शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:35 IST

अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, प्रकल्प अधिकारी सुनील दत्त फडके, भैरूलाल कुमावत, ...

अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अनिल माचेवाड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, प्रकल्प अधिकारी सुनील दत्त फडके, भैरूलाल कुमावत, मुकुंद घाटे, रामदास आटोळे, श्रीपाद कलंत्रे, सचिन श्रीवास्तव, शिवप्रसाद मुंगळे, पवन शिंदे, दत्तात्रय शिंदे, जगदीश गुळवे, पारवे आदी उपस्थित होते. बागायत क्षेत्र असलेल्या निवडक गावांच्या समूहामध्ये रेशीम शेतीस मोठ्या प्रमाणावर वाव असल्याने, शेतकऱ्यांनी अभियान कालावधीमध्ये रेशीम शेती करण्यासाठी नोंदणी करून मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले. वातावरण बदलामुळे पारंपरिक शेतीमधून शेतकऱ्यांना निश्चित व शाश्वत उत्पन्न मिळणे, दिवसेंदिवस जिकिरीचे होत चालले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास शाश्वत उत्पन्नाची हमी असलेल्या रेशीम शेतीकडे वळावे, असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

दुप्पट उत्पन्नासाठी रेशीम शेती उपयुक्त

तुती पिकास शासनाने कृषिपीक म्हणून घोषित केल्यामुळे, इतर पिकांप्रमाणेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी रेशीम शेती उपयुक्त ठरणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)अंतर्गत रेशीम शेतीस अनुदान दिले जाते. यामध्ये तुती रोपवाटिका तयार करणे, सुधारित वाणाची तुती लागवड करणे, रेशीम कीटक संगोपन गृह बांधणे, संगोपन साहित्य खरेदी करणे या घटकांचा समावेश आहे, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी केले.

रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्हाभर जनजागृती

रेशीम अंडीपुजांसाठी ७५ टक्के व कोष उत्पादनावर प्रति किलो कोषास ५० रुपये जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुदान देण्यात येत असल्याचे प्रकल्प अधिकारी सुनील फडके यांनी सांगितले. अभियान कालावधीमध्ये रेशीम शेतीस वाव असलेल्या निवडक गावामध्ये रेशीम शेती करण्यसाठी रेशीम कर्मचारी, शास्त्रज्ञ, रेशीम उद्योजक व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रेशीम रथाच्या माध्यमातून जिल्हाभर विस्तार कार्यक्रम घेऊन जनजागृतीद्वारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.