़

सन २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या ४४२ मुलींपैकी ३५७ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये १२३, २०१९ मध्ये १०१, २०२० मध्ये १०१, तर २०२१ मध्ये ३२ मुलींचा शाेध घेण्यात यश आले आहे़

शोधकार्यात अडचणी काय?

बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते; परंतु ज्यांना त्या सांगून जातात, ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपासकार्यात अडचणी येतात. तसेच अनेक मुली परत आल्यानंतर पाेलीस ठाण्याला माहिती देत नाहीत़