शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
4
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
5
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
6
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
7
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
8
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
9
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
10
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...
11
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
12
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
13
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
14
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
15
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
16
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
17
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
18
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
19
ITR भरल्यानंतर आता तासाभरात परतावा! आयकर विभागाचा स्पीड पाहून नागरिक थक्क, जाणून घ्या कसं झालं शक्य?
20
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 

किडनी रुग्णांचा मृत्यू नव्हे हत्याच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:20 IST

किडनीच्या  आजाराने गत पाच वर्षात पाचशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला  असल्यानंतरही या भागात किडनीच्या आजारासाठी ठोस उ पाययोजना राबवल्या गेल्या नाहीत. या रुग्णांचा किडनीच्या  आजाराने मृत्यू नाही तर यंत्रणेनेच हत्या केल्याचा घणाघाती  आरोप माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केला.

लोकमत संवादयोगेश फरपट : खामगावेएकीकडे राज्यात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी  महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रुपये  खर्च केल्या जात आहेत तर दुसरीकडे बुलडाणा जिल्हय़ातील  संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा या तालुक्यात किडनीच्या  आजाराने गत पाच वर्षात पाचशेहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला  असल्यानंतरही या भागात किडनीच्या आजारासाठी ठोस उ पाययोजना राबवल्या गेल्या नाहीत. या रुग्णांचा किडनीच्या  आजाराने मृत्यू नाही तर यंत्रणेनेच हत्या केल्याचा घणाघाती  आरोप माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केला. ‘लोकम त’च्या संवाद या सदरात सोमवारी ते प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलत  होते. प्रश्न - किडनी आजार निवारण जनसंपर्क अभियानाचा उद्देश  काय? उत्तर - बुलडाणा जिल्हय़ातील संग्रामपूर, शेगाव, नांदुरासह   अकोला व अमरावती जिल्हय़ातील चारशेपेक्षा जास्त गावे खार पाणपट्टय़ात येतात. या गावातील पाणी पिण्यासाठी सोडा  शौचासाठीसुद्धा वापरण्यास नागरिक घाबरतात. कारण यामुळे  त्वचारोग, किडनी, पोटाचे विकार आदी आजारांची लागण  होण्याचा धोका आहे. सद्यस्थितीत बुलडाणा जिल्हय़ातील  संग्रामपूर, नांदुरा, जळगाव जामोद या गावांमधील ५00 पेक्षा  जास्त नागरिकांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. या  प्रकाराबाबत जाणून असताना त्याची कुठलीही नोंद शासनाकडे  नसणे ही गंभीर बाब आहे. शासनाचे तसेच राज्यकर्त्यांचे लक्ष या  आजाराकडे जावे व या लोकांसाठी ठोस उपाययोजना व्हावी  यासाठी किडनीच्या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या  कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती संग्रहित करीत आहे. त्यासाठी  किडनी आजार निवारण जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. 

प्रश्न - जनसंपर्क अभियानादरम्यान आपणास काय जाणवले?उत्तर - खारपाणपट्टय़ात अद्यापही शुद्ध जलपुरवठा नावापुरताच  होत आहे. दोन-चार गावे सोडली तर नागरिकांच्या नशिबी दूषित  पाणीच पिण्यात येत आहे. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.  गावात शासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी, ग्रामसेवक,  आरोग्यसेवक हे जबाबदार कर्मचारी आहेत. किडनीच्या  आजाराने दर पंधरवड्याला एक मृत्यू होत असताना याबाबत  शासनाला कुणीच काहीच माहिती दिलेली दिसत नाही. शिवाय  नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे तहसीलदार,  तालुका आरोग्य अधिकार्‍यांचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे  दिसून आले. या गावामध्ये औषधोपचार, सुविधा पुरवल्या जात  नसल्याचेही प्रकर्षाने जाणवले. या प्रकाराबाबत मी लेखी  शासनाला कळवले आहे. 

