सिंदखेडराजा : गाजावाजा करुन ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात करण्यात आले होते. मात्र तालुक्यात ग्रामस्वच्छता अभियानाला खो दिला जात असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तसेच गोद्रीमुक्त गाव या कार्यक्रमाचा ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये फज्जा उडाला असून, पंचायत समिती स्तरावरुन या अभियानाचा पुन्हा उठाव करण्याची गरज भासू लागली आहे. ग्रामीण भागात आरोग्यमान उंचाविण्याकरीता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. ग्रामीण भागातील उघड्यावर शौचास जाणे बंद करण्याकरीता केंद्र सरकार निर्मल ग्राम ही योजना राबवित आहे. याकरीता पुरस्कार योजना सुद्धा आहे. सिंदखेडराजा तालुक्यात जागदरी, महारखेड, आंबेवाडी, भोसा, डावरगाव, तढेगाव ही गावे ग्रामस्वच्छता अभियानात बसली. महारखेड गावाने ५ लाखाचे तर इतर गावांनी ५0 हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत बक्षिसाची रक्कम मिळविली आहे. या अभियानाचा मुळ उद्देश ग्रामीण भागातील आरोग्यमान उंचावणे आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्या दोन्ही कडेला उघड्यावरच शौचविधीमुळे सर्वाधिक प्रदुषण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वारंवार साथीचे रोग पसरतात. हिवरा गडलींग, हनवतखेड या दोन्ही गावात अज्ञात तापाने उच्छाद मांडला आहे. याचे मुळ कारण साचलेली गटारे आणि उघड्यावर शौचास बसणे अशीच आहे. वारंवार उद्भवणार्या सोयी व रोगराईस आळा घालायचा असेल, तर स्वच्छतेशी निगडीत एकूण घटकांबरोबर शौचालयाचा योग्य व नियमीत वापर जनतेने करणे अनिवार्य आहे. बुलडाणा जिल्ह्यात महारखेड अव्वल येत असतांना साखरखेर्डा गावाचे नाव अस्वच्छतेच्या यादीतही अव्वल आहे. शासनाने हे दोन्ही पुरस्कार जाहीर केले तर निश्चीतच अत्यंत गलीच्छ वस्ती म्हणून ग्रामीण विभागात महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाला तर नवल वाटू नये. घरात शौचालय असतांना काही कर्मचारी आजही प्रातविधीसाठी बाहेर जातांना दिसतात. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, वरोडी, सवडद, मोहाडी, राताळी यासारख्या गावात गोद्रीमुक्त मोहिमेला हरताळ फासण्यात आला आहे.
ग्रामस्वच्छता अभियानाला ‘खो’
By admin | Updated: May 13, 2014 21:45 IST