शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

साहित्यातून शोषित, पीडितांच्या दु:खांचे हुंकार उमटू द्या! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:37 IST

साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  साहित्यात कल्पनारम्य जगाचे चित्रण करण्यापेक्षा  वास्तवाचे भेदक चित्रण करणे गरजेचे आहे. साहित्यिकांनी वास्तववादी लेखन करताना आपल्या साहित्यातून शोषित, पिडीतांच्या सुख-दु:खाचे हुंकार उमटू द्यावेत, असे नि:संदिग्ध प्रतिपादन प्रा. मधुकर वडोदे यांनी येथे केले.अंकुर साहित्य संघ व म.रा.साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथील भूमिपुत्र स्व.भाऊसाहेब फुंडकर साहित्य नगरी (कोल्हटकर स्मारक मंदीर) येथे ५८ व्या दोन दिवसीय अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे सदस्य आशुतोष अडोणी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा अनिता डवरे, साहित्यिक अशोक राणे, भाजप मिडीया सेलचे प्रदेश सदस्य सागर फुंडकर, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, उर्मिलाताई गायकी, भगवानसिंह सोळंके, कविता वडोदे, रेखा शेगोकार, महादेवराव भोजने, केदार एकडे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना वडोदे पुढे म्हणाले की, मनोरंजनाच्या हेतूने केलेले लेखन मागणीशी तडजोड करणारे व वास्तवापासून दूर असते. आपल्या कथा, कविता, कादंबरी आदी लेखनाच्या माध्यमातून व्यक्तिगत जीवनातील सुखदु:खे जाणून घेण्याची, व्यक्ती आणि समाज यातील संघर्षाचे चित्रण करण्याची प्रवृत्ती आढळली पाहिजे. वेगळ्या वाटा शोधणारे लेखन सद्यस्थितीत आवश्यक असल्याचे ते म्हणाले.प्रास्ताविक अरविंद भोंडे यांनी केले. संचालन सैय्यद अहमद, किर्ती बढे यांनी केले. आभार साहित्यिक रमेश डोंगरे यांनी मानले.  सुरूवातीला स्वागताध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांच्या शुभसंदेशाचे वाचन किर्ती बढे- सांगळे यांनी केले. यावेळी महादेव बगाडे, अरूण भगत, रामेश्वर जोहरी, संदीप गावंडे, विनय वरणगावकर, शालीग्राम वाढे, प्रा. देवबा पाटील, अ‍ॅड. रजनी बावस्कार, किरण रेठेकर, सुरेश साबळे, सुरेश लोंढे, रघुनाथ खेर्डे, उर्मिला ठाकरे, आर.आर. होनाळे आदी साहित्यिकांची उपस्थिती होती.

 विविध पुस्तकांचे प्रकाशनसाहित्य संमेलनाच्या अनुषंगाने साहित्य संमेलन विशेषांक शंब्दाकूरचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. तसेच ‘नसून अडचण असून खोळंबा’ या कथासंग्राहाचे आणि उद्वेग, कठिण सत्य, माउली आदी पुस्तकांचेही  विमोचन यावेळी झाले. त्यानंतर अंकुर पुरस्कार २०१८ चे वितरण करण्यात आले.