शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुरीच्या चुकार्‍यासाठी युकाँचा खविसं कार्यालयात ठिय्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:18 IST

चिखली : ऐन दिवाळी सणालाही शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या तुरीचे चुकारे मिळत नसल्याने आ. राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांसमवेत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून शेतकर्‍यांना तातडीने चुकारे देण्यासह शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे बेकायदेशीररीत्या दुसरीकडे वर्ग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देपैसे वर्ग करणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करा - राहुल बोंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : ऐन दिवाळी सणालाही शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या तुरीचे चुकारे मिळत नसल्याने आ. राहुल बोंद्रे यांनी शेतकर्‍यांसमवेत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करून शेतकर्‍यांना तातडीने चुकारे देण्यासह शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे बेकायदेशीररीत्या दुसरीकडे वर्ग करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यासंदर्भात खरेदी-विक्री संस्थेमध्ये तालुका युवक काँग्रेसने ११ ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन करून दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.शेतकर्‍यांनी प्रचंड त्रास सोसून नाफेडला आपली तूर विकली आहे; मात्र आता तुरीचे दुसरे पीक येऊनही शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. ३१ मे २0१७ पूर्वी तूर विकलेल्या शेतकर्‍यांचे चुकारे अद्यापही बाकी असताना खरेदी केलेल्या तुरीचे पैसे जिल्हा मार्केटींग अधिकारी बुलडाणा यांनी चिखली तालुका खरेदी-विक्री सहकारी संस्था यांना पाठविल्यानंतरही ते पैसे परस्पर इतर ठिकाणी वर्ग करून तुरीच्या चुकार्‍यांपासून शेतकर्‍यांना वंचित ठेवण्याचा प्रकार या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकाने केल्याचा आरोप करून युवक काँग्रेसने ११ ऑक्टोबर रोजी खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. दरम्यान, जिल्हा मार्केटींग अधिकार्‍यांशी संपर्क साधून लवकरात लवकर तुरीचे चुकारे देण्यात यावे, अशी मागणी केली असता, चिखली खरेदी-विक्री संस्थेस तुरीच्या चुकार्‍याची रक्कम पूर्वीच पाठविल्याची बाब स्पष्ट झाली. खविसंने तुरीच्या चुकार्‍यासाठी आलेली रक्कम इतर देणी चुकविण्यासाठी वळती केल्याची बाब समोर आली असून, सुमारे २९ लाखापेक्षा अधिक रक्कम परस्पर इतरत्र वापरल्या गेली असल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. ही बाब आ.राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देत या बेकायदेशीर प्रकाराची चौकशी करून शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे इतरत्र वर्ग करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी व शेतकर्‍यांना तुरीचे चुकारे देण्याची मागणी केली. तर ठिय्या आंदोलनात युकाँ अध्यक्ष रमेश सुरडकर, संजय गिरी, शरद कदम, बाळु साळोख, संजय कोल्हे, भास्कर काकडे, राजू सुरडकर, पिंटु गायकवाड, संजय सोळंकी, ज्ञानेश्‍वर सोळंके, भाऊसाहेब कदम, ज्ञानेश्‍वर गायकवाड, राजेंद्र साळोख, कैलास सुरडकर, किशोर साळवे, राजू सावंत आदींचा सहभाग होता.