शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

दोन वर्षांपासून केंद्राची जिगावसाठी तरतूदच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST

केंद्र शासनाच्या बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत हा प्रकल्प आहे. राज्य शासन ७५ टक्के आणि केंद्र सरकारचा २५ टक्के निधी या ...

केंद्र शासनाच्या बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत हा प्रकल्प आहे. राज्य शासन ७५ टक्के आणि केंद्र सरकारचा २५ टक्के निधी या प्रकल्पासाठी मिळतो. या प्रकल्पासाठी प्रतीवर्ष केंद्र सरकारकून १२०५ कोटी ४८ लाख रुपये मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र यासंदर्भातील तरतूदच केंद्र सरकाने केली नसल्याचे खा. जाधव यांनी लोकसभेत म्हंटले आहे. त्यामुळे खारपाणपट्यातील २८७ गावांसाठी जीवनरेखा बनू पाहणाऱ्या या प्रकल्पाच्या कामावर विपरीत परिणाम झाला आहे. प्रकल्पाचे काम रेंगाळत आहे, असे दिल्ली येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान २४ मार्च रोजी लोकसभेत त्यांनी स्पष्ट करीत याकडे लक्ष वेधले.

जिगाव प्रकल्पामुळे बुलडाण्यातील ६ आणि अकोल्यातील २ तालुक्यांतील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पाचा फायदा बुलडाणा जिल्ह्यातील २६८ तर अकोला जिल्ह्यातील १९ अशा एकूण २८७ गावांना मिळणार आहे. याशिवाय अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी जिगाव प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मूळ किंमत ३९४.८३ कोटी रुपये असलेल्या या प्रकल्पाची आजची किंमत १३ हजार ७४४ कोटीवर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ३६०० कोटी रुपये खर्च झाला आहे. राज्य शासनाला ७५ टक्के व केंद्र शासनाने २५ निधी जिगावसाठी देणेबाबत तरतूद आहे. ७७६४.३९ कोटींच्या रकमेला मान्यताही देण्यात आलेली आहे. यात १२०५.४८ कोटी रुपये प्रति वर्षी केंद्र सरकारकडून मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र केंद्राकडून केवळ ३१८.५६ कोटींचा तुटपुंजा निधी आतापर्यंत मिळाला. तसेच २०२०-२१ व २०२१- २२ साठी केंद्राकडून अपेक्षित निधीबाबत कुठलेही प्रावधान करण्यात आलेले नाही. त्यामुळे जिगाव प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी मोठी अडचण जात आहे. प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास खारपानपट्ट्यातील २८७ गावांना दिलासा मिळून एक लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे खा. जाधव म्हणाले.