प्रश्न - किडनी रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ पली पुढील भूमिका काय असेल?उत्तर - एवढय़ा मोठय़ा प्रमाणात खारपाणपट्टय़ातील लोकांचे मृत्यू  होत आहेत. तरी आरोग्य व महसूल यंत्रणा झोपेत आहे, याचे  आश्‍चर्य वाटते. जिल्हा प्रशासनाचे या प्रकाराचे लक्ष  वेधण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबरला जळगाव जामोद येथील उ पविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्याचे  ठरवले आहे. जोपर्यंत शासन किडनी रुग्णांसाठी ठोस उ पाययोजनांचा कृती आराखडा सादर करीत नाही तोपर्यंत बैठा स त्याग्रह सोडणार नाही. या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा  मंत्री, ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी यांनासुद्धा अवगत करून  दिले आहे.

प्रश्न - शासनाकडे आपण काय मागणी केली आहे ?उत्तर - जनसंपर्क अभियान १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.  एसडीओ कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्यापूर्वी जिल्हाधिकारी  व आरोग्य उपसंचालक अकोला यांनी दखल घेऊन आपल्या  अधीनस्त कर्मचार्‍यांना या गावाचा सर्व्हे करण्याच्या सुचना  द्याव्यात. जेणेकरून त्यांना परिस्थिती लक्षात येऊ शकेल. माहि तीच्या आधारावर किडनी आजाराच्या निवारणासाठी ठोस अँ क्शन प्लान तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करावी. 

प्रश्न - बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना  भ्रष्टाचार निर्मूलन समितीची कार्यपद्धती काय?उत्तर - पाणीपुरवठा योजनेतील गैरप्रकार उघड करण्यासाठी काही  सहकार्‍यांना सोबत घेऊन बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समिती तयार केली आहे. या  माध्यमातून खारपाणपट्टय़ातील गावात झालेल्या पाणीपुरवठा  योजनांची स्थिती, त्यात झालेला भ्रष्टाचार उघड करून दोषींना  शिक्षा व्हावी. केलेल्या गैरप्रकाराची रिकव्हरी व्हावी हा यामागील  उद्देश आहे. 

प्रश्न - १४0 गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराबाबत काय  सांगू शकाल?उत्तर - खारपाणपट्टय़ातील १४0 गावांसाठी वाण धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी ही योजना आखण्यात आली. कोट्यवधी रु पये खर्च झाले असताना अद्याप ३0 गावातही पाणी पोहचले  नसल्याचे वास्तव जाणवले. ज्या गावात पाणी पोहचते तेही  अशुद्धच येत असल्याचे गावकर्‍यांशी चर्चेतून समजले. एकीकडे  नागरिक पाणी विकत घेऊन आपली तहान भागवत आहे तर  दुसरीकडे ग्रामपंचायतकडून पाणीपट्टी कर भरण्यासाठी सक्ती  केली जात असल्याची विदारक परिस्थिती या भागात आहे.  अधिकार्‍यांचे तर सोडाच; पण स्थानिक लोकप्रतिनिधीही याकडे  कानाडोळा करीत असल्याचे जाणवले. 

प्रश्न - किडनी रुग्णांसाठी काय करावे असे आपणास वाटते?उत्तर - किडनी आजाराने बाधित असलेल्या रुग्णास दर तीन ते  पाच दिवसाला डायलेसिस करावे लागते. शेगाव व खामगावा तील डायलेसिसची सुविधा नावापुरतीच सुरू आहे. पर्यायाने  रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी खासगीत उपचार घ्यावा लागतो.  यासाठी प्रत्येक रुग्णास दोन लाख रुपये उपचारासाठी मदत देण्या त यावी. किडनी आजाराने बाधित असलेल्या रुग्णास प्राथमिक  उपचारासाठी ५0 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात यावे. अनेक  गावात कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याचे जाणवले. घरातील कर्ता  पुरुष गेल्याने संकटात सापडलेल्या अशा कुटुंबांना प्रत्येकी ४  लाख रुपये अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल