शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

सहभागासाठी ४५ संस्थांना पत्र

By admin | Updated: August 13, 2015 00:09 IST

सामूहिक शपथ अभियानात खामगाव नगरपालिकेचा पुढाकार.

अनिल गवई / खामगाव (जि. बुलडाणा) : स्वच्छता, प्लास्टिक निर्मूलन, पाणी बचत आणि वृक्ष रोपट्यांच्या लागवडीसोबतच वृक्ष रोपट्यांच्या संगोपनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी खामगाव नगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिनी यंदा प्रथमच सामूहिक संकल्प आणि शपथ अभियान आयोजित केले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध सामाजिक संस्थांसह खासगी तसेच महापालिका शाळांतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना पालिकेकडून पत्र देण्यात येत असून, बुधवारी दुपारपर्यंंत ४५ संस्थांना पत्र देण्यात आल्याची माहिती आहे. नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. कचरा निर्मूलनासाठी घरोघरी घंटागाडी हा उपक्रमही राबविण्यात येतो; मात्र तरीही या उपक्रमांमध्ये नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. प्लास्टिक निर्मूलनासोबतच वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाच्या बाबतीतही नागरिकांचा अपेक्षीत सहभाग मिळत नाही, ही वस्तुस्थिती लक्षात घेत, नगरपालिका प्रशासनाने प्रत्येक उपक्रमात आणि अभियानात नागरिकांचा सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने स्वातंत्र्यदिनी सामूहिक शपथ अभियान राबविण्यात येणार आहे. अस्वच्छता, पाणीटंचाई या गोष्टींवर मात मिळविण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि शालेय विद्यार्थ्यांंच्या सहभागातून ह्यस्वातंत्र्य संकल्प आणि शपथ अभियानह्ण शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजता पालिकेतील स्व. विलासराव देशमुख प्रशासकीय इमारतीत हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या अभियानाच्या यशस्वितेसाठी पालिका प्रशासनाने तयारी चालविली आहे. पालिकेतील नगरसेवक विविध विषय सभापती, पालिका शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापक हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या उपक्रमाला माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.