शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शासकीय दरवाढीनंतर होणार जमिनीचे अधिग्रहण!

By admin | Updated: January 24, 2017 02:28 IST

समृद्धी महामार्गासाठी शेतक-यांना मिळणार पाच पट पैसे.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २३- नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रारंभ झाला असून, भूमी अधिग्रहीत करताना शेतकर्‍यांना शेतीच्या शासकीय दराच्या पाच पट भाव देण्यात येणार आहे. एप्रिलनंतर जिल्ह्यातील जमिनीचा शासकीय दर (रेडी रेकनर) वाढणार असून, त्यानंतर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. नागपूर ते मुंबईपयर्ंत ७१0 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग होणार आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यातून जाणार आहे. सध्या या महामार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरू असून, लवकरच जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. या महामार्गालगत जिल्ह्यात तीन ठिकाणी नवनगरे निर्माण करण्यात येणार आहेत. या महामार्गासाठी तसेच नवनगरांमध्ये शेती जाणार्‍या शेतकर्‍यांना शासकीय भावाच्या पाच पटीने भाव मिळणार आहे, तसेच भूमी अधिग्रहणाचे तीन प्रकार शासनाच्यावतीने शेतकर्‍यांसाठी खुले करण्यात आले आहे. मेहकर व लोणार तालुक्यातील शेतांमध्ये १00 टक्के सिंचन होत नसले, तरी या भागात हंगामी ओलित करण्यात येते, त्यामुळे संपूर्ण शेतीला हंगामी शेतीचा दर लावण्यात येणार आहे. जमीन अधिग्रहित करताना शासकीय किमतीच्या पाच पटीचा दर ठरविण्यात आला आहे. आतापर्यंंत दरवर्षी जानेवारी महिन्यात जमिनीचा शासकीय दर वाढत होता. यावर्षी मात्र एप्रिल महिन्यानंतर शासकीय दर वाढणार आहे. जिल्ह्यातील शेतीचे त्यानंतर अधिग्रहण करण्यात येणार असल्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. भूमी अधिग्रहणाच्या तीन पद्धती 1. महामार्गात शेती गेलेल्या शेतकर्‍यांना जेवढी शेती गेली त्याच्या २५ ते ३0 टक्के जागेचा प्लॉट नवनगरांध्ये मिळणार आहे., तसेच दहा वर्षापर्यंत पैसे मिळणार आहेत. 2. नवनगरांमध्ये प्लॉट घेण्यास इच्छुक नसलेल्या शेतकर्‍यांना शासकीय दराच्या पाच पटीने भाव मिळणार आहेत. 3. या दोन्ही अटींमध्ये बसण्यास तयार नसलेल्या शेतकर्‍यांची शेती अधिग्रहित करण्याचा संपूर्ण अधिकार शासनाला असून, ज्यांची शेती अधिग्रहित केल्या जाईल. या शेतकर्‍यांना शासकीय दराच्या चार पटीने भाव देण्यात येणार आहे.