शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

साहित्यातून शोषित, पीडितांच्या दु:खांचे हुंकार उमटू द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:37 IST

साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  साहित्यात कल्पनारम्य जगाचे चित्रण करण्यापेक्षा  वास्तवाचे भेदक चित्रण करणे गरजेचे आहे. साहित्यिकांनी वास्तववादी लेखन करताना आपल्या साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.अंकुर साहित्य संघ व म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथील भूमिपुत्र स्व.भाऊसाहेब फुंडकर साहित्य नगरी (कोल्हटकर स्मारक मंदीर) येथे ५८ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आशुतोष अडोणी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अनिता डवरे, साहित्यिक अशोक राणे, भाजप मिडीया सेलचे प्रदेश सदस्य सागर फुंडकर, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, उर्मिलाताई गायकी, भगवानसिंह सोळंके, कविता वडोदे, रेखा शेगोकार, महादेवराव भोजने, केदार एकडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना वडोदे पुढे म्हणाले की, मनोरंजनाच्या हेतूने केलेले लेखन मागणीशी तडजोड करणारे व वास्तवापासून दूर असते. आपल्या कथा, कविता, कादंबरी आदी लेखनाच्या माध्यमातून व्यक्तिगत जीवनातील सुखदु:खे जाणून घेण्याची, व्यक्ती आणि समाज यातील संघर्षाचे चित्रण करण्याची प्रवृत्ती आढळली पाहिजे. वेगळ्या वाटा शोधणारे लेखन सद्यस्थितीत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक अरविंद भोंडे यांनी केले. संचालन सैय्यद अहमद, किर्ती बढे यांनी केले. आभार साहित्यिक रमेश डोंगरे यांनी मानले.  सुरूवातीला स्वागताध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या शुभसंदेशाचे वाचन किर्ती बढे- सांगळे यांनी केले. यावेळी महादेव बगाडे, अरूण भगत, रामेश्वर जोहरी, संदीप गावंडे, विनय वरणगावकर, शालीग्राम वाढे, प्रा. देवबा पाटील, अ‍ॅड. रजनी बावस्कार, किरण रेठेकर, सुरेश साबळे, सुरेश लोंढे, रघुनाथ खेर्डे, उर्मिला ठाकरे, आर.आर. होनाळे आदी साहित्यिकांची उपस्थिती होती.

 विविध पुस्तकांचे प्रकाशनसाहित्य संमेलनाच्या अनुषंगाने साहित्य संमेलन विशेषांक शंब्दाकूरचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘नसून अडचण असून खोळंबा’ या कथासंग्राहाचे आणि उद्वेग, कठिण सत्य, माउली आदी पुस्तकांचेही  विमोचन यावेळी झाले. त्यानंतर अंकुर पुरस्कार २०१८ चे वितरण करण्यात आले.