शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

संततधार पावसाने बुलढाणा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत; चार तालुक्यात अतिवृष्टी

By निलेश जोशी | Updated: July 19, 2023 14:58 IST

नांदुरा तालुक्यात भिंतपडून एकाचा मृत्यू

बुलढाणा: जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून शेगाव, मलकापूर, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी झाल आहे. घाटाखालील पाच तालुक्यातील १९ मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून नांदुरा तालुक्यातील मामूलवाडी येथील एका वृद्धाचा मंदिराची भिंत पडल्याने मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

दुसरीकडे रस्त्याच्या कामामुळे मलकापूर शहरातील सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात १८ जुलै रोजी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४९ मिमी पावसाची नोंद झाली. त्यातल्यात्यात घाटाखालील पाच तालुक्यांना या पावसाने झोडपले आहे. पुर्णानदीही दुथडी भरून वाहत असून हातणूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे मलकापूर तालुक्यातील गावे प्रभावीत होण्याची शक्यता पहाता या धरणाचे ३० दरवाजे पुर्णपणे उघडण्यात आले असून त्यातून १ लाख ५६ हजार क्युसेक (४,४३६ क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. हातणूर धरण हे सध्या ५९ टक्के भरलेले आहे.

दुसरीकडे घाटावरील भागात संततधार पाऊस झाला असला तरी कोठे मोठे नुकसान झालेेल नाही. प्रामुख्याने घाटाखालील पाच तालुक्यांना पावसाचा फटका बसला आहे. शेगाव तालुक्यात सर्वाधिक असा ९१ मिमी पाऊस झाला असून त्या खालोखाल जळगाव जामोद तालुक्यात ८४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात ७६.२ आणि मलकापूर तालुक्यात ७५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मलकापूर परिरात रस्ता कामासाठी केलेल्या खोदकामामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे नांदुरा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी शहरातील सांडपाण्याच्या नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह रोखल्यामुळे हे पाणी सखल भागात साचले आहे. मलकापूर तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच गावांचा संपर्क तुटलेला आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. घाटाखालील अनेक शेतात सध्या पाणी साचलेले आहे. काही ठिकाणी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मंदिराची भिंत पडून एक ठार

या संततधार पावसादरम्यान नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील देवीच्या मंदिराची भिंत कोसळली. भिंतीचा भरावही त्यामुळे खाली आला. सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. नेमके यावेळेस मामुलवाडी येथील प्रताप नामदेव गावंडे (६०) आणि त्यांचा मुलगा शुभम प्रताप गावंडे (२४) हे दोघे घराशेजारी म्हशीचे दुध काढत असताना भिंत कोसळली. त्याच्या भरावाखाली दोघे ही दबल्या गेले होते. त्यात ग्रामस्थांनी त्यांना तातडीने बाहेर काढले असता प्रताप गावंडे यांचा मृत्यू झाला तर शुभम गावंडे हे जखमी झाले आहेत, अशी माहिती नांदुरा तहसिलदारांनी जिल्हा प्रशासनास कळवली आहे.