शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

माेताळा ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात प्रशस्त ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती ...

शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्या, या उद्देशाने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात प्रशस्त ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती केली आहे, तसेच येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना राहण्याच्या सोयींसह इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत, परंतु येथील वैद्यकीय अधिकारी तथा कर्मचारी येथील रुग्णांना सेवा देण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. या रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी महिलांचे दाखल होण्याचे प्रमाण खूप आहे, परंतु येथे प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांपैकी प्रसूती होण्याचे प्रमाण हे खूपच कमी आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांना प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर, त्या महिलांना तथा त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाइकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून महिलांची कोणत्याही प्रकारे तपासणी न करता सरळ बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी जाण्याचा सल्ला दिला जात आहे, तसेच प्रसूतीसाठी अडचणी निर्माण होत असून, नैसर्गिक प्रसूती न झाल्यास आमच्याकडे पुरेसे साहित्य तथा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देउन ग्रामीण रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.