शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नैसर्गिक ऑक्सिजनसाठी या पावसाळ्यात लावा झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:23 IST

चिखली : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. ...

चिखली : कोविडच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर अधोरेखित झाले. या पार्श्वभूमीवर अनेक निसर्गप्रेमी आणि डॉक्टरांनीदेखील वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण होण्यासाठी आणि दीर्घकालीन उपाय म्हणून एकतरी झाड लावा, असे आवाहन करत होते. या आवाहनास प्रतिसाद देण्याची वेळ सध्या येऊन ठेपली असून, ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वृक्षांची लावगड या पावसाळ्यात होणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्राव्दारे नेमकी कोणती झाडे लावावीत व त्यांचे फायदे काय, याबाबत जनजागृती देखील केली जात आहे. गत दोन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणावर आणि स्वयंप्रेरणेने राबविण्यात येत होती. यामध्ये राज्य शासनाचाही मोठा वाटा होता. मात्र, कोरोनामुळे गत दोन वर्षांपासून वृक्षारोपणाच्या मोहिमेला खीळ बसली आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची वेळ आली आहे. तथापी वृक्षांच्या अभावाने ऋतुचक्र बिघडले असल्याने सध्या पाऊसदेखील भाग बदलून पडत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणे, हा दीर्घकालीन उपाय मानला जात आहे. सोबतच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने हे दिवस वृक्षारोपणासाठी उपयुक्त असल्याने यंदाच्या पावसाळ्यात वातावरणात ऑक्सिजनचे फेरभरण करणारा एकतरी वृक्ष लावूया, असे आवाहन निसर्गप्रेमींकडून होत आहे.

या पावसाळ्यात झाडे लावायची इच्छा आहे?

या पावसाळ्यात झाडे लावायची इच्छा आहे; परंतु, नेमकी कोणती झाडे लावावीत, याबाबत संभ्रम अनेकांना असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्र, महाराष्ट्र राज्य यांनी अरण्यामहर्षी मारती चितमपल्ली यांनी सुचविलेल्या झाडांबाबत माहिती देऊन ती झाडे लावण्याबाबत आवाहन केले आहे.

जीवनदायी वृक्ष!

शेतकरी विकास मदत व मार्गदर्शन केंद्राने जारी केलेल्या झाडांच्या माहितीमध्ये वड, उंबर, पाखर, नंद्रुक आणि पिंपळ हे वृक्ष जीवनदायी असल्याने त्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. बारा तासांपेक्षा अधिक काळ प्राणवायू देणाऱ्या झाडांमध्ये वड, उंबर, नांद्रुक, पिंपळ, कदंब व कडूनिंबाचा समावेश आहे.

रस्त्याकडेला लावण्यास योग्य झाडे

वड, उंबर, पाखर, पिंपळ, बेल, कदंब, शमी, आपटा, चिंच, तर उद्यानात पारिजातक, बकुळ, आवळा, उंबर, अमलतास, बांबू (पिवळा) आणि घराभोवती लावण्यास रक्तचंदन, चंदन, उंबर, बकुळ, पारिजातक, बेल, कुसुंब ही झाडे उपयुक्त आहेत. खजुरिया, शिंदी, ताडफळ, बांबू, हादगा, शेवरी, शेवगा हे वृक्ष जलदगतीने वाढणारे आहेत.

औषधी व वनशेती उपयुक्त झाडे

हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, कडूनिंब, करंज, रिठा हे वृक्ष औषधी गुणधर्माचे, तर आवळा, अंजीर, फणस, चिंच, खिणी, खजुरिया, शिंदी, तुती ही झाडे वनशेती उपयुक्त आहेत.