शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

नैसर्गिक ऑक्सिजनसाठी या पावसाळ्यात लावा झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

चिखली : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. ...

चिखली : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. या पार्श्वभूमीवर अनेक निसर्गप्रेमी आणि डॉक्टरांनीदेखील वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण होण्यासाठी आणि दीर्घकालीन उपाय म्हणून एकतरी झाड लावा, असे आवाहन करत होते. या आवाहनास प्रतिसाद देण्याची वेळ सध्या येऊन ठेपली असून, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वृक्षांची लावगड या पावसाळ्यात होणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्राव्दारे नेमकी कोणती झाडे लावावीत व त्यांचे फायदे काय, याबाबत जनजागृती देखील केली जात आहे. गत दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणावर आणि स्वयंप्रेरणेने राबविण्यात येत होती. यामध्ये राज्य शासनाचाही मोठा वाटा होता. मात्र, कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून वृक्षारोपणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची वेळ आली आहे. तथापी वृक्षांच्या अभावाने ऋतुचक्र बिघडले असल्याने सध्या पाऊसदेखील भाग बदलून पडत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे, हा दीर्घकालीन उपाय मानला जात आहे. सोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे दिवस वृक्षारोपणासाठी उपयुक्त असल्याने यंदाच्या पावसाळ्यात वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण करणारा एकतरी वृक्ष लावूया, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून होत आहे.

या पावसाळ्यात झाडे लावायची इच्छा आहे?

या पावसाळ्यात झाडे लावायची इच्छा आहे; परंतु, नेमकी कोणती झाडे लावावीत, याबाबत संभ्रम अनेकांना असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य यांनी अरण्यामहर्षी मारती चितमपल्ली यांनी सुचविलेल्या झाडांबाबत माहिती देऊन ती झाडे लावण्याबाबत आवाहन केले आहे.

जीवनदायी वृक्ष!

शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्राने जारी केलेल्या झाडांच्या माहितीमध्ये वड, उंबर, पाखर, नंद्रुक आणि पिंपळ हे वृक्ष जीवनदायी असल्याने त्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. बारा तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणाऱ्या झाडांमध्ये वड, उंबर, नांद्रुक, पिंपळ, कदंब व कडूनिंबाचा समावेश आहे.

रस्त्याकडेला लावण्यास योग्य झाडे

वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, तर उद्यानात पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा) आणि घराभोवती लावण्यास रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब ही झाडे उपयुक्त आहेत. खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवरी, शेवगा हे वृक्ष जलदगतीने वाढणारे आहेत.

औषधी व वनशेती उपयुक्त झाडे

हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा हे वृक्ष औषधी गुणधर्माचे, तर आवळा, अंजीर, फणस, चिंच, खिणी, खजुरिया, शिंदी, तुती ही झाडे वनशेती उपयुक्त आहेत.