शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लाखो महिलांच्या उद्योगाला ‘उमेद’; राज्यात १.८१ लाख बचत गट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:00 IST

बुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे.

ठळक मुद्देनवनवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना हातभार मिळत आहे.त्याचबरोबर लाखो महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ‘उमेद’ मिळाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या या अभियानामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना हातभार मिळत आहे. त्याचबरोबर लाखो महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ‘उमेद’ मिळाल्याचे दिसून येत आहे.गरिबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन उपजीविकेत सुधारणा व्हावी, यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासन स्तरावरून राबविण्यात येते. यातूनच बचत गटाला चालना देण्यासाठी राज्यात उमेद अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात गरिबी निर्मूलनाचा विचार करण्यात आला असून, समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे. बचत गटाद्वारे महिलांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येते. राज्यात उमेद अभियानांतर्गत सुमारे १ लाख ८१ हजार बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत. शासन स्तरावरून या बचत गटांना वेळोवेळी निधी पुरविण्यात येतो. त्यामुळे खऱ्या अर्धाने बचत गटाच्या महिलांना उद्योगासाठी चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत या बचत गटासाठी ६१२.३१ कोटी रुपये निधी प्राप्त करून देण्यात आला आहे. त्यामध्ये २०१५-१६ मध्ये २०१.०५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १६१.९१ कोटी खर्च करण्यात आला. २०१६-१७ मध्ये प्राप्त निधी २०८.१४ कोटी रुपये असून, १८७.४९ कोटी खर्च करण्यात आला. २०१७-१८ मध्ये २०३.१२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १४४.२३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. ग्रामीण विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या या अभियानामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

लघू उद्योजक प्रवाहातबचत गटाच्या माध्यमातून उमेद अभियानामुळे लाखो उद्योजकांचे उद्योग मुख्य प्रवाहात आले आहेत. गतवर्षी ५१ हजार २२० स्वयंसाहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यामध्ये ५ लाख ७४ हजार ४२० सदस्य कार्यरत आहेत. या सदस्यांना उपजीविकेचे मोठे साधन उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWomenमहिला