शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फुलपाखराचे आयुष्य वाढत्या प्रदुषणाने झाले बेरंग -  अलोक शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 11:37 IST

फुलपाखरांचे चांगले आयुष्य वाढत्या प्रदुषणाने बेरंग होत असल्याची खंत किटक अभ्यासक  प्रा. अलोक शेवडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. 

 - ब्रह्मानंद जाधव  बुलडाणा : फुलपाखरे आणि फुले यांचा संबंध हा अगदी जवळचा आहे. विशिष्ट फुलपाखरे हे काही ठरावीक फुलांवरच दिसून येतात. फुलांमुळे फुलपाखरांचे जीवन सुंदर बनले आहे. परंतू अलीकडील काळात फुलपाखरांच्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. फुलपाखरांचे चांगले आयुष्य वाढत्या प्रदुषणाने बेरंग होत असल्याची खंत किटक अभ्यासक  प्रा. अलोक शेवडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. 

आपल्याकडे फुलपाखरांच्या किती प्रजाती आहेत?ढोबळमानाने बुलडाणा जिल्ह्यातील जंगल परिसरात ६८ च्या आसपास फुलपाखरांच्या प्रजाती आढळून येतात. परंत त्याच्याही संख्येत लक्षणीय घट झालेली दिसून येते.   

तुम्ही आतापर्यंत किती प्रकारच्या आणि कोणत्या किटकांची नोंद घेतली?छायाचित्रणाच्या माध्यमातून मी आजपर्यंत ३२५ च्या आसपास कीटक प्रजातींची नोंद घेतली आहे. त्यामध्ये  आऊल फ्लाय, मोनार्क बटरफ्लाय, अश्वमुखी बीटल, रेन्बो ग्रॉसहॉपर, सिग्नेचर स्पायडर यासह अनेक दूर्मिळ फुलपाखरांचाही समावेश आहे. 

हे कीटक दुर्मीळ होण्याची कारणे कोणती?बुलडाणा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पंरतू मागील दशकापासून बुलडाण्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली जाणवते. बुलडाणा परिसरात बांधकाम, खोदकाम यामध्येही वाढ झालेली आहे. याचा परिणाम कीटकांच्या अधिवासावर झालेला दिसतो. २०१० पर्यंत दिसणारी विशिष्ट प्रकारची झाडे-झुडपे, गवत, फुले  त्यानंतरच्या काळात बुलडाणा परिसरातून नाहीशी होत असल्याचे चित्र आहे. 

कोणत्या प्रजाती कमी झाल्या आहेत?रेनबो ब्ल्यू ग्रासहॉपर हे केवळ रुईच्याच झाडांवर जगणारे असून, जुलै ते आॅक्टोबर याच कालावधीत आढळते. इंद्रधनुष्याप्रमाणे आकर्षक रंग असणारी ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासह जंगलातील इतरही अनेक प्रजाती कमी झाल्या आहेत. 

कीटकनाशकांचा कीटकांच्या प्रजातीवर काय परिणाम जाणवतो?मानवी अन्नधान्याची समस्या सोडविण्यासाठी अपण शेती विस्तार करीत आहोत. गावालगतची शेतजमीन घर बांधकामाखाली येत आहे. त्यामुळे विस्तारीत शेतजमीनीचे जंगल पट्ट्टयावर अतिक्रमण होत आहे. साहजिकच या जंगल पट्ट्टयातील कृमी- कीटक व इरत वन्यजीव यांचा शेतजमीनीवर वावर दिसत आहे. पिकांच्या व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी विषारी कीटकनाशके कृमी-कीटकांसाठी प्राणघातक ठरत आहे. परिणामत: उपरोक्त सर्व वन्यजीवांचा अधिवास व अस्तित्त्व धोक्यात आले आहे. वाढत्या प्रदुषणामुळे फुलपाखरांच्या दुर्मीळ प्रजाती  दिसेनास्या झाल्या आहेत. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.मानवी स्वार्थाची पुर्तता करण्यासाठी चाललेली आपली उलाढाल जरा नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून या सृष्टीतील इतर जीवांनाही आपआपल्या वैशिष्ट्याप्रमाणे जगता येईल व ही सृष्टी सदैव सुंदर राहिल. फुलपाखरांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाinterviewमुलाखत