शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लाखो महिलांच्या उद्योगाला ‘उमेद’; राज्यात १.८१ लाख बचत गट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 13:00 IST

बुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे.

ठळक मुद्देनवनवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना हातभार मिळत आहे.त्याचबरोबर लाखो महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ‘उमेद’ मिळाल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या या अभियानामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे. त्यामुळे नवनवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना हातभार मिळत आहे. त्याचबरोबर लाखो महिलांच्या उद्योग, व्यवसायाला ‘उमेद’ मिळाल्याचे दिसून येत आहे.गरिबांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन उपजीविकेत सुधारणा व्हावी, यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान शासन स्तरावरून राबविण्यात येते. यातूनच बचत गटाला चालना देण्यासाठी राज्यात उमेद अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानात गरिबी निर्मूलनाचा विचार करण्यात आला असून, समुदाय विकासापासून शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे. बचत गटाद्वारे महिलांचे संघटन करून त्यांच्यातील उद्योग व्यवसायाला चालना देण्यात येते. राज्यात उमेद अभियानांतर्गत सुमारे १ लाख ८१ हजार बचत गट स्थापन करण्यात आलेले आहेत. शासन स्तरावरून या बचत गटांना वेळोवेळी निधी पुरविण्यात येतो. त्यामुळे खऱ्या अर्धाने बचत गटाच्या महिलांना उद्योगासाठी चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांत या बचत गटासाठी ६१२.३१ कोटी रुपये निधी प्राप्त करून देण्यात आला आहे. त्यामध्ये २०१५-१६ मध्ये २०१.०५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १६१.९१ कोटी खर्च करण्यात आला. २०१६-१७ मध्ये प्राप्त निधी २०८.१४ कोटी रुपये असून, १८७.४९ कोटी खर्च करण्यात आला. २०१७-१८ मध्ये २०३.१२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी १४४.२३ कोटी रुपये खर्च करण्यात आला. ग्रामीण विकास विभागांतर्गत सुरू असलेल्या या अभियानामुळे महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.

लघू उद्योजक प्रवाहातबचत गटाच्या माध्यमातून उमेद अभियानामुळे लाखो उद्योजकांचे उद्योग मुख्य प्रवाहात आले आहेत. गतवर्षी ५१ हजार २२० स्वयंसाहाय्यता गटांची स्थापना करण्यात आली असून, त्यामध्ये ५ लाख ७४ हजार ४२० सदस्य कार्यरत आहेत. या सदस्यांना उपजीविकेचे मोठे साधन उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाWomenमहिला