शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

बुलडाणा जिल्हय़ात सिंचनाचा अभाव; रब्बीचा पेरा घटला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:04 IST

अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्‍यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्‍यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे.  

ठळक मुद्देगत वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्‍यात २६ हजार ८२६ हेक्टरने झाली घट 

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अवर्षण आणि शासनाच्या धोरणाचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रब्बी पेर्‍यावर दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या पेर्‍यात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाली आहे.  जिल्ह्यात गेल्या वर्षी १ लाख ४५ हजार ९९0 हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी झाली होती. यामध्ये हरभरा पिकाचा पेरा सर्वाधिक होता. दरम्यान, यावर्षी हरभरा पिकाचा पेरा अधिक असला तरी, जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्रफळात तब्बल २६ हजार ८२६ हेक्टरने घट झाल्याचे दिसून येते. नैसर्गिक आपत्ती आणि शेतमालाला मिळणारा भाव यामुळे रब्बीच्या पेर्‍यात घट झाल्याचे दिसून येते. उत्पादन खर्चापेक्षाही उत्पन्न कमी होत असल्याने, काही शेतकर्‍यांनी रब्बी पिकाची पेरणी टाळली आहे. त्याचवेळी  जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांनी आपली शेती बटाईने दिल्याचीही वस्तुस्थिती आहे. सन २0१४-१५ आणि २0१५-१६च्या तुलनेत समाधानकारक पावसामुळे  गेल्या वर्षी म्हणजेच सन २0१६-१७ मध्ये रब्बीच्या पेर्‍यात लक्षणीय वाढ झाली होती; परंतु यावर्षी पावसाची अनियमिता, उत्पादनातील तूट आणि शासनाच्या धोरणामुळे रब्बी क्षेत्रात घट झाल्याची ग्रामीण भागात चर्चा आहे. तथापि, जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली आणि सिंदखेड राजा तालुक्यात सरासरी क्षेत्रापेक्षा रब्बीच्या पेर्‍यात लक्षणीय वाढ असल्याचे दिसून येते. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात  ७४ टक्यांची वाढ असून, चिखली तालुक्यात २ टक्यांची वाढ दिसून येते. त्याचवेळी सिंदखेड राजामध्ये सरासरी क्षेत्रापेक्षा ३१ टक्के अधिक रब्बीचा पेरा झाला आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा कमी पेरा शेगाव (२४), जळगाव जामोद (३२), मोताळा (३६) आणि नांदुरा (३४) टक्के झाला आहे. तथापि, घाटाखालील तालुक्यांच्या तुलनेत घाटावरील तालुक्यांमध्येच रब्बीचा पेरा अधिक झाल्याचे दिसून येते. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी रब्बीच्या पिकांची निगा राखणे गरजेचे आहे. - 

टॅग्स :agricultureशेतीBuldhana Collector officeबुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय