शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनाकाळात अल्पवयीन मुली ‘लॉक’; बेपत्ता होण्याच्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : काेराेनाच्या काळात सर्वत्र लाॅकडाऊन, कडक निर्बंध असतानाही चार वर्षांतील अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरण हाेण्याच्या घटना पाहिल्या असता, यामध्ये घट झाल्याचे दिसून येते. २०१८ च्या तुलनेत काेराेना काळ म्हणजेच २०२० मध्ये मुली बेपत्ता, अपहरण हे प्रकार कमी झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढू नये याकरिता जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंधांसह लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. लाॅकडाऊनच्या काळात अल्पवयीन मुली बेपत्ता, अपहरणाच्या तक्रारींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, काेराेनाच्या काळात यामध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.

सन २०१८ मध्ये जिल्ह्यातून एकूण ३५ मुली बेपत्ता झाल्या हाेत्या़ तसेच ९७ मुलींचे अपहरण करण्यात आले हाेते़. यांपैकी बेपत्ता झालेल्या ३३ आणि अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या ९० मुलींना पाेलिसांनी शाेधून काढले़ या वर्षात १३२ पैकी १२३ मुलींना पाेलिसांनी शाेधून पालकांच्या स्वाधीन केले़ सन २०१९ आणि २०२० मध्ये प्रत्येकी १०१ मुलींचा शाेध पाेलिसांनी घेतला आहे़ २०२१ मध्ये मे महिन्यापर्यंत ३२ मुलींचा शाेध लागला आहे़

बेपत्ता किंवा अपहरणाचा गुन्हा याविषयीची तक्रारी गंभीरतेने घेण्यात येतात़ सन २०१८ पासून २०२१ मेपर्यंत ३५७ मुलींचा शाेध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे़ अनेक मुली प्रेमप्रकरणातून घरून निघून जातात़ पालकांनी सजग राहण्याची गरज आहे़

- अरविंद चावरिया

पोलीस अधीक्षक, बुलडाणा

९२ टक्के मुलींचा शोध लागला

सन २०१८ ते मे २०२१ पर्यंत एकूण ४४२ मुली बेपत्ता, अपहरण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात बहुतांश मुलींचा शाेध लागला असून याचे प्रमाण ९२ टक्क्यांच्या जवळपास आहे. केवळ आठ टक्के मुलींचा शाेध लागलेला नाही़

सन २०१८ पासून बेपत्ता, अपहरण झालेल्या ४४२ मुलींपैकी ३५७ मुलींचा शाेध लागलेला आहे. यामध्ये २०१८ मध्ये १२३, २०१९ मध्ये १०१, २०२० मध्ये १०१, तर २०२१ मध्ये ३२ मुलींचा शाेध घेण्यात यश आले आहे़

शोधकार्यात अडचणी काय?

बेपत्ता, अपहरण झालेल्या मुली कधीही लपून किंवा काेणाला न सांगता जात नाहीत. अल्पवयीन असल्याने त्यांना तेवढी समज नसते; परंतु ज्यांना त्या सांगून जातात, ते घाबरत असल्याने सांगण्यास टाळाटाळ करतात. यामुळे तपासकार्यात अडचणी येतात. तसेच अनेक मुली परत आल्यानंतर पाेलीस ठाण्याला माहिती देत नाहीत